शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

कपाशी, सोयाबीनवर रोगांचे आक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 01:23 IST

सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या  शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या  रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या  अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी  आदी  रोगांनी  आक्रमण केले आहे. सोयाबीनवर मोठय़ा  प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  सोयाबीन व  कपाशीच्या उत्पादनावर परिणाम व कपाशीच्या उत् पादनावर परिणाम होण्याची  भीती शेतकर्‍यांमध्ये  व्यक्त केली जात आहे.

ठळक मुद्देशेतकर्‍यांमध्ये उत्पादन घटण्याची भीती कृषी विभागाच्या मार्गदर्शनापासून शेतकरी वंचित

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा : सुलतानी संकटाने उद्ध्वस्त होत असलेल्या  शेतकरी आता कपाशी व सोयाबीनवर आलेल्या  रोगामुळे पार मोडून गेला आहे. या परिसरात झालेल्या  अल्प पावसामुळे कपाशीवर रसशोधक किडी  आदी  रोगांनी  आक्रमण केले आहे. सोयाबीनवर मोठय़ा  प्रमाणात अळ्यांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे  सोयाबीन व  कपाशीच्या उत्पादनावर परिणाम व कपाशीच्या उत् पादनावर परिणाम होण्याची  भीती शेतकर्‍यांमध्ये  व्यक्त केली जात आहे.दरम्यान, रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर संबंधित शे तकर्‍यांना कृषी विभागाकडून मार्गदर्शन होणे गरजेचे  असताना मात्र ते होत नसल्याच्या तक्रारी शे तकर्‍यांकडून होत आहे. या परिस्थितीत नेमके काय  करावे, या संभ्रमात शेतकरी आहे. यावर्षी  हवामान  खात्याने जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला होता;   मात्र हा अंदाज खोटा ठरवत पावसाने चांगलीच दडी  मारली.  अधूनमधून आलेल्या रिमझिम पावसाने  िपकांना जीवनदान मिळाले. पिकाची वाढही बरी  झाली; मात्र हवा तसा पाऊस न आल्याने जमिनीला  भेगा पडल्या होत्या तसेच जमिनीतील तापमानातही  मोठी वाढ झाली. परिणामी, सध्या फळधारणेच्या अवस्थेत असलेल्या  सोयाबीन व कपाशी या दोन्हीही पिकांवर विविध  रोगांनी आक्रमण केले आहे. कपाशीवर रसशोधक  किडी यांच्यासह आदी रोगांनी  आक्रमण केले आहे.  त्यामुळे त्याची पाने सुकू लागली आहे. तर  सोयाबीनच्या शेंगा अळ्या मोठय़ा प्रमाणावर फस्त  करत आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात  सापडला आहे. विशेष म्हणजे, सोयाबीनवर  फळधारणेच्या काळात  शक्यतो अळ्यांच्या प्रादुर्भाव  होत नाही; मात्र यंदा पहिल्यांदाच अशा स्थितीत  अळ्याचे अतिक्रमण झाले आहे. यासंदर्भात कृषी  विभागाशी शेतकर्‍यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न  केला; मात्र त्यांना ‘रिस्पॉन्स’ मिळाला नाही.

कृषी केंद्रांकडून शेतकर्‍यांची लूटएकीकडे पिकांवर रोगाच्या आक्रमणाने शेतकरी ह तबल झाला असताना त्यांच्या आशिक्षितपणाचा  फायदा घेत कृषी विकेत्यांकडून शेतकर्‍यांची लूट  केली जात आहे. अनेक शेतकर्‍यांना पिकांवरील  कीड रोग व त्यावरील उपाय. या गोष्टीची माहिती  नसते, त्यामुळे ते संभ्रमात असतात. कृषी  विभागाकडूनही पाहिजे तसे मार्गदर्शन मिळत नाही.  अशा परिस्थितीत कृषी विक्रेेते कोणतीही औषधे शे तकर्‍यांच्या माथी मारत आहेत.

कृषी अधिकार्‍यांचा ‘नो रिस्पॉन्स’हाताशी आलेल्या पिकावर रसशोधक किडी,  मिलीबग आदी रोगामुळे कपाशीच्या झाडाचा श्‍वास  कोंडला जात आहे. याबाबत तालुका कृषी अधिकारी  समाधान पडधान यांना फोन केला असता, त्यांनी रिस् पॉन्स न देता फोन कट केला, ही त्यांची नित्याचीच  बाब आहे.