शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Janta Curfue : दवाखाने, पेट्रोलपंप वगळता सर्वत्र शंभर टक्के बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 15:30 IST

पेट्रोलपंप, दवाखाने, मेडिकल यासारख्या अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वत्र शंभर टक्के बंद राहिल्याचे दिसून आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ अशा १४ तासांचा ‘जनता कर्फ्यू’ पाळण्याचे आवाहन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले. त्यास वाशिम जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शहर परिसर व महामार्गाच्या कडेला असलेले पेट्रोलपंप, दवाखाने, मेडिकल यासारख्या अत्यावश्यक सुविधा वगळता सर्वत्र शंभर टक्के बंद राहिल्याचे दिसून आले.जिल्ह्यातील वाशिम, रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा आणि मंगरूळपीर या सहाही शहरांमधील बाजारपेठ रविवारी कडेकोट बंद होती. विशेषत: जिल्हा मुख्यालय असलेल्या वाशिममध्ये रविवारचा आठवडी बाजार असतो. तो देखील रविवारी बंद ठेवण्यात आला. प्रमुख चौकांमध्ये पांढरा आणि खाकीचा पोषाख परिधान करून असलेले पोलिस कर्मचारी कर्तव्यावर हजर होते. आरोग्य विभागाने रुग्णवाहिका ठिकठिकाणी उभ्या केल्या. त्याव्यतिरिक्त रस्त्यांवर सर्वत्र शुकशुकाट जाणवून आला. पेट्रोलपंप आणि दवाखाने सुरू होते; मात्र नागरिक घराबाहेरच पडले नसल्याने गर्दी झाल्याचे कुठेही दिसून आले नाही.

टॅग्स :washimवाशिम