‘कोविड-१९’च्या प्रकोपामुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक नियोजन कोसळले आहे. एकीकडे त्याला आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असे वाटते, तर दुसरीकडे आर्थिक बाबतीत तो हतबल आहे. ऑनलाईन शिक्षणासाठी संगणक किंवा स्मार्टफोन, टॅब्लेट अत्यावश्यच आहे. गोरगरीब पालकांची आर्थिक स्थिती नाही. कसाबसा मोबाईल घेतला तरी दर महिन्याला इंटरनेटचा खर्च करावा लागत आहे. शिवाय अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके आणि वह्यासुद्धा घ्याव्या लागत असल्याने ऑफलाईन शिक्षणापेक्षा ऑनलाईन शिक्षणाने पालकांचे कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. त्यातच ग्रामीण भागांत इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने ऑनलाईन शिक्षणाचा कोणताही फायदा होत नसून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर मोठा परिणाम होत आहे.
------
१) जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी
१) पहिली - १९,६९०
२) दुसरी - २०,९९८
३) तिसरी - १९,६९८
४) चौथी - २१,१७७
५) पाचवी - २१,०५२
६) सहावी - २१,१३६
७) सातवी -२१,४३६
८) आठवी - २१,५००
९) नववी - २०,७००
१०) दहावी - १९,७१५
२) वेगवेगळी सीम घेऊनही फायदा नाही
कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. यासाठी मोबाईल किंवा टॅब्लेटवर इंटरनेट चालू ठेवावे लागते. महिन्याकाठी पालकांना इंटरनेटवर किमान ३०० रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यातही ग्रामीण भागात इंटरनेट सुविधा विस्कळीत असल्याने एकाऐवजी दोन, तीन कंपन्यांची सीम कार्ड घेऊनही फायदा होत नसल्याचे दिसते.
------------------
१) कोट : कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे पाल्यासाठी ८,५०० रुपयांचे दोन स्वतंत्र स्मार्टफोन घ्यावे लागले. दर महिन्याला एका कंपनीच्या सीम रिचार्जसाठी २४९ रुपये खर्च करावा लागतो. त्यात इंटरनेट सेवा विस्कळीत असल्याने दोन सीम घेतली. परंतु फायदा होत नाही.
-गजानन ढोक, पालक,
---------------------
२) कोट : यंदाही कोरोनामुळे शाळा बंदच असून, विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. मला दोन मुले आहेत. त्यांच्या ऑनलाईन क्लासची वेळ वेगवेगळी असली तरी ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी मोबाईलमधील स्टोरेज स्पेस पुरत नाही. त्यात इंटरनेटही नसते. त्यामुळे पाल्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
-नितीन उपाध्ये,
पालक.