शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
2
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
3
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
4
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
5
Mumbai Rain Updates Live: मुंबईला उद्याही अतिवृष्टीचा इशारा, सतर्क राहण्याचे आवाहन!
6
शेवटचा श्रावण बुधवार: प्रदोष व्रतासह बुध पूजन; ‘अशी’ करा महादेवांची सेवा, शुभ-मंगल होईल!
7
सलग दुसऱ्या दिवशी बाजारात तेजी! रिलायन्स-टाटासह 'या' शेअर्स ठरले हिरो; कुठे झाली घसरण?
8
"तेजस्विनीचा रात्री ११ वाजता फोन आला अन्...", सुचित्रा बांदेकरांनी सांगितलं नक्की काय घडलं?
9
Thane Rain: कार भुयारी मार्गात फसली अन् मरता मरता...; ठाण्यातील घटनेचा थरारक व्हिडीओ
10
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
11
४४ रुपयांच्या स्मॉलकॅप स्टॉकमध्ये तेजी; ५ वर्षात दिला ४०,०००% रिटर्न, FII नं वाढवला हिस्सा
12
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
13
विधानसभा निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या नेत्याचे निलंबन भाजपकडून रद्द, राणेंची डोकेदुखी वाढणार?
14
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाच्या आगमनाला उरले ८ दिवस, घराबाहेर काढा 'या' वस्तू; ज्यामुळे राहू केतू करतात अमंगल!
15
मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे महाराष्ट्राचं 'मिनी काश्मीर'! तुम्ही कधी फिरायला गेलात का?
16
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
17
फक्त १० वर्षांत कोट्यधीश होण्याची संधी! पती-पत्नीसाठी आर्थिक तज्ज्ञांनी सांगितला ‘स्मार्ट’ गुंतवणूक प्लॅन
18
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
19
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
20
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?

कोरोना काळात मानसिक ताणामुळे आत्महत्येच्या प्रयत्नांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:27 IST

कोरोना संसर्गामुळे शासनाने २३ मार्च २०२० पासून जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांना रोजगार गमवावा लागला, तर ...

कोरोना संसर्गामुळे शासनाने २३ मार्च २०२० पासून जारी केलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अनेकांना रोजगार गमवावा लागला, तर कोरोनाच्या आजारामुळे अनेकांना लाखो रुपये खर्च करावे लागले. आर्थिक संकट ओढवल्याने कुटुंबाचा गाडा चालविणे कठीण बनल्याने अनेकांच्या मनात आत्महत्येचा विचार घोळू लागला. अनेकांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पोलिसांकडील माहितीनुसार वाशिम शहरात २०२० या वर्षात एकूण ३२, तर २०२१ मध्ये १८ जूनपर्यंत १५ आत्महत्येच्या घटना घडल्या. त्यात काहींनी नैराश्य येऊन मानसिक व आर्थिक ताण वाढल्याने आत्महत्या केली.

-----

बॉक्स : कोणत्या वयोगटाचे किती

१) २५ वर्षांपेक्षा कमी - ०८

२) २६ ते ४० - १५

३) ४१ - ६० - १९

४) ६१ वर्षांपेक्षा अधिक - ०५

--बॉक्स:

हे दिवसही जातील

१) कोरोनामुळे व्यवसायावर आलेली अवकळा दूर सारून नव्याने सुरुवात केल्यास स्थिती बदलेल.

२) लॉकडाऊनमुळे आलेले संकट कायम राहणार नसून, त्यातून सावरण्याचा प्रयत्न केल्यास काहीही कठीण नाही.

३) अनेकांना कोरोना काळात संकटांचा सामना करावा लागला. यातील बहुतांश मंडळी आता सावरू लागली आहेत.

-------

बॉक्स:

कुटुंबाने काळजी घेण्याची गरज

कोरोना काळात आजार व विविध कारणांमुळे नैराश्य व मानसिक ताण आल्याने व्यक्ती आत्महत्येस प्रवृत्त होऊ शकते. हे टाळण्यासाठी कुटुंबाने संबंधित व्यक्तीला मानसिक आधार देणे, त्याच्या मनातील नैराश्य दूर करणे आवश्यक आहे. त्या व्यक्तीला आपण एकटे नाही, आपणास मदत करणारे, समजून घेणारे आहेत, असे पटवून देणे आवश्यक आहे.

----

बॉक्स : मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

१) कोट :

कोरोना संसर्गाच्या काळात आजार, ठप्प झालेला व्यवसाय, गमावलेला रोजगार आदी कारणांमुळे अनेकांना नैराश्य येऊन, मानसिक ताण वाढल्याने मनात आत्महत्येचा विचारही येत आहे; परंतु याच कारणांमुळे आत्महत्येचे प्रमाण फारसे वाढले, असे म्हणता येणार नाही.

- डॉ. प्रज्ञा इंगळे,

मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम

-------------------

२) कोट :

कोरोना काळात विविध कारणांमुळे अनेकांची मानसिक स्थिती बदलली आहे. अनेक जण डिप्रेशनमध्ये गेले आहेत, अनेकांना एंक्झायटीही आलेली असून, अनेकांच्या मनात आत्महत्येचे विचारही येत आहेत; परंतु आत्महत्या याच कारणांमुळे वाढल्या, असे म्हणता येणार नाही.

- डॉ. नरेश इंगळे,

मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम