शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव; उपाययोजना करण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST

वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. अशातच मागील आठवड्यात पावसास सुरुवात ...

वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. अशातच मागील आठवड्यात पावसास सुरुवात झाली असून, रिमझिम पाऊस आणि सतत ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर ताबेंरा, पानावरील ठिपके यासारख्या बुरशीजन्य रोगांचा, तसेच पाने खाणाऱ्या अळीचा, रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकऱ्यांनी या पिकावरील कीड व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.

हिरवी अळी व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाची पातळी समजण्यासाठी सर्वेक्षणाकरिता प्रति हेक्टरी हिरवी अळीसाठी ५ व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी पाच कामगंध सापळे शेतामध्येत लावावेत. तसेच इंग्रजी ‘टी’ आकाराचे हेक्टरी १० ते १५ पक्षी थांबे शेतात लावावेत. पेरणीनंतर २५ दिवसांपर्यंत ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी. निरीक्षणे घेण्याकरिता हेक्टरी ५ कामगंध सापळे लावून नियमित नि‍रीक्षणे घ्यावीत व आर्थिक नुकसान पातळीच्यावर किडीची संख्या आढळल्यास तत्काळ शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्लाही तोटावार यांनी दिला. चक्रीभुंगा प्रति मीटर ३ ते ४ अळ्या, खोडमाशी १० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे, हिरवी उंट अळी ४ लहान अळ्या प्रति मीटर ओळीत, स्पोडोप्टेरा (तंबाखुवरील पाने खाणारी अळी) ३ ते ४ अळ्या प्रति मीटर ओळीत यापेक्षा जास्त आढळल्यास नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. त्यानंतर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या (स्पोडोप्टेरा) अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. ५०० एल ई विषाणूची २ मिली प्रति लिटर पाणी किंवा नोमोरिया रिलाई या बुरुशीची ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. रासायनिक घटकांची फवारणी करत असताना शेतकरीबंधूंनी सर्व सुरक्षा विषयक किटचा वापर करावा, असे आवाहनही तोटावार यांनी केले.

००००००००

फळझाडावर गोगलगायीचा प्रादुर्भाव

काही भागांत सोयाबीन तसेच इतर संत्रावर्गीय फळझाडांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. गोगलगाय हा मृदकाय व उदरपाद वर्गात येणारा प्राणी आहे. गोगलगायीच्या शरीरावर कवच असते, यालाच शंख म्हणतात. गोगलगायीचे नियंत्रण मोहीम स्वरूपात सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी करणे अपेक्षित आहे. नियंत्रणाकरिता मशागतीय पद्धत, रासायनिक पध्दत, जैविक पद्धतीचा अवलंब करावा. गोगलगायी मुख्यतः रात्रीच्या वेळी कोवळे पाने, कंद फळे यांना छिद्र पाडून खातात. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा उपद्रव टाळण्यासाठी शेताभोवती दोन मीटर रुंदीच्या पट्ट्या राख पसरावी व त्यावर मोरचूद व कळीचा चुना २ : ३ प्रमाणात मिसळून त्याचा थर राखेवर द्यावा. अशा ठिकाणी गोगलगाय येत नाही.