शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

सोयाबीनवर किडींचा प्रादुर्भाव; उपाययोजना करण्याचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST

वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. अशातच मागील आठवड्यात पावसास सुरुवात ...

वाशिम : जिल्ह्यात सोयाबीन पीक वाढीच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे. अशातच मागील आठवड्यात पावसास सुरुवात झाली असून, रिमझिम पाऊस आणि सतत ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन पिकावर ताबेंरा, पानावरील ठिपके यासारख्या बुरशीजन्य रोगांचा, तसेच पाने खाणाऱ्या अळीचा, रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होत आहे. शेतकऱ्यांनी या पिकावरील कीड व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले.

हिरवी अळी व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीच्या प्रादुर्भावाची पातळी समजण्यासाठी सर्वेक्षणाकरिता प्रति हेक्टरी हिरवी अळीसाठी ५ व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीसाठी पाच कामगंध सापळे शेतामध्येत लावावेत. तसेच इंग्रजी ‘टी’ आकाराचे हेक्टरी १० ते १५ पक्षी थांबे शेतात लावावेत. पेरणीनंतर २५ दिवसांपर्यंत ५ टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी. निरीक्षणे घेण्याकरिता हेक्टरी ५ कामगंध सापळे लावून नियमित नि‍रीक्षणे घ्यावीत व आर्थिक नुकसान पातळीच्यावर किडीची संख्या आढळल्यास तत्काळ शिफारस केलेल्या कीटकनाशकाची फवारणी करावी, असा सल्लाही तोटावार यांनी दिला. चक्रीभुंगा प्रति मीटर ३ ते ४ अळ्या, खोडमाशी १० टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे, हिरवी उंट अळी ४ लहान अळ्या प्रति मीटर ओळीत, स्पोडोप्टेरा (तंबाखुवरील पाने खाणारी अळी) ३ ते ४ अळ्या प्रति मीटर ओळीत यापेक्षा जास्त आढळल्यास नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात. त्यानंतर तंबाखूवरील पाने खाणाऱ्या (स्पोडोप्टेरा) अळीच्या व्यवस्थापनासाठी एस.एल.एन.पी.व्ही. ५०० एल ई विषाणूची २ मिली प्रति लिटर पाणी किंवा नोमोरिया रिलाई या बुरुशीची ४ ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. रासायनिक घटकांची फवारणी करत असताना शेतकरीबंधूंनी सर्व सुरक्षा विषयक किटचा वापर करावा, असे आवाहनही तोटावार यांनी केले.

००००००००

फळझाडावर गोगलगायीचा प्रादुर्भाव

काही भागांत सोयाबीन तसेच इतर संत्रावर्गीय फळझाडांवर गोगलगायीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. गोगलगाय हा मृदकाय व उदरपाद वर्गात येणारा प्राणी आहे. गोगलगायीच्या शरीरावर कवच असते, यालाच शंख म्हणतात. गोगलगायीचे नियंत्रण मोहीम स्वरूपात सर्व शेतकऱ्यांनी एकाच वेळी करणे अपेक्षित आहे. नियंत्रणाकरिता मशागतीय पद्धत, रासायनिक पध्दत, जैविक पद्धतीचा अवलंब करावा. गोगलगायी मुख्यतः रात्रीच्या वेळी कोवळे पाने, कंद फळे यांना छिद्र पाडून खातात. त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हा उपद्रव टाळण्यासाठी शेताभोवती दोन मीटर रुंदीच्या पट्ट्या राख पसरावी व त्यावर मोरचूद व कळीचा चुना २ : ३ प्रमाणात मिसळून त्याचा थर राखेवर द्यावा. अशा ठिकाणी गोगलगाय येत नाही.