शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

रोहयोच्या कामांबाबत उदासीनता!

By admin | Updated: February 22, 2017 02:25 IST

वाशिम जिल्ह्यातील वास्तव; कृषी विभागाकडून अनेक कामांना प्रारंभच नाही.

दादाराव गायकवाड वाशिम, दि. २१-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या महत्वाकांक्षी ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासन उदासीन दिसत आहे. त्यामुळेच या कार्यक्रमांतर्गत सन २0१५-१७ च्या निर्धारित उद्दिष्टातील सिंचन विहिरी वगळता निम्म्याहून अधिक कामांना अद्याप जिल्ह्यात सुरवातही झालेली नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या ११ कलमी कार्यक्रमातून प्रामुख्याने सिंचन विहिर, शेततळे, कंपोस्टिंग, फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे, गावतलाव व जलसंधारणाची कामे, रोपवाटिका, वृक्षलागवड व संगोपन, क्रीडांगणे, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभीकरणासह अन्य कामाचा समावेश आहे. त्याशिवास पंचायत समिती, जलसंधारण विभाग, वनविभाग, सामाजिक वणीकरण विभागाच्या रोपनिर्मिती आणि वृक्षलागवडीच्या कामांची स्थितीही दयनीय आहे. यात कृषी विभागांतर्गत जिल्ह्यात ५४८ शेततळय़ांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. त्यातील केवळ ३ शेततळय़ांना तांत्रिक मान्यता देण्यात आली. अद्याप एकही काम पूर्ण झाले नाही. व्हर्मी कंपोस्टचे उद्दिष्ट ५४८ असताना त्यापैकी ३६ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली. नाडेप कंपोस्ट टँकचे निर्धारित उद्दिष्ट ४७५ असताना केवळ ९५ कामांना तांत्रिक, तर ५५ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ४0 कामांना सुरूवात करण्यात आली. फळबाग लागवड कार्यक्रमाचे निर्धारित उद्दिष्ट ७५0 हेक्टर असताना २३३ कामांना तांत्रिक आणि प्रशासकीय कामांना मान्यता मिळाल्यानंतर त्यातील केवळ ७१ कामे सुरू करण्यात आली; मात्र अद्याप एकही पूर्ण होऊ शकले नाही. प्रत्यक्षात रोहयोची कामे झाल्यास ग्रामीण कामगारांना रोजगार मिळू शकतो. त्यातच कृषी विभागाकडील शेततळे, कपोस्टिंग टँक आणि फळबाग लागवडीची कामे केल्यास शेतकर्‍यांचा विकास होऊन शेतमजुरांच्या हाताला वर्षभर काम असेल आणि कंपोस्ट खतांच्या वापरामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन पर्यावरण रक्षणाचा उद्देशही साध्य होऊ शकतो; परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शासनाच्या उदात्त हेतुला हरताळ फासला जात आहे. २३00 कामांपैकी एकही काम पूर्ण नाहीजिलत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी विभागाला शेततळे, कंपोस्ट टँक, फळबाग लागवडीसह एकूण २ हजार ३२१ कामांचे उद्दिष्ट २0१६-१७ या आर्थिक वर्षासाठी देण्यात आले होते. तथापि, हे आर्थिक वर्ष संपत आले असले तरी, यातील केवळ ११७ कामे सुरू करण्यात आली असून, गत ९ महिन्यांत एकही काम पूर्ण करता आले नाही.

रोहयोच्या कामांची स्थिती निश्‍चितच वाईट आहे. कित्येक कामांना अद्याप सुरुवात झाली नाही, हे वास्तव आहे. संबंधित विभागाच्या प्रशासनाने गंभीरपणे काम न केल्यानेच १0 महिन्यांत काही विभागाचे एकही काम पूर्ण झाले नाही. आम्ही सध्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने याबाबत तात्काळ मार्गदर्शन शक्य नाही; परंतू निवडणूक संपताच पूर्वी पेक्षाही अधिक तत्परतेने कामांचा आढावा घेऊन, ही कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देऊ. -सुनील कोरडेउपजिल्हाधिकारी (रोहयो)वाशिम