शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

स्वयंचलित हवामान केंद्र स्थापनेचा तिढा सुटला!

By admin | Updated: July 5, 2017 01:17 IST

‘लोकमत’ने वेधले होते लक्ष : जिल्ह्यात ४६ मंडळातील स्थळे निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या निर्णयानुसार, जिल्ह्यात महसूल मंडळनिहाय हवामान तपासणी केंद्र स्थापनेच्या प्रक्रियेला वेग मिळाला आहे. स्वयंचलित हवामान केंद्रांच्या स्थापनेसाठी जागा निश्चित करण्यात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करून जिल्ह्यातील सर्वच ४६ मंडळात स्वयंचलित हवामान केंद्रांसाठी स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी पुढील कार्यवाहीसुद्धा सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी देण्यात आली. स्वयंचलित हवामान केंद्रांसाठी जागा निश्चितीकरणात निर्माण झालेल्या तिढ्याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. महाराष्ट्रात सुमारे २,०६५ हवामान केंद्र सार्वजनिक खासगी भागीदारी (पब्लिक प्रायव्हेटर पार्टनरशिप) मॉडेल येणार आहेत. यातील १ हजार केंद्र चालू महिन्याच्या अखेरपर्यंत अर्थात जून २०१७ पर्यंत स्थापित होण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा आणि शेती उद्योग यशस्वीपणे करता यावा म्हणून शासनाने राज्यभरातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील ४६ मंडळात ही हवामान केंद्र स्थापन होणार आहेत. तथापि, हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्थळांचे निश्चितीकरण करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत केवळ १६ स्थळे निश्चित होऊ शकली होती. संबंधित विभागांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार कार्यवाही करून त्यांच्याकडे या संदर्भातील अहवाल सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर कृषी आणि महसूल विभागाकडून आता उर्वरित ३६ स्थळे निश्चित करण्यात आली असून, स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यासाठी त्या सर्वच ठिकाणी पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. राज्यात हवामान केंद्रांची स्थापना करण्यासाठी शासनाचा स्कायमेट कंपनीशी करार झाला आहे. शेतकऱ्यांना मिळेल अचूक माहिती हवामानाचा अंदाज यावा म्हणून राज्यात पूर्वी एकूण ८ हवामान केंद्रे होती; मात्र शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा आणि आपला शेती उद्योग यशस्वीपणे करता यावा, यासाठी राज्य शासनाने राज्यात २ हजार हवामान केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. यामुळे वाऱ्याची दिशा, वाऱ्याची गती, हवेचे तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि पावसाचे परिमाण मोजले जाईल. ही माहिती शेतकऱ्यांबरोबर शेअर केली जाईल, ज्यामुळे त्यांना हवामानाच्या अनुसार उत्तम व नियोजनबद्ध पद्धतीने पेरणी करता येईल. शेतकऱ्यांसाठी विविध क्षेत्रातील हवामानविषयक स्थिती महावेध पोर्टल (महाराष्ट्र कृषी हवामान माहिती नेटवर्क) आणि स्कायमेटच्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर उपलब्ध असेल.