शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

मानसिक ताण वाढला; जगायचे कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:40 IST

वाशिम जिल्ह्यात ८ मे पर्यंत कोरोना बाधितांचा एकूण आकडा ३१ हजार ६०५ वर पोहोचला आहे. ३३२ जणांचा कोरोनाने मृत्यू ...

वाशिम जिल्ह्यात ८ मे पर्यंत कोरोना बाधितांचा एकूण आकडा ३१ हजार ६०५ वर पोहोचला आहे. ३३२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून ४४७७ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत. जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय कोविड केअर सेंटर व खासगी कोविड रुग्णालयांमध्ये रुग्णसंख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. दरम्यान, सातत्याने कोरोनासंबंधीच्या बातम्या, या संसर्गाने ओढवणाऱ्या मृत्यूच्या वार्ता ऐकून अनेकांचे मानसिक आरोग्य बिघडण्याचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील काही नगरपालिकांनी नागरिकांवर ओढावणारा मानसिक ताण कमी करण्यासाठी हेल्पलाईन तयार केली आहे; मात्र वाशिम किंवा जिल्ह्यातील इतर तीन नगरपालिका व दोन नगरपंचायतींमध्ये अशी कुठलीही सुविधा अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे मानसिक आरोग्य बिघडणारे नागरिक मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेत आहेत.

..............................

बाॅक्स :

पुरूष सर्वाधिक तणावात

कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रकोपामुळे महिलांच्या तुलनेत पुरूषच सर्वाधिक तणावात आहेत. कोरोनाच्या संकटामुळे अनेकांवर नोकऱ्या जाण्याचे गडांतर ओढवले आहे. काही लोकांचे रोजगार अनेक दिवसांपासून ठप्प आहेत. यासह कोरोनाच्या काळातही नोकरीनिमित्त पुरूषांना सातत्याने बाहेर राहावे लागते. घरी परत गेल्यानंतर कुटुंबास आपल्यापासून काही धोका तर होणार नाही, या चिंतेने पुरूषांना ग्रासले आहे. ही कारणेच तणाव वाढण्यास कारणीभूत ठरत आहेत.

.................

तरूणांचे प्रश्न वेगळेच

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या १४ महिन्यांपासून शिक्षण क्षेत्र पूर्ण कोलमडले आहे. ऑनलाईन शिक्षणाची मात्रा प्रभावी ठरली नाही. अशातच २०२१ मधील शैक्षणिक वर्षही संपुष्टात आले.

विशेषत: दहावी, बारावी व त्यापुढील शिक्षण घेत असलेल्या हुशार, होतकरू तरुणांच्या चिंतेत यामुळे भर पडली आहे. काही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर त्याचे दुष्परिणाम दिसून येत आहेत.

कोरोनामुळे शैक्षणिक वर्ष वाया जात असताना आयुष्यातील एक-एक वर्ष देखील कमी होत आहे. त्यामुळे कमी वयात अधिक शिक्षणासाठी धडपडणाऱ्या तरुण चिंतातूर झाले आहेत. यापुढेही शिक्षणाची स्थिती अशीच राहिली तर भविष्यात नोकरीचा प्रश्न गंभीर होणार, या विवंचनेत काही तरूण सापडले आहेत.

.......................

नोकरी गेली, आता काय करू

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटाने गेल्या १४ महिन्यांपासून अक्षरश: थैमान घातले आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासन, प्रशासनास नाईलाजास्तव जमावबंदी, लाॅकडाऊन लावावा लागत आहे. यामुळे कारखाने, कंपन्या, बाजारपेठेतील दुकाने बंद राहून व्यवसाय ठप्प झालेला आहे. परिणामी, अनेकांच्या छोट्या-मोठ्या नोकऱ्या गेल्या आहेत. त्यातील अनेकजण कुटुंबातील कर्ते पुरूष आहेत. नोकरी गेल्याने आता काय करावे, ही चिंता त्यांना सतावत आहे.

.....................

कोण म्हणतो पुरुष व्यक्त होत नाहीत?

कुटुंबातील प्रत्येकाच्या पालनपोषणाची जबाबदारी सांभाळताना कर्त्या पुरूषांवर कोणतेही संकट आले तरी ते सहजासहजी व्यक्त होत नाहीत किंवा चेहऱ्यावरची चिंता घरच्यांना दाखवत नाहीत, असे मानले जाते, मात्र कोरोनाच्या संकटाने सर्व मर्यादा उघड केल्या आहेत. रोजगार ठप्प होण्यासह अनेकांना नोकऱ्या हातून निसटल्याने सातत्याने घरातच बसून राहावे लागत आहे. कुटुंबही याबाबत अवगत व्हावे, म्हणून पुरूषही आता मनमोकळणेपणाने व्यक्त व्हायला लागले आहेत.

.........................

कोट :

कोरोनाच्या संकटामुळे आज जो-तो मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेला आहे. या संकटाने अनेकांसमोर आर्थिक अडचण निर्माण केली आहे. त्याचा सर्वाधिक ताण साहजिकच पुरूषांवर येत आहे. त्यातूनच चिंता, नैराश्याने बहुतांश नागरिकांना ग्रासले आहे. हे टाळण्यासाठी नकारात्मक गोष्टींपासून दूर राहणे आवश्यक आहे. दूरचित्रवाणीवरील मनोरंजनात्मक कार्यक्रम पाहणे, नियमित व्यायाम करणे, एकमेकांना आधार देणे, हेच त्यावरील रामबाण औषध ठरू शकते.

- डाॅ. नरेश इंगळे

मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम