शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांची संख्या वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:38 IST

: जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा वाशिम : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता बाधितांवर उपचारासाठी आणखी सुविधा उभारणे आवश्यक आहे. ...

: जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा

वाशिम : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता बाधितांवर उपचारासाठी आणखी सुविधा उभारणे आवश्यक आहे. याकरिता नवीन कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड हॉस्पिटल सुरु करण्याच्या कामाला गती द्यावी. जिल्ह्यात प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांची (ऑक्सिजन बेड) संख्या वाढवावी. एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी १८ एप्रिल रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा, खाटांची संख्या, प्राणवायू व रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा या अनुषंगाने आढावा घेतला.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच बाधितांवरील उपचारासाठी आणखी सुविधा उभारण्याची गरज आहे.वाशिम येथील स्त्री रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात प्राणवायूची सुविधा असलेल्या आणखी १०० खाटा उपलब्ध करण्याची कार्यवाही करावी अशा सूचनाही ना. देसाइ यांनी दिल्या. आणखी काही ठिकाणी अशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. स्त्री रुग्णालय परिसरात नव्याने उभारण्यात आलेला ‘ऑक्सिजन जनरेशन प्लांट’ तातडीने कार्यान्वित करावा. तसेच सामान्य रुग्णालय परिसरातील ‘लिक्विड ऑक्सिजन टँक’ उभारणीच्या कामाला गती द्यावी. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

००००

बांक्स

संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा ...

जिल्ह्याला प्राणवायूचा सुरळीत पुरवठा व्हावा, त्यामध्ये कोणताही अडथळा येवू नये, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन सुद्धा आवश्यक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संपर्कात असल्याचे पालकमंत्री देसाई यावेळी म्हणाले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नागरिकांनाही केवळ अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडण्यास मुभा आहे. त्यामुळे पोलिसांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे पालकमंत्री देसाई यावेळी म्हणाले.