शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

जखमी वळूला गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे मिळाले जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:30 IST

ग्रामीण जीवन हे शेतीवर आधारित असल्यामुळे पशुपालक शेतकरी मंडळी आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात या श्रद्धेपोटी आजूबाजूच्या देवस्थानांना गाई ...

ग्रामीण जीवन हे शेतीवर आधारित असल्यामुळे पशुपालक शेतकरी मंडळी आपल्या आशा-आकांक्षा पूर्ण व्हाव्यात या श्रद्धेपोटी आजूबाजूच्या देवस्थानांना गाई / गोऱ्हे देवाच्या नावाने दान स्वरूपात सोडत असतात. असेच सावळी येथील श्रद्धाळूने वाई गौळला सोडलेला एक वळू मागील अनेक वर्षांपासून या गावात वास्तव्याला आहे. वाई गौळला इतरही तीन ते चार लहान-मोठे वळू आज रोजी भाविकांनी सोडलेले आहेत. बैलाची शिंगे साधारणतः वरच्या दिशेने वाढीत असतात; परंतु वाई गौळला असलेल्या या वळूची शिंगे ही खालच्या दिशेने वाढ होऊन डोळ्यांखालील भागात रुतून ह्या वळूला मोठ्या जखमा झाल्या आहेत. यामुळे वळूला दिसणे आणि चालणे-फिरणे व खाणेपिणेही बंद झालेले होते.

वाई गौळ येथील जागरूक नागरिक सुशील चव्हाण यांच्या नजरेत जखमी वळू आल्यानंतर त्यांनी गावातील प्रवीण चव्हाण, विलास राठोड, इंदल राठोड, योगेश जाधव, अमोल राठोड यांच्या मदतीने दोन्ही शिंगे काही प्रमाणात कापून आणि जखमेवर औषधाेपचार केल्याने वळूचे प्राण वाचलेले आहेत.