शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पावसाअभावी उद्योग, व्यवसाय थंडावले

By admin | Updated: August 27, 2014 00:12 IST

गतवर्षीपेक्षा खुपच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे कोरड्या दुष्काळाचे संकटही ओढवले आहे.

मंगरुळपीर : यंदा आजवर झालेल्या अत्यल्प पावसाचा समाजाच्या सर्वच स्तरावर प्रभाव पडलेला दिसत आहे. लहानमोठे उद्योगधंदे थंडावले आहेत, शेतीची कामेही बंद पडल्यामुळे हातमजुरीवर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला असताना गतवर्षीपेक्षा खुपच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे कोरड्या दुष्काळाचे संकटही ओढवले आहे. राज्य सरकारने तीन दिवसांपूर्वीच राज्यातील १२३ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. अत्यल्प पावसामुळे शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवल्यानंतर आता शेतात असलेले पिकही पावसाअभावी सुकत आहेत. पाऊसच नसल्यामुळे कित्येक ठिकाणी शेतीमधील कामे बंद पडली आहेत. उत्पादनात वाढ होण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे शेतकर्‍यांनी खत टाकण्यासह निदंन खुरपणासारख्या गोष्टींवर खर्च न करणेच पसंत केले आहे. पाऊसच नसल्यामुळे बांधकाम व्ययसायही बंद पडल्याने या क्षेत्रातील मजुरांना दुसर्‍या रोजगाराचा शोध घेत भटकावे लागत आहे. उपाहारगृहे, चहाच्या टपर्‍या आदि दुकानांवर गर्दी दिसत असली तरी, त्यामध्ये ग्राहकांची संख्या फारच नगण्य आहे. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात खरीपातील मुग, उडीदाची बाजारात खरेदी सुरू होते; परंतु यंदा थोड्याफार पावसावर पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांच्या पेरण्या दोन वेळा उलटल्या, त्यानंतर अनेकांनी मुग, उडीद या सारख्या पिकांकडे पाठच फिरविली. परिणामी मुग, उडीद कृषी उत्पन्न बाजारात दिसेनासेच झाल्याने या क्षेत्रातील मापारी, हमाल, अडत्यांचे सहकारी आदिंवर उपासमारीची पाळी आली आहे.