शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

पावसाअभावी उद्योग, व्यवसाय थंडावले

By admin | Updated: August 27, 2014 00:12 IST

गतवर्षीपेक्षा खुपच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे कोरड्या दुष्काळाचे संकटही ओढवले आहे.

मंगरुळपीर : यंदा आजवर झालेल्या अत्यल्प पावसाचा समाजाच्या सर्वच स्तरावर प्रभाव पडलेला दिसत आहे. लहानमोठे उद्योगधंदे थंडावले आहेत, शेतीची कामेही बंद पडल्यामुळे हातमजुरीवर पोट असलेल्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला असताना गतवर्षीपेक्षा खुपच कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे कोरड्या दुष्काळाचे संकटही ओढवले आहे. राज्य सरकारने तीन दिवसांपूर्वीच राज्यातील १२३ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर केले आहेत. अत्यल्प पावसामुळे शेतकर्‍यांवर दुबार, तिबार पेरणीचे संकट ओढवल्यानंतर आता शेतात असलेले पिकही पावसाअभावी सुकत आहेत. पाऊसच नसल्यामुळे कित्येक ठिकाणी शेतीमधील कामे बंद पडली आहेत. उत्पादनात वाढ होण्याची सुतराम शक्यता नसल्यामुळे शेतकर्‍यांनी खत टाकण्यासह निदंन खुरपणासारख्या गोष्टींवर खर्च न करणेच पसंत केले आहे. पाऊसच नसल्यामुळे बांधकाम व्ययसायही बंद पडल्याने या क्षेत्रातील मजुरांना दुसर्‍या रोजगाराचा शोध घेत भटकावे लागत आहे. उपाहारगृहे, चहाच्या टपर्‍या आदि दुकानांवर गर्दी दिसत असली तरी, त्यामध्ये ग्राहकांची संख्या फारच नगण्य आहे. ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात खरीपातील मुग, उडीदाची बाजारात खरेदी सुरू होते; परंतु यंदा थोड्याफार पावसावर पेरणी करणार्‍या शेतकर्‍यांच्या पेरण्या दोन वेळा उलटल्या, त्यानंतर अनेकांनी मुग, उडीद या सारख्या पिकांकडे पाठच फिरविली. परिणामी मुग, उडीद कृषी उत्पन्न बाजारात दिसेनासेच झाल्याने या क्षेत्रातील मापारी, हमाल, अडत्यांचे सहकारी आदिंवर उपासमारीची पाळी आली आहे.