शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
3
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
4
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
5
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
6
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
7
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
8
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
9
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
10
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
11
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
12
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
14
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
15
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
16
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
17
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
18
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
19
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
20
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...

सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलेच!

By admin | Updated: July 12, 2017 20:23 IST

वाशिम : पावसाळ्याचे दिवस असतानाही पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरीपातील पिके संकटात सापडली आहेत. यासोबतच सिंचन प्रकल्पांचीही पाणीपातळी वाढण्याऐवजी घटत चालल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पावसाळ्याचे दिवस असतानाही पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरीपातील पिके संकटात सापडली आहेत. यासोबतच सिंचन प्रकल्पांचीही पाणीपातळी वाढण्याऐवजी घटत चालल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील बोराळा येथील अडोळ सिंचन प्रकल्पात आजमितीस मृत जलसाठा शिल्लक असून आसेगाव पो.स्टे . धरणात उणापूरा १० टक्के जलसाठा असल्याची माहिती आहे.बोराळा धरणात मृत जलसाठाबोराळा येथील अडोळ लघू प्रकल्पामध्ये सद्या मृत जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. मागील तीन वर्षापासून हे धरण १०० टक्के कधीच भरलेले नाही. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अडोळ लघूप्रकल्प ५५ टक्के भरले होते, याच धरणाच्या क्षेत्रामध्ये हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. रिसोड, शिरपूर, रिठद या मोठ्या गावांनाही त्यातूनच पाणीपुरवठा केला जातो. मागील तीन वर्षापासून धरण न भरल्यामुळे परिसरातील शेतकरी सिंचन करू शकत नसल्याने पिकांच्या सरासरी उत्पन्नात मोठी घट येत आहे. पाणी उपलब्ध झाल्यास भुईमुंग, हळद, हरभरा आदी पिके घेणे शक्य होतील; परंतू यंदाही गतवर्षीपेक्षाही गंभीर परिस्थिती असून पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे धरणात आजमितीस मृत जलसाठा शिल्लक राहिला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत मोठा पाऊस न झाल्यास जनावरांसोबतच नागरिकांनाही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेन, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

आसेगाव बांध धरणात १० टक्के जलसाठा आसेगाव पो. स्टे. येथील बांध धरण गतवर्षी १०० टक्के भरले होते. यंदा मात्र पावसाळा सुरू होऊनही मोठा पाऊस अद्याप न झाल्यामुळे धरणात केवळ १० टक्क्याच्या आसपास जलसाठा शिल्लक राहिला आहे. परिसरातील लहान स्वरूपातील धरण तसेच पाझर तलावांमध्येही पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. यावर्षी विहिरींचीही पाणीपातळी तसूभर देखील वाढलेली नाही. यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.