शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
3
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
4
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
5
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
6
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
7
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
8
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
9
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
10
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
11
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
12
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
14
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
15
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
16
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
17
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
18
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
19
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
20
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू

कोरोना काळात मानसिक ताणामुळे आत्महत्येच्या प्रयत्नांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST

कोरोना संसर्गामुळे शासनाने २३ मार्च २०२० पासून जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांना रोजगार गमवावा लागला, तर ...

कोरोना संसर्गामुळे शासनाने २३ मार्च २०२० पासून जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांना रोजगार गमवावा लागला, तर कोरोनाच्या आजारामुळे अनेकांना लाखो रुपये खर्च करावे लागले. आर्थिक संकट ओढवल्याने कुटुंबाचा गाडा चालविणे कठीण बनल्याने अनेकांच्या मनात आत्महत्येचा विचार घोळू लागला. अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पोलिसांकडील माहितीनुसार वाशिम शहरात २०२० या वर्षात एकूण ३२, तर २०२१ मध्ये १८ जूनपर्यंत १५ आत्महत्येच्या घटना घडल्या. त्यात काहींनी नैराश्य येऊन मानसिक व आर्थिक ताण वाढल्याने आत्महत्या केली.

-----

बॉक्स : कोणत्या वयोगटाचे किती

१) २५ वर्षांपेक्षा कमी - ०८

२) २६ ते ४० - १५

३) ४१ - ६० - १९

४) ६१ वर्षांपेक्षा अधिक - ०५

--बॉक्स:

हे दिवसही जातील

१) कोरोनामुळे व्यवसायावर आलेली अवकळा दूर सारून नव्याने सुरुवात केल्यास स्थिती बदलेल.

२) लॉकडाऊनमुळे आलेले संकट कायम राहणार नसून, त्यातून सावरण्याचा प्रयत्न केल्यास काहीही कठीण नाही.

३) अनेकांना कोरोना काळात संकटांचा सामना करावा लागला. यातील बहुतांश मंडळी आता सावरू लागली आहेत.

-------

बॉक्स:

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

कोरोना काळात आजार व विविध कारणांमुळे नैराश्य व मानसिक ताण आल्याने व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकते. हे टाळण्यासाठी कुटुंबाने संबंधित व्यक्तीला मानसिक आधार देणे, त्याच्या मनातील नैराश्य दूर करणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीला आपण एकटे नाही, आपणास मदत करणारे, समजून घेणारे आहेत, असे पटवून देणे आवश्यक आहे.

----

बॉक्स : मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

१) कोट :

कोरोना संसर्गाच्या काळात आजार, ठप्प झालेला व्यवसाय, गमावलेला रोजगार आदी कारणांमुळे अनेकांना नैराश्य येऊन, मानसिक ताण वाढल्याने मनात आत्महत्येचा विचारही येत आहे; परंतु याच कारणांमुळे आत्महत्येचे प्रमाण फारसे वाढले, असे म्हणता येणार नाही.

- डॉ. प्रज्ञा इंगळे,

मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम

-------------------

२) कोट :

कोरोना काळात विविध कारणांमुळे अनेकांची मानसिक स्थिती बदलली आहे. अनेक जण डिप्रेशनमध्ये गेले आहेत, अनेकांना एंक्झायटीही आलेली असून, अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचारही येत आहेत; परंतु आत्महत्या याच कारणांमुळे वाढल्या, असे म्हणता येणार नाही.

- डॉ. नरेश इंगळे,

मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम