शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

मंगरुळपीर तालुक्यात जलसाठ्यात वाढ

By admin | Updated: August 7, 2015 01:18 IST

आकडेवारीचा निष्कर्ष; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास सुटला.

 मंगरुळपीर (जि. वाशिम) : यावर्षी तालुक्यातील प्रदीर्घ दडी मारल्यानंतर गत दोन दिवस आलेल्या सततधार पावसामुळे तालुक्यातील विविध जलप्रकल्पांच्या जलसाठ्यात थोडी वाढ झाली असून पिकांना नवसंजीवणी मिळाली ांहेच शिवाय दुष्काळाचे संकटही दूर झाल्याने शेतकऱ्यांसह जनसामान्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी सुरुवातीला मृग नक्षत्रात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली मात्र त्यानंतर पावसाने दिर्घ मारली. जवळपास महीना दीड महिना पावसाने हजेरीच लावली नाही. त्यामुळे शेततील पिके सुकून गेली, तसेच तालुक्यातील बहूतांश जलसाठे पुर्णता कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. तालुक्यातीन २१ गावांना पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या मोतसावंगा प्रकल्पातील पाणी साठ्याची पातळी कमालीची घटल्याने मंगरुळपीर शहरासह अनेक गावांत ६ दिवसआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. परिणामी पिण्याच्या अभावी जनतेचे हाल सुरु होते. मात्र मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे विविध तालुक्यातील सर्वच ठिकाणच्या पिकांना संजीवनी मिळाल्याने तालुक्यातील पिके तरारलेली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सततधार पावसाने जलसाठ्यात वाढ झाली आहे. गत दोन दिवसांपूर्वी आलेल्या संततधार पावसामुळे विविध प्रकल्पातील जलसाठ्यांत झालेल्या वाढीची माहिती घेतली असता मोतसावंगा प्रकल्प १३.७०, मोहरी प्रकल्प १००, सिंगडोह प्रकल्प ४०.९४, सार्सी प्रकल्प ५.७६, प्रिंपी खुर्द प्रकल्प २१.७८, कोळंबी प्रकल्प २५.२७, सावरगाव प्रकल्प २६.५०, रोहणा प्रकल्प, ३५.९३, दस्तापूर प्रकल्प, ३८.००, कासोळा प्रकल्प ७४.२६, जोगलदरी प्रकल्प ७६.५५ आणि चांधई प्रकल्प ९.४६ याप्रमाणे वाढ झाल्शयाचे निष्पन्न झाले. गत दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला असला तरी, जलसाठे भरण्यास मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असून, पावसाळा जेमतेम महिनाभराचा उरला असताना अशाच प्रकारच्या पावसाची आणखी आवश्यक ता असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.