‘कोविड-१९’च्या प्रकोपामुळे सर्वसामान्य पालकांचे आर्थिक नियोजन कोसळले आहे. एकीकडे त्याला आपल्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये असे वाटते; तर दुसरीकडे आर्थिक बाबतीत तो हतबल आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी संगणक किंवा स्मार्टफोन, टॅब्लेट अत्यावश्यच आहे. गोरगरीब पालकांची आर्थिक स्थिती नाही. कसेबसे मोबाइल घेतला तरी दर महिन्याला इंटरनेटचा खर्च करावा लागत आहे. शिवाय अभ्यासक्रमाची सर्व पुस्तके आणि वह्यासुद्धा घ्याव्या लागत असल्याने ऑफलाइन शिक्षणापेक्षा ऑनलाइन शिक्षणाने पालकांचे कंबरडे मोडल्याचे दिसत आहे. त्यातच ग्रामीण भागांत इंटरनेट सेवा विस्कळीत होत असल्याने ऑनलाइन शिक्षणाचा कोणताही फायदा होत नसल्याचे दिसत आहे.
------
१) जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी
१) पहिली - १९६९०
२) दुसरी - २०९९८
३) तिसरी - १९६९८
४) चौथी - २११७७
५) पाचवी - २१०५२
६) सहावी - २११३६
७) सातवी -२१४३६
८) आठवी - २१५००
९) नववी - २०७००
१०) दहावी - १९७१५
२) महिन्याकाठी इंटरनेटसाठी ३०० रुपये खर्च
कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. यासाठी मोबाइल किंवा टॅब्लेटवर इंटरनेट चालू ठेवावे लागते. महिन्याकाठी पालकांना इंटरनेटवर किमान ३०० रुपये खर्च करावे लागत आहेत. त्यातही ग्रामीण भागांत इंटरनेट सुविधा विस्कळीत असल्याने त्याचा फायदा होत नसल्याचे दिसते.
------------------
१) कोट : कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यात आमच्या दोन्ही मुलांचा ऑनलाइन क्लास एकाच वेळी असतो. त्यामुळे प्रत्येकी ८५०० रुपयांचे दोन स्वतंत्र स्मार्टफोन घ्यावे लागले असून, दर महिन्याला त्यांच्या मोबाइल रिचार्जसाठी ४९८ रुपये खर्च करावा लागतो. त्यात इंटरनेट सेवा विस्कळीत असल्याने पाल्याचे नुकसान होत आहे.
-गजानन ढोक, पालक,
---------------------
२) कोट : यंदाही कोरोनामुळे शाळा बंदच असून, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. मला दोन मुले आहेत. त्यांच्या ऑनलाइन क्लासची वेळ वेगवेगळी असली तरी ऑनलाइन अभ्यासक्रमासाठी मोबाइलमधील स्टोरेज स्पेस पुरत नाही. त्यात इंटरनेटही नसते. त्यामुळे पाल्याचे शैक्षणिक नुकसानच होत आहे.
-नितीन उपाध्ये,
पालक.