शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

रोहयोच्या कामांबाबत उदासीनता!

By admin | Updated: February 22, 2017 02:25 IST

वाशिम जिल्ह्यातील वास्तव; कृषी विभागाकडून अनेक कामांना प्रारंभच नाही.

दादाराव गायकवाड वाशिम, दि. २१-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या महत्वाकांक्षी ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासन उदासीन दिसत आहे. त्यामुळेच या कार्यक्रमांतर्गत सन २0१५-१७ च्या निर्धारित उद्दिष्टातील सिंचन विहिरी वगळता निम्म्याहून अधिक कामांना अद्याप जिल्ह्यात सुरवातही झालेली नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या ११ कलमी कार्यक्रमातून प्रामुख्याने सिंचन विहिर, शेततळे, कंपोस्टिंग, फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे, गावतलाव व जलसंधारणाची कामे, रोपवाटिका, वृक्षलागवड व संगोपन, क्रीडांगणे, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभीकरणासह अन्य कामाचा समावेश आहे. त्याशिवास पंचायत समिती, जलसंधारण विभाग, वनविभाग, सामाजिक वणीकरण विभागाच्या रोपनिर्मिती आणि वृक्षलागवडीच्या कामांची स्थितीही दयनीय आहे. यात कृषी विभागांतर्गत जिल्ह्यात ५४८ शेततळय़ांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. त्यातील केवळ ३ शेततळय़ांना तांत्रिक मान्यता देण्यात आली. अद्याप एकही काम पूर्ण झाले नाही. व्हर्मी कंपोस्टचे उद्दिष्ट ५४८ असताना त्यापैकी ३६ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली. नाडेप कंपोस्ट टँकचे निर्धारित उद्दिष्ट ४७५ असताना केवळ ९५ कामांना तांत्रिक, तर ५५ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ४0 कामांना सुरूवात करण्यात आली. फळबाग लागवड कार्यक्रमाचे निर्धारित उद्दिष्ट ७५0 हेक्टर असताना २३३ कामांना तांत्रिक आणि प्रशासकीय कामांना मान्यता मिळाल्यानंतर त्यातील केवळ ७१ कामे सुरू करण्यात आली; मात्र अद्याप एकही पूर्ण होऊ शकले नाही. प्रत्यक्षात रोहयोची कामे झाल्यास ग्रामीण कामगारांना रोजगार मिळू शकतो. त्यातच कृषी विभागाकडील शेततळे, कपोस्टिंग टँक आणि फळबाग लागवडीची कामे केल्यास शेतकर्‍यांचा विकास होऊन शेतमजुरांच्या हाताला वर्षभर काम असेल आणि कंपोस्ट खतांच्या वापरामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन पर्यावरण रक्षणाचा उद्देशही साध्य होऊ शकतो; परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शासनाच्या उदात्त हेतुला हरताळ फासला जात आहे. २३00 कामांपैकी एकही काम पूर्ण नाहीजिलत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी विभागाला शेततळे, कंपोस्ट टँक, फळबाग लागवडीसह एकूण २ हजार ३२१ कामांचे उद्दिष्ट २0१६-१७ या आर्थिक वर्षासाठी देण्यात आले होते. तथापि, हे आर्थिक वर्ष संपत आले असले तरी, यातील केवळ ११७ कामे सुरू करण्यात आली असून, गत ९ महिन्यांत एकही काम पूर्ण करता आले नाही.

रोहयोच्या कामांची स्थिती निश्‍चितच वाईट आहे. कित्येक कामांना अद्याप सुरुवात झाली नाही, हे वास्तव आहे. संबंधित विभागाच्या प्रशासनाने गंभीरपणे काम न केल्यानेच १0 महिन्यांत काही विभागाचे एकही काम पूर्ण झाले नाही. आम्ही सध्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने याबाबत तात्काळ मार्गदर्शन शक्य नाही; परंतू निवडणूक संपताच पूर्वी पेक्षाही अधिक तत्परतेने कामांचा आढावा घेऊन, ही कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देऊ. -सुनील कोरडेउपजिल्हाधिकारी (रोहयो)वाशिम