शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मानसिक ताण वाढला; जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:40 IST

वाशिम जिल्ह्यात ८ मे पर्यंत कोरोना बाधितांचा एकूण आकडा ३१ हजार ६०५ वर पोहोचला आहे. ३३२ जणांचा कोरोनाने मृत्यू ...

वाशिम जिल्ह्यात ८ मे पर्यंत कोरोना बाधितांचा एकूण आकडा ३१ हजार ६०५ वर पोहोचला आहे. ३३२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ४४७७ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय कोविड केअर सेंटर व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. दरम्यान, सातत्याने कोरोनासंबंधीच्या बातम्या, या संसर्गाने ओढवणाऱ्या मृत्यूच्या वार्ता ऐकून अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील काही नगरपालिकांनी नागरिकांवर ओढावणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी हेल्पलाईन तयार केली आहे; मात्र वाशिम किंवा जिल्ह्यातील इतर तीन नगरपालिका व दोन नगरपंचायतींमध्ये अशी कुठलीही सुविधा अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडणारे नागरिक मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.

..............................

बाॅक्स :

पुरूष सर्वाधिक तणावात

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रकोपामुळे महिलांच्या तुलनेत पुरूषच सर्वाधिक तणावात आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांवर नोकऱ्या जाण्याचे गडांतर ओढवले आहे. काही लोकांचे रोजगार अनेक दिवसांपासून ठप्प आहेत. यासह कोरोनाच्या काळातही नोकरीनिमित्त पुरूषांना सातत्याने बाहेर राहावे लागते. घरी परत गेल्यानंतर कुटुंबास आपल्यापासून काही धोका तर होणार नाही, या चिंतेने पुरूषांना ग्रासले आहे. ही कारणेच तणाव वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत.

.................

तरूणांचे प्रश्न वेगळेच

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या १४ महिन्यांपासून शिक्षण क्षेत्र पूर्ण कोलमडले आहे. ऑनलाईन शिक्षणाची मात्रा प्रभावी ठरली नाही. अशातच २०२१ मधील शैक्षणिक वर्षही संपुष्टात आले.

विशेषत: दहावी, बारावी व त्यापुढील शिक्षण घेत असलेल्या हुशार, होतकरू तरुणांच्या चिंतेत यामुळे भर पडली आहे. काही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.

कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष वाया जात असताना आयुष्यातील एक-एक वर्ष देखील कमी होत आहे. त्यामुळे कमी वयात अधिक शिक्षणासाठी धडपडणाऱ्या तरुण चिंतातूर झाले आहेत. यापुढेही शिक्षणाची स्थिती अशीच राहिली तर भविष्यात नोकरीचा प्रश्न गंभीर होणार, या विवंचनेत काही तरूण सापडले आहेत.

.......................

नोकरी गेली, आता काय करू

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने गेल्या १४ महिन्यांपासून अक्षरश: थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासन, प्रशासनास नाईलाजास्तव जमावबंदी, लाॅकडाऊन लावावा लागत आहे. यामुळे कारखाने, कंपन्या, बाजारपेठेतील दुकाने बंद राहून व्यवसाय ठप्प झालेला आहे. परिणामी, अनेकांच्या छोट्या-मोठ्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातील अनेकजण कुटुंबातील कर्ते पुरूष आहेत. नोकरी गेल्याने आता काय करावे, ही चिंता त्यांना सतावत आहे.

.....................

कोण म्हणतो पुरुष व्यक्त होत नाहीत?

कुटुंबातील प्रत्येकाच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळताना कर्त्या पुरूषांवर कोणतेही संकट आले तरी ते सहजासहजी व्यक्त होत नाहीत किंवा चेहऱ्यावरची चिंता घरच्यांना दाखवत नाहीत, असे मानले जाते, मात्र कोरोनाच्या संकटाने सर्व मर्यादा उघड केल्या आहेत. रोजगार ठप्प होण्यासह अनेकांना नोकऱ्या हातून निसटल्याने सातत्याने घरातच बसून राहावे लागत आहे. कुटुंबही याबाबत अवगत व्हावे, म्हणून पुरूषही आता मनमोकळणेपणाने व्यक्त व्हायला लागले आहेत.

.........................

कोट :

कोरोनाच्या संकटामुळे आज जो-तो मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे. या संकटाने अनेकांसमोर आर्थिक अडचण निर्माण केली आहे. त्याचा सर्वाधिक ताण साहजिकच पुरूषांवर येत आहे. त्यातूनच चिंता, नैराश्याने बहुतांश नागरिकांना ग्रासले आहे. हे टाळण्यासाठी नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे. दूरचित्रवाणीवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहणे, नियमित व्यायाम करणे, एकमेकांना आधार देणे, हेच त्यावरील रामबाण औषध ठरू शकते.

- डाॅ. नरेश इंगळे

मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम