शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

आवक वाढली; भाव घसरले !

By admin | Updated: November 4, 2015 03:02 IST

दिवाळीच्या पृष्ठभूमीवर सोयाबीनची मोठय़ा प्रमाणात विक्री : उत्पादकांची घोर निराशा.

दादाराव गायकवाड / वाशिम : एकामागून एक कोसळणार्‍या नैसर्गिक व मानवी संकटांमधून स्वत:ला सावरत असलेल्या शेतकर्‍यांच्या पदरी सोयाबीनच्या घसरलेल्या बाजारभावानेही निराशाच आली आहे. एकिकडे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढत असताना, बाजारभावही कोसळत आहेत. गत पंधरा दिवसांमध्ये सोयाबीनच्या भावात ३५0 ते ४00 रुपयांनी घट झाली आहे. जिल्ह्यातील शेतकरी सततच्या दुष्काळी परिस्थितीला वैतागला आहे. मागील तीन वर्षांंतील दुष्काळामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. त्याशिवाय सणावारांत खर्चासाठी पैसाच हाती नसल्यामुळे भाववाढीच्या प्रतीक्षेसाठी शेतमालाची साठवणूक न करता शेतकर्‍यांनी सर्वच शेतमाल विकण्याची घाई करीत आहेत. खरीप हंगामात उत्पादनात ५0 टक्क्यांहून अधिक घट येऊनही गतवर्षीच्या तुलनेत यंदा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विविध शेतमालाच्या आवकीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. मंगरुळपीर बाजार समितीत गतवर्षी १,२२,९६0 क्विंटल तर यावर्षी १४८५३६ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे, तसेच कारंजा बाजार समितीत गतवर्षी १,४७,७१0 क्विंटल तर यावर्षी २,३९,0५६ क्विंटल आवक झाली आहे. शेतीसाठी काढलेले कर्ज कसे फेडावे, तोंडावर आलेल्या सणावारांसाठी पैशांची जुळवाजुळव कशी करावी, अशा विविध चिंता त्याला सतावत आहेत. यंदा अवर्षणामुळे खरिपाच्या उत्पादनात ५0 टक्क्यांहून अधिक घट आली. कित्येक शेतकर्‍यांना तर शेतीसाठी केलेला खर्च वसूल होण्यापुरतेही धान्य पिकले नाही. कुठे तर सोयाबीनच्या उत्पादनात एवढी घट दिसून आली की, उत्पादनापेक्षा त्याची सोंगणी करण्यासाठीच अधिक खर्च लागण्याची शक्यता असल्याने त्या शेतकर्‍यांनी सोयाबीनची सोंगणीच केली नाही. शेती उत्पादनात यंदा मोठय़ा प्रमाणात घट आल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रत्येक धान्याची आवक निम्म्यावर येणे अपेक्षित होते; परंतु जिल्ह्यातील मंगरुळपीर, मानोरा आणि कारंजा या तीन ठिकाणच्या बाजार समितीत गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी आवक वाढल्याचे निदर्शनास आले; परंतु ही आवक शेतमालाचे उत्पादन वाढल्यामुळे नव्हे, तर दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकर्‍यांनी साठवणुकीकडे केलेली पाठ, सुरुवातीच्या तेजीनंतर सतत पडत चाललेले भाव, तसेच सणावाराचे दिवस आदी कारणांमुळे वाढल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. १५ ऑक्टोबरला चार हजाराच्या आसपास असलेले भाव ३ नोव्हेंबरला ३६00 पर्यंंत कोसळले आहेत.