शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
5
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
6
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
7
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
8
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
9
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
10
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
11
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
12
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
13
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
14
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
15
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
16
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल
17
"राष्ट्रगीत सुरू असताना असं उभं राहतात का?", स्वातंत्र्यदिन साजरा करताना शिल्पा शेट्टीच्या बहिणीकडून मोठी चूक, नेटकऱ्यांनी चांगलंच सुनावलं
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
पश्चिम बंगालमध्ये ट्रक आणि बसमध्ये भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, ३० जण जखमी
20
सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया, अर्जुन अन् छोटंसं कुत्र्याचं पिल्लू... पाहा UNSEEN PHOTOS

सिंचन प्रकल्प अद्याप तहानलेलेच!

By admin | Updated: July 12, 2017 20:23 IST

वाशिम : पावसाळ्याचे दिवस असतानाही पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरीपातील पिके संकटात सापडली आहेत. यासोबतच सिंचन प्रकल्पांचीही पाणीपातळी वाढण्याऐवजी घटत चालल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पावसाळ्याचे दिवस असतानाही पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे खरीपातील पिके संकटात सापडली आहेत. यासोबतच सिंचन प्रकल्पांचीही पाणीपातळी वाढण्याऐवजी घटत चालल्याचे विदारक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील बोराळा येथील अडोळ सिंचन प्रकल्पात आजमितीस मृत जलसाठा शिल्लक असून आसेगाव पो.स्टे . धरणात उणापूरा १० टक्के जलसाठा असल्याची माहिती आहे.बोराळा धरणात मृत जलसाठाबोराळा येथील अडोळ लघू प्रकल्पामध्ये सद्या मृत जलसाठा शिल्लक राहिलेला आहे. मागील तीन वर्षापासून हे धरण १०० टक्के कधीच भरलेले नाही. मागील वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने अडोळ लघूप्रकल्प ५५ टक्के भरले होते, याच धरणाच्या क्षेत्रामध्ये हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येते. रिसोड, शिरपूर, रिठद या मोठ्या गावांनाही त्यातूनच पाणीपुरवठा केला जातो. मागील तीन वर्षापासून धरण न भरल्यामुळे परिसरातील शेतकरी सिंचन करू शकत नसल्याने पिकांच्या सरासरी उत्पन्नात मोठी घट येत आहे. पाणी उपलब्ध झाल्यास भुईमुंग, हळद, हरभरा आदी पिके घेणे शक्य होतील; परंतू यंदाही गतवर्षीपेक्षाही गंभीर परिस्थिती असून पावसाने दीर्घ दडी मारल्यामुळे धरणात आजमितीस मृत जलसाठा शिल्लक राहिला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत मोठा पाऊस न झाल्यास जनावरांसोबतच नागरिकांनाही भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेन, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

आसेगाव बांध धरणात १० टक्के जलसाठा आसेगाव पो. स्टे. येथील बांध धरण गतवर्षी १०० टक्के भरले होते. यंदा मात्र पावसाळा सुरू होऊनही मोठा पाऊस अद्याप न झाल्यामुळे धरणात केवळ १० टक्क्याच्या आसपास जलसाठा शिल्लक राहिला आहे. परिसरातील लहान स्वरूपातील धरण तसेच पाझर तलावांमध्येही पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत आहे. यावर्षी विहिरींचीही पाणीपातळी तसूभर देखील वाढलेली नाही. यामुळे परिसरातील अनेक गावांमध्ये आतापासूनच पाणीटंचाईचे चटके सोसावे लागत आहेत.