शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

कारंजा बायपासवर अपघातांचे प्रमाण वाढले

By admin | Updated: October 29, 2014 23:58 IST

गतिरोधक व ट्राफिक सिग्नल बसविण्याची मागणी.

कारंजा लाड (वाशिम) : गतिरोधक व ट्राफिक सिग्नल नसल्याने येथील बायपासवरील वाहतूक व्यवस्था बेलगाम झाली असून, अपघातप्रवण स्थळ म्हणून नवी ओळख ह्यबायपासह्णला मिळत आहे. शहराच्या विस्तारीकरणामुळे बायपास परिसरात असंख्य वस्त्या निर्माण झाल्या आहेत. पण, शाळा, महाविद्यालय आणि मुख्य बाजारपेठ गावातच असल्यामुळे बायपास परिसरातील नागरिकांना दररोज या ना त्या कारणामुळे गावात जाण्यासाठी बायपास चौकातूनच आवागमन करावे लागते. याशिवाय बायपास चौकातून अकोला, अमरावती, मंगरुळ पीर, वाशिम, मानोरा, दारव्हा, यवतमाळ व कारंजा शहराकडे रस्ते जातात. त्यामुळे बायपासवरील राणी झाँशी चौकात सकाळी सातपासून रात्री ११ पर्यंत वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. बायपासवर दोन चौक असून, दोन्ही चौकाच्या मार्गावर गतिरोधक बसविण्यात आले नाही. परिणामी येथून वाहनांची प्रचंड वेगाने आवागमन होते. बायपासवरून ट्रक, एस.टी. बस, कार, ऑटोरिक्षा, मोटारसायकल अशा वाहनांची नेहमीच रेलचेल असते. बायपासवरून शेलूबाजार, पिंजर, दारव्हा, यवतमाळ या गावासह अनेक ग्रामीण भागात जाण्याकरिता बस व ऑटोरिक्षा मिळतात. वाहन मिळविण्याकरिता नागरिक या चौकात उभे राहतात तसेच वाहनचालक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.बायपासवरून मोठय़ा शहराकडे जाणार्‍या सर्व रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने डांबरीकरण करण्यात आले. परंतु, रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले नाही. रस्ते चांगले झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. बाय पासवरील चौकात वाहनधारकांना विरुद्ध दिशेने येणारे वाहन कोणत्या दिशेने पुढे जाणार आहे, याचा अंदाज घेणेही येथे कठीण जाते. त्यामुळे अनेक वाहनांची येथे समोरासमोर धडक झाली आहे.