शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
2
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
3
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
4
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
5
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
6
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
7
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
8
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
9
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
10
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
11
दहीहंडी दुर्घटनेतील महेशच्या कुटुंबाला ५ लाखांचा धनादेश; दहिसर येथे घडला होता दुर्दैवी प्रकार
12
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
13
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
14
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
15
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
16
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
17
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
18
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
19
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
20
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...

चार महिन्यांपासून ४0 गावांतील विद्युत पुरवठा अनियमित

By admin | Updated: October 22, 2015 01:40 IST

वाशिम जिल्ह्यातील परिस्थिती; शेतकरी त्रस्त.

किनखेडा (जि. वाशिम) : मसलापेन व मांगुळ झनक विद्युत उपकेंद्राला वीजपुरवठा करणार्‍या लाइनचा (विजेचा) खांब किनखेडा शिवारात चार महिन्यांपासून वाकलेल्या अवस्थेत आहे; मात्र वीज वितरण कंपनीचे याकडे दुर्लक्ष आहे. ४0 गावांना वीजपुरवठा करणारे दोन उपकेंद्र असून, त्या उपकेंद्रांना होणारा वीजपुरवठा या मोडलेल्या खांबामुळे विस्कळीत होत आहे. ४0 गावांतील कृषिपंपाचा वापर विजेअभावी प्रभावित झाला आहे. मागील चार महिन्यांपासून याबाबत शेतकर्‍यांनी सहायक अभियंता, वरिष्ठ अभियंता यांना वारंवार सूचित करूनही अद्यापपर्यंंत सदर खांब बदललेला नाही. लाइन ही खांबावर नसून, खांब लाइनच्या आधारे आडवा झालेला आहे. त्यामुळे ३३ केव्ही विद्युत प्रवाह हा केवळ १0 फुटांवर आलेला आहे. त्याखालून श्री सिद्धेश्‍वर संस्थानकडे जाणारा रस्ता असून, शेतशिवारात या रस्त्याने जावे लागते. १0 फूट उंचीचे वाहन सदर रस्त्यावरून नेता येत नाही. सदर वाकलेल्या खांबामुळे एखादी दुर्घटना घडल्यास कोणास जबाबदार धरावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे तात्काळ मोडलेला खांब बदलून इतर खांबदेखील सरळ करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.