शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

कोरोना काळात वाढली जि.प. विद्यार्थ्यांची पटसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:46 IST

वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७४० शाळा आहेत. गत काही वर्षांत खासगी शाळांत पाल्यांचे प्रवेश देण्याकडे पालकांचा कल वाढला होता. ...

वाशिम जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ७४० शाळा आहेत. गत काही वर्षांत खासगी शाळांत पाल्यांचे प्रवेश देण्याकडे पालकांचा कल वाढला होता. त्यामुळे जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या कमालीची घटली होती. जिल्ह्यातील २० शाळांत, तर २० पेक्षा कमी विद्यार्थी असल्याने या शाळा बंद करण्याची पाळी आली होती, तर शिक्षकांची पदेही अतिरिक्त ठरू लागल्याने जि.प. शाळांचे भवितव्यच अंधारात सापडले होते. दरम्यान, गतवर्षीपासून जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातले. वाशिम जिल्हाही यातून सुटला नाही. कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या जिवाचा विचार करता शाळा बंद ठेवून ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय शिक्षण विभागाने दिला. तेव्हापासून खासगी शाळांचेही वर्ग बंदच आहेत. ऑनलाइन शिक्षण असतानाही खासगी शाळांकडून वारेमाप शुल्क वसूल केले जात आहेच शिवाय स्मार्ट फोन आणि महिन्याच्या इंटरनेटचा खर्चही वाढला आहे. त्यात ग्रामीण भागांत इंटरनेटची विस्कळीत सेवा आदी कारणांमुळे शेकडो पालकांनी त्यांच्या पाल्यांचे जि.प. शाळांत नाव दाखल करणेच पसंत केले. त्यामुळे जि.प. शाळांच्या पटसंख्येत जवळपास अडीच हजारांची वाढ झाली आहे.

-----------------------

खर्च वाढला, दर्जा नाही

कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात अद्यापही प्राथमिकच्या शाळा सुरू झालेल्या नसून, ऑनलाइन शिक्षणावरच भर दिला जात आहे. त्यात खासगी शाळांचे वारेमाप शुल्क अदा करूनही स्मार्ट फोनसह इंटरनेट व पुस्तकांचा खर्च पालकांना करावा लागत आहे. तथापि, ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा मात्र वाढलेला नाही. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाशी अद्यापही जुळवून घेता आलेले नाही. त्यामुळे अनेक पालकांनी आपल्या पाल्यांना जि.प. शाळांतच टाकणे पसंत केले आहे.

----------------------

पहिल्या वर्गात अधिक वाढ

कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणावर भर दिला जात असल्याने खासगी शाळांत पाल्यांचा प्रवेश करण्यात फारसा अर्थ पालकांना वाटला नाही. त्यामुळे पहिल्या वर्गात पाल्यांचा प्रवेश करण्यासाठी पालकांनी जि.प. शाळेलाच अधिक पसंती दिली. तथापि, दुसरी ते सातव्या वर्गांतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी नव्याने प्रक्रिया राबविताना अर्थात शहरातील शाळांतून गावातील जि.प. शाळांत नाव दाखल करण्यात फारसा उत्साह दाखविला नसल्याचेही दिसले.

----------------------

संचमान्यतेनंतर चित्र अधिक होणार अधिक स्पष्ट

जि.प. शाळांतील विद्यार्थ्यांची अंतिम संख्या ही संचमान्यतेनंतर स्पष्ट होते. संचमान्यतेनुसारच शाळेतील विद्यार्थ्यांची पटसंख्या गृहीत धरली जाते. तथापि, जि.प. शाळांच्या संचमान्यतेची प्रक्रिया सप्टेंबरमध्ये पार पडते. त्यामुळे सद्यस्थितीत जि.प. शिक्षण विभागाकडील माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या पटसंख्येत जी वाढ दिसत आहे. त्यात आणखी किती भर पडते किंवा किती घट होते, हे संचमान्यतेनंतरच स्पष्ट होईल.

कोट: कोरोना काळात दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. जि.प. शिक्षण विभागाने या काळात वेगवेगळे पर्याय शोधून मुलांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यात प्रभावी कामगिरी केली. शिवाय शैक्षणिक योजनांची अंमलबजावणीही व्यवस्थित झाली. त्यामुळे यंदा जि.प. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे प्रवेश वाढत असल्याचे आजवरच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

-गजाननराव डाबेराव,

प्रभारी उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक)

जि.प. वाशिम

----------------------------

वर्गनिहाय वाढलेली विद्यार्थी संख्या

वर्ग - २०२०-२१ - २०२१-२२

पहिली - १९६९० - २११३०

दुसरी - २०१९८ - २०३१९

तिसरी - १९६९८ - २०१०९

चौथी - २११७७ - २१५१०

पाचवी - २१०५२ - २१०९०

सहावी - २११३६ - २११९०

सातवी - २१४३६ - २१५१२

---------------------------------

एकूण १४४३५७ १४६८६०