शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

मंगरुळपीर तालुक्यात जलसाठ्यात वाढ

By admin | Updated: August 7, 2015 01:18 IST

आकडेवारीचा निष्कर्ष; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास सुटला.

 मंगरुळपीर (जि. वाशिम) : यावर्षी तालुक्यातील प्रदीर्घ दडी मारल्यानंतर गत दोन दिवस आलेल्या सततधार पावसामुळे तालुक्यातील विविध जलप्रकल्पांच्या जलसाठ्यात थोडी वाढ झाली असून पिकांना नवसंजीवणी मिळाली ांहेच शिवाय दुष्काळाचे संकटही दूर झाल्याने शेतकऱ्यांसह जनसामान्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी सुरुवातीला मृग नक्षत्रात काही प्रमाणात पावसाने हजेरी लावली मात्र त्यानंतर पावसाने दिर्घ मारली. जवळपास महीना दीड महिना पावसाने हजेरीच लावली नाही. त्यामुळे शेततील पिके सुकून गेली, तसेच तालुक्यातील बहूतांश जलसाठे पुर्णता कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला होता. तालुक्यातीन २१ गावांना पाणी पुरवठा केल्या जाणाऱ्या मोतसावंगा प्रकल्पातील पाणी साठ्याची पातळी कमालीची घटल्याने मंगरुळपीर शहरासह अनेक गावांत ६ दिवसआड पाणी पुरवठा करण्यात येत होता. परिणामी पिण्याच्या अभावी जनतेचे हाल सुरु होते. मात्र मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे विविध तालुक्यातील सर्वच ठिकाणच्या पिकांना संजीवनी मिळाल्याने तालुक्यातील पिके तरारलेली आहेत. या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सततधार पावसाने जलसाठ्यात वाढ झाली आहे. गत दोन दिवसांपूर्वी आलेल्या संततधार पावसामुळे विविध प्रकल्पातील जलसाठ्यांत झालेल्या वाढीची माहिती घेतली असता मोतसावंगा प्रकल्प १३.७०, मोहरी प्रकल्प १००, सिंगडोह प्रकल्प ४०.९४, सार्सी प्रकल्प ५.७६, प्रिंपी खुर्द प्रकल्प २१.७८, कोळंबी प्रकल्प २५.२७, सावरगाव प्रकल्प २६.५०, रोहणा प्रकल्प, ३५.९३, दस्तापूर प्रकल्प, ३८.००, कासोळा प्रकल्प ७४.२६, जोगलदरी प्रकल्प ७६.५५ आणि चांधई प्रकल्प ९.४६ याप्रमाणे वाढ झाल्शयाचे निष्पन्न झाले. गत दोन दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे पिकांना संजीवनी मिळून जनावरांच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला असला तरी, जलसाठे भरण्यास मोठ्या प्रमाणात पावसाची आवश्यकता असून, पावसाळा जेमतेम महिनाभराचा उरला असताना अशाच प्रकारच्या पावसाची आणखी आवश्यक ता असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.