शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

रोहयोच्या कामांबाबत उदासीनता!

By admin | Updated: February 22, 2017 02:25 IST

वाशिम जिल्ह्यातील वास्तव; कृषी विभागाकडून अनेक कामांना प्रारंभच नाही.

दादाराव गायकवाड वाशिम, दि. २१-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या महत्वाकांक्षी ११ कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत प्रशासन उदासीन दिसत आहे. त्यामुळेच या कार्यक्रमांतर्गत सन २0१५-१७ च्या निर्धारित उद्दिष्टातील सिंचन विहिरी वगळता निम्म्याहून अधिक कामांना अद्याप जिल्ह्यात सुरवातही झालेली नाही. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या ११ कलमी कार्यक्रमातून प्रामुख्याने सिंचन विहिर, शेततळे, कंपोस्टिंग, फळबाग लागवड, शौचालय, शोषखड्डे, गावतलाव व जलसंधारणाची कामे, रोपवाटिका, वृक्षलागवड व संगोपन, क्रीडांगणे, अंगणवाडी, स्मशानभूमी सुशोभीकरणासह अन्य कामाचा समावेश आहे. त्याशिवास पंचायत समिती, जलसंधारण विभाग, वनविभाग, सामाजिक वणीकरण विभागाच्या रोपनिर्मिती आणि वृक्षलागवडीच्या कामांची स्थितीही दयनीय आहे. यात कृषी विभागांतर्गत जिल्ह्यात ५४८ शेततळय़ांचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले होते. त्यातील केवळ ३ शेततळय़ांना तांत्रिक मान्यता देण्यात आली. अद्याप एकही काम पूर्ण झाले नाही. व्हर्मी कंपोस्टचे उद्दिष्ट ५४८ असताना त्यापैकी ३६ कामांना तांत्रिक मान्यता देण्यात आली. नाडेप कंपोस्ट टँकचे निर्धारित उद्दिष्ट ४७५ असताना केवळ ९५ कामांना तांत्रिक, तर ५५ कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर ४0 कामांना सुरूवात करण्यात आली. फळबाग लागवड कार्यक्रमाचे निर्धारित उद्दिष्ट ७५0 हेक्टर असताना २३३ कामांना तांत्रिक आणि प्रशासकीय कामांना मान्यता मिळाल्यानंतर त्यातील केवळ ७१ कामे सुरू करण्यात आली; मात्र अद्याप एकही पूर्ण होऊ शकले नाही. प्रत्यक्षात रोहयोची कामे झाल्यास ग्रामीण कामगारांना रोजगार मिळू शकतो. त्यातच कृषी विभागाकडील शेततळे, कपोस्टिंग टँक आणि फळबाग लागवडीची कामे केल्यास शेतकर्‍यांचा विकास होऊन शेतमजुरांच्या हाताला वर्षभर काम असेल आणि कंपोस्ट खतांच्या वापरामुळे रासायनिक खतांचा वापर कमी होऊन पर्यावरण रक्षणाचा उद्देशही साध्य होऊ शकतो; परंतु प्रशासनाच्या उदासीनतेमुळे शासनाच्या उदात्त हेतुला हरताळ फासला जात आहे. २३00 कामांपैकी एकही काम पूर्ण नाहीजिलत राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कृषी विभागाला शेततळे, कंपोस्ट टँक, फळबाग लागवडीसह एकूण २ हजार ३२१ कामांचे उद्दिष्ट २0१६-१७ या आर्थिक वर्षासाठी देण्यात आले होते. तथापि, हे आर्थिक वर्ष संपत आले असले तरी, यातील केवळ ११७ कामे सुरू करण्यात आली असून, गत ९ महिन्यांत एकही काम पूर्ण करता आले नाही.

रोहयोच्या कामांची स्थिती निश्‍चितच वाईट आहे. कित्येक कामांना अद्याप सुरुवात झाली नाही, हे वास्तव आहे. संबंधित विभागाच्या प्रशासनाने गंभीरपणे काम न केल्यानेच १0 महिन्यांत काही विभागाचे एकही काम पूर्ण झाले नाही. आम्ही सध्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत व्यस्त असल्याने याबाबत तात्काळ मार्गदर्शन शक्य नाही; परंतू निवडणूक संपताच पूर्वी पेक्षाही अधिक तत्परतेने कामांचा आढावा घेऊन, ही कामे पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागाला आदेश देऊ. -सुनील कोरडेउपजिल्हाधिकारी (रोहयो)वाशिम