शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

कपाशी, सोयाबीनवर रोगांचे आक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:23 IST

सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या  शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या  रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या  अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी  आदी  रोगांनी  आक्रमण केले आहे. सोयाबीनवर मोठय़ा  प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  सोयाबीन व  कपाशीच्या उत्पादनावर परिणाम व कपाशीच्या उत् पादनावर परिणाम होण्याची  भीती शेतकर्‍यांमध्ये  व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांमध्ये उत्पादन घटण्याची भीती कृषी विभागाच्या मार्गदर्शनापासून शेतकरी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा : सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या  शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या  रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या  अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी  आदी  रोगांनी  आक्रमण केले आहे. सोयाबीनवर मोठय़ा  प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  सोयाबीन व  कपाशीच्या उत्पादनावर परिणाम व कपाशीच्या उत् पादनावर परिणाम होण्याची  भीती शेतकर्‍यांमध्ये  व्यक्त केली जात आहे.दरम्यान, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संबंधित शे तकर्‍यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन होणे गरजेचे  असताना मात्र ते होत नसल्याच्या तक्रारी शे तकर्‍यांकडून होत आहे. या परिस्थितीत नेमके काय  करावे, या संभ्रमात शेतकरी आहे. यावर्षी  हवामान  खात्याने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता;   मात्र हा अंदाज खोटा ठरवत पावसाने चांगलीच दडी  मारली.  अधूनमधून आलेल्या रिमझिम पावसाने  िपकांना जीवनदान मिळाले. पिकाची वाढही बरी  झाली; मात्र हवा तसा पाऊस न आल्याने जमिनीला  भेगा पडल्या होत्या तसेच जमिनीतील तापमानातही  मोठी वाढ झाली. परिणामी, सध्या फळधारणेच्या अवस्थेत असलेल्या  सोयाबीन व कपाशी या दोन्हीही पिकांवर विविध  रोगांनी आक्रमण केले आहे. कपाशीवर रसशोधक  किडी यांच्यासह आदी रोगांनी  आक्रमण केले आहे.  त्यामुळे त्याची पाने सुकू लागली आहे. तर  सोयाबीनच्या शेंगा अळ्या मोठय़ा प्रमाणावर फस्त  करत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात  सापडला आहे. विशेष म्हणजे, सोयाबीनवर  फळधारणेच्या काळात  शक्यतो अळ्यांच्या प्रादुर्भाव  होत नाही; मात्र यंदा पहिल्यांदाच अशा स्थितीत  अळ्याचे अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात कृषी  विभागाशी शेतकर्‍यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न  केला; मात्र त्यांना ‘रिस्पॉन्स’ मिळाला नाही.

कृषी केंद्रांकडून शेतकर्‍यांची लूटएकीकडे पिकांवर रोगाच्या आक्रमणाने शेतकरी ह तबल झाला असताना त्यांच्या आशिक्षितपणाचा  फायदा घेत कृषी विकेत्यांकडून शेतकर्‍यांची लूट  केली जात आहे. अनेक शेतकर्‍यांना पिकांवरील  कीड रोग व त्यावरील उपाय. या गोष्टीची माहिती  नसते, त्यामुळे ते संभ्रमात असतात. कृषी  विभागाकडूनही पाहिजे तसे मार्गदर्शन मिळत नाही.  अशा परिस्थितीत कृषी विक्रेेते कोणतीही औषधे शे तकर्‍यांच्या माथी मारत आहेत.

कृषी अधिकार्‍यांचा ‘नो रिस्पॉन्स’हाताशी आलेल्या पिकावर रसशोधक किडी,  मिलीबग आदी रोगामुळे कपाशीच्या झाडाचा श्‍वास  कोंडला जात आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी  समाधान पडधान यांना फोन केला असता, त्यांनी रिस् पॉन्स न देता फोन कट केला, ही त्यांची नित्याचीच  बाब आहे.