शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

अनुदानाचे पैसे १५ दिवसात देणे बंधनकारक

By admin | Updated: June 7, 2014 22:50 IST

ग्रामसेवक अथवा गटसमन्वयकांना प्रस्ताव दिल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत शौचालयाचे प्रोत्साहन अनुदान देणे बंधनकारक आहे

वाशिम : ग्रामसेवक अथवा गटसमन्वयकांना प्रस्ताव दिल्यानंतर पंधरा दिवसांच्या आत शौचालयाचे प्रोत्साहन अनुदान देणे बंधनकारक आहे ते न मिळाल्यास पात्र लाभार्थ्यांनी थेट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे. यामुळे तालुकास्तरावरील यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. मुकाअ यांच्या या धोरणामुळे निर्मल भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकामाला गती येईल असा विश्‍वास व्यक्त केला जात आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन अंतर्गत निर्मल भारत अभियान व इतरर योजनांमधून बांधण्यात येणार्‍या शौचालय बांधकामाच्या व अनुदान वाटपाच्या कामाचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एक महिन्यांपूर्वी घेतला होता. तेव्हा मागील वर्ष भरापासून शौचालय बांधलेल्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप केले न सल्यामुळे शौचालय बांधकामाला मोठया प्रमाणात अडथळा येत असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली होती. मुळातच शौचालय बांधण्याची मानसिकता ग्रामीण भागातील लोकांनी नसते. ही मानसिकता तयार करण्यासाठी तालुका व जिल्हा पातळीवर शासनाच्या वतीने विविध पातळीवर प्रयत्न केले जातात. यासाठी मोठया प्रमाणात जाणीव जागृती करण्यात येते. महत्प्रयासाने लाभाथ्यरांने शौचालय बांधले तर त्याला प्रोत्साहन अनुदानासाठी तालुक्याच्या ठिकाणी खेटे घालावे लागतात. परिणामी दुसरी व्यक्ती शौचालय बांधण्यास धजावत नाही व शासनाप्रती अविश्‍वासाची भावनाही तयार होते. याबाबीमुळे एकुणच अभियानाला खिळ बसते आणि सर्व यंत्रणेला दोषी धरले जाते. मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंशी यांनी जिल्हा परिषेची सुत्रे हाती घेण्यापूर्वी वाशिम जिल्हयान सन २0१३-१४ या वर्षात शौचालय बांधकामाचे केवळ ५0 टक्के उद्दिष्ट साध्य झाले व यापैकी केवळ ३५ टक्केच अनुदान वाटप झाले होते. म्हणजे मुळातच शौचालय बांधण्याचे काम कमी व ज्यांनी काम केले त्यांना अनुदान वाटप नाही. या बाबीचे गांभीर्य लक्षात घेवून पुढील दोन महिन्यात उर्वरीत सर्व लाभार्थ्याचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याच्या सुचना त्यांनी सर्व गटविकास अधिकारी यांना दिल्या होत्या.त्र यानंतर या कामाने गती घेतली होती. मात्र हवी तशी गती येत नसल्याने जयवंशी यांनी निर्मल भारत अभियानाशी संबंधीत सर्व अधिकारी व कर्मचार्‍याचे वेतन कामाच्या टक्केवारीशी जोडले होते. परिणामी मागील वर्षी शौचालय बांधलेल्या सुमारे ७४ टक्के लाभार्थ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. सध्या मागील वर्षीचे २६ टक्के उद्दीष्ट बाकी असून त्यात नविन शौचालय बांधणार्‍या लाभार्थ्यांंची भर पडत आहे. त्यामुळे मागील वर्षाप्रमाणे अनुदान वाटप करणे बाकी राहू नये, शौचालय बांधल्यानंतर पात्र कुटूंबांना लगेच लाभ मिळावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंशी विविध पातळीवर प्रयत्न करीत आहेत. या कामाला गती देण्यासाठी मुकाअ रुचेश जयवंशी यांनी एक पाऊल पुढे टाकले असून अनुदान मिळण्यास उशिर होत असल्यास लोकांनी थेट आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. यासाठी जिल्हा स्तरावरुन जाणीव जागृतीसाठी एक मािहती पत्रक तयार करण्यात आले असून यामध्ये तालुकानिहाय गटसमन्वयक व बी.आर.सी. यांचे चनाव व मोबाईल नंबरची यादी देण्यात आली आहे. शौचालय बांधून वापर करणार्‍या कुटूंबांनी संबंधीतांना आपला प्रस्ताव सादर केल्या नंतर १५ दिवसात अनुदान न मिळाल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांच्याशी ७३५0३७५९९९ या नंबरवर संपर्क साधावा असे या पत्रकात नमुद आहे. जिल्हयातील सर्वच ग्राम पंचायतीमध्ये या पत्रकाचे वितरण करण्यात येणार असल्याने शौचालय बांधकामा सोबतच गावातील इतर विकासकामांनाही गती येईल अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)