शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

स्वयंचलित हवामान केंद्र स्थापनेचा तिढा सुटला!

By admin | Updated: July 5, 2017 01:17 IST

‘लोकमत’ने वेधले होते लक्ष : जिल्ह्यात ४६ मंडळातील स्थळे निश्चित

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य शासनाच्या निर्णयानुसार, जिल्ह्यात महसूल मंडळनिहाय हवामान तपासणी केंद्र स्थापनेच्या प्रक्रियेला वेग मिळाला आहे. स्वयंचलित हवामान केंद्रांच्या स्थापनेसाठी जागा निश्चित करण्यात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी दूर करून जिल्ह्यातील सर्वच ४६ मंडळात स्वयंचलित हवामान केंद्रांसाठी स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी पुढील कार्यवाहीसुद्धा सुरू झाली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून मंगळवारी देण्यात आली. स्वयंचलित हवामान केंद्रांसाठी जागा निश्चितीकरणात निर्माण झालेल्या तिढ्याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. महाराष्ट्रात सुमारे २,०६५ हवामान केंद्र सार्वजनिक खासगी भागीदारी (पब्लिक प्रायव्हेटर पार्टनरशिप) मॉडेल येणार आहेत. यातील १ हजार केंद्र चालू महिन्याच्या अखेरपर्यंत अर्थात जून २०१७ पर्यंत स्थापित होण्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. नागपूर जिल्ह्यातील डोंगरगाव येथे मे महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या स्वयंचलित हवामान केंद्राचे उद्घाटनही करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा आणि शेती उद्योग यशस्वीपणे करता यावा म्हणून शासनाने राज्यभरातील प्रत्येक महसूल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील ४६ मंडळात ही हवामान केंद्र स्थापन होणार आहेत. तथापि, हवामान केंद्र स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्थळांचे निश्चितीकरण करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे जून महिन्याच्या १५ तारखेपर्यंत केवळ १६ स्थळे निश्चित होऊ शकली होती. संबंधित विभागांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार कार्यवाही करून त्यांच्याकडे या संदर्भातील अहवाल सादर केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर कृषी आणि महसूल विभागाकडून आता उर्वरित ३६ स्थळे निश्चित करण्यात आली असून, स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यासाठी त्या सर्वच ठिकाणी पुढील कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. राज्यात हवामान केंद्रांची स्थापना करण्यासाठी शासनाचा स्कायमेट कंपनीशी करार झाला आहे. शेतकऱ्यांना मिळेल अचूक माहिती हवामानाचा अंदाज यावा म्हणून राज्यात पूर्वी एकूण ८ हवामान केंद्रे होती; मात्र शेतकऱ्यांना हवामानाचा अचूक अंदाज यावा आणि आपला शेती उद्योग यशस्वीपणे करता यावा, यासाठी राज्य शासनाने राज्यात २ हजार हवामान केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा देशातील एकमेव प्रकल्प आहे. यामुळे वाऱ्याची दिशा, वाऱ्याची गती, हवेचे तापमान, सापेक्ष आर्द्रता आणि पावसाचे परिमाण मोजले जाईल. ही माहिती शेतकऱ्यांबरोबर शेअर केली जाईल, ज्यामुळे त्यांना हवामानाच्या अनुसार उत्तम व नियोजनबद्ध पद्धतीने पेरणी करता येईल. शेतकऱ्यांसाठी विविध क्षेत्रातील हवामानविषयक स्थिती महावेध पोर्टल (महाराष्ट्र कृषी हवामान माहिती नेटवर्क) आणि स्कायमेटच्या मोबाइल अ‍ॅप्लिकेशनवर उपलब्ध असेल.