शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांची संख्या वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:38 IST

: जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा वाशिम : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता बाधितांवर उपचारासाठी आणखी सुविधा उभारणे आवश्यक आहे. ...

: जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा

वाशिम : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहता बाधितांवर उपचारासाठी आणखी सुविधा उभारणे आवश्यक आहे. याकरिता नवीन कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर व कोविड हॉस्पिटल सुरु करण्याच्या कामाला गती द्यावी. जिल्ह्यात प्राणवायूची सुविधा असलेल्या खाटांची (ऑक्सिजन बेड) संख्या वाढवावी. एकही रुग्ण उपचारापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिल्या. जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी १८ एप्रिल रोजी दुरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यात सध्या उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधा, खाटांची संख्या, प्राणवायू व रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा या अनुषंगाने आढावा घेतला.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासोबतच बाधितांवरील उपचारासाठी आणखी सुविधा उभारण्याची गरज आहे.वाशिम येथील स्त्री रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड रुग्णालयात प्राणवायूची सुविधा असलेल्या आणखी १०० खाटा उपलब्ध करण्याची कार्यवाही करावी अशा सूचनाही ना. देसाइ यांनी दिल्या. आणखी काही ठिकाणी अशी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नियोजन करावे. स्त्री रुग्णालय परिसरात नव्याने उभारण्यात आलेला ‘ऑक्सिजन जनरेशन प्लांट’ तातडीने कार्यान्वित करावा. तसेच सामान्य रुग्णालय परिसरातील ‘लिक्विड ऑक्सिजन टँक’ उभारणीच्या कामाला गती द्यावी. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

००००

बांक्स

संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा ...

जिल्ह्याला प्राणवायूचा सुरळीत पुरवठा व्हावा, त्यामध्ये कोणताही अडथळा येवू नये, यासाठी पाठपुरावा केला जात आहे. तसेच रेमडेसिवीर इंजेक्शन सुद्धा आवश्यक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संपर्कात असल्याचे पालकमंत्री देसाई यावेळी म्हणाले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने, आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नागरिकांनाही केवळ अत्यावश्यक कारण असेल तरच घराबाहेर पडण्यास मुभा आहे. त्यामुळे पोलिसांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. असे पालकमंत्री देसाई यावेळी म्हणाले.