शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना काळात मानसिक ताणामुळे आत्महत्येच्या प्रयत्नांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST

कोरोना संसर्गामुळे शासनाने २३ मार्च २०२० पासून जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांना रोजगार गमवावा लागला, तर ...

कोरोना संसर्गामुळे शासनाने २३ मार्च २०२० पासून जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांना रोजगार गमवावा लागला, तर कोरोनाच्या आजारामुळे अनेकांना लाखो रुपये खर्च करावे लागले. आर्थिक संकट ओढवल्याने कुटुंबाचा गाडा चालविणे कठीण बनल्याने अनेकांच्या मनात आत्महत्येचा विचार घोळू लागला. अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पोलिसांकडील माहितीनुसार वाशिम शहरात २०२० या वर्षात एकूण ३२, तर २०२१ मध्ये १८ जूनपर्यंत १५ आत्महत्येच्या घटना घडल्या. त्यात काहींनी नैराश्य येऊन मानसिक व आर्थिक ताण वाढल्याने आत्महत्या केली.

-----

बॉक्स : कोणत्या वयोगटाचे किती

१) २५ वर्षांपेक्षा कमी - ०८

२) २६ ते ४० - १५

३) ४१ - ६० - १९

४) ६१ वर्षांपेक्षा अधिक - ०५

--बॉक्स:

हे दिवसही जातील

१) कोरोनामुळे व्यवसायावर आलेली अवकळा दूर सारून नव्याने सुरुवात केल्यास स्थिती बदलेल.

२) लॉकडाऊनमुळे आलेले संकट कायम राहणार नसून, त्यातून सावरण्याचा प्रयत्न केल्यास काहीही कठीण नाही.

३) अनेकांना कोरोना काळात संकटांचा सामना करावा लागला. यातील बहुतांश मंडळी आता सावरू लागली आहेत.

-------

बॉक्स:

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

कोरोना काळात आजार व विविध कारणांमुळे नैराश्य व मानसिक ताण आल्याने व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकते. हे टाळण्यासाठी कुटुंबाने संबंधित व्यक्तीला मानसिक आधार देणे, त्याच्या मनातील नैराश्य दूर करणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीला आपण एकटे नाही, आपणास मदत करणारे, समजून घेणारे आहेत, असे पटवून देणे आवश्यक आहे.

----

बॉक्स : मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

१) कोट :

कोरोना संसर्गाच्या काळात आजार, ठप्प झालेला व्यवसाय, गमावलेला रोजगार आदी कारणांमुळे अनेकांना नैराश्य येऊन, मानसिक ताण वाढल्याने मनात आत्महत्येचा विचारही येत आहे; परंतु याच कारणांमुळे आत्महत्येचे प्रमाण फारसे वाढले, असे म्हणता येणार नाही.

- डॉ. प्रज्ञा इंगळे,

मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम

-------------------

२) कोट :

कोरोना काळात विविध कारणांमुळे अनेकांची मानसिक स्थिती बदलली आहे. अनेक जण डिप्रेशनमध्ये गेले आहेत, अनेकांना एंक्झायटीही आलेली असून, अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचारही येत आहेत; परंतु आत्महत्या याच कारणांमुळे वाढल्या, असे म्हणता येणार नाही.

- डॉ. नरेश इंगळे,

मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम