शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

कारंजा बायपासवर अपघातांचे प्रमाण वाढले

By admin | Updated: October 29, 2014 23:58 IST

गतिरोधक व ट्राफिक सिग्नल बसविण्याची मागणी.

कारंजा लाड (वाशिम) : गतिरोधक व ट्राफिक सिग्नल नसल्याने येथील बायपासवरील वाहतूक व्यवस्था बेलगाम झाली असून, अपघातप्रवण स्थळ म्हणून नवी ओळख ह्यबायपासह्णला मिळत आहे. शहराच्या विस्तारीकरणामुळे बायपास परिसरात असंख्य वस्त्या निर्माण झाल्या आहेत. पण, शाळा, महाविद्यालय आणि मुख्य बाजारपेठ गावातच असल्यामुळे बायपास परिसरातील नागरिकांना दररोज या ना त्या कारणामुळे गावात जाण्यासाठी बायपास चौकातूनच आवागमन करावे लागते. याशिवाय बायपास चौकातून अकोला, अमरावती, मंगरुळ पीर, वाशिम, मानोरा, दारव्हा, यवतमाळ व कारंजा शहराकडे रस्ते जातात. त्यामुळे बायपासवरील राणी झाँशी चौकात सकाळी सातपासून रात्री ११ पर्यंत वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. बायपासवर दोन चौक असून, दोन्ही चौकाच्या मार्गावर गतिरोधक बसविण्यात आले नाही. परिणामी येथून वाहनांची प्रचंड वेगाने आवागमन होते. बायपासवरून ट्रक, एस.टी. बस, कार, ऑटोरिक्षा, मोटारसायकल अशा वाहनांची नेहमीच रेलचेल असते. बायपासवरून शेलूबाजार, पिंजर, दारव्हा, यवतमाळ या गावासह अनेक ग्रामीण भागात जाण्याकरिता बस व ऑटोरिक्षा मिळतात. वाहन मिळविण्याकरिता नागरिक या चौकात उभे राहतात तसेच वाहनचालक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.बायपासवरून मोठय़ा शहराकडे जाणार्‍या सर्व रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने डांबरीकरण करण्यात आले. परंतु, रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले नाही. रस्ते चांगले झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. बाय पासवरील चौकात वाहनधारकांना विरुद्ध दिशेने येणारे वाहन कोणत्या दिशेने पुढे जाणार आहे, याचा अंदाज घेणेही येथे कठीण जाते. त्यामुळे अनेक वाहनांची येथे समोरासमोर धडक झाली आहे.