शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

कारंजा बायपासवर अपघातांचे प्रमाण वाढले

By admin | Updated: October 29, 2014 23:58 IST

गतिरोधक व ट्राफिक सिग्नल बसविण्याची मागणी.

कारंजा लाड (वाशिम) : गतिरोधक व ट्राफिक सिग्नल नसल्याने येथील बायपासवरील वाहतूक व्यवस्था बेलगाम झाली असून, अपघातप्रवण स्थळ म्हणून नवी ओळख ह्यबायपासह्णला मिळत आहे. शहराच्या विस्तारीकरणामुळे बायपास परिसरात असंख्य वस्त्या निर्माण झाल्या आहेत. पण, शाळा, महाविद्यालय आणि मुख्य बाजारपेठ गावातच असल्यामुळे बायपास परिसरातील नागरिकांना दररोज या ना त्या कारणामुळे गावात जाण्यासाठी बायपास चौकातूनच आवागमन करावे लागते. याशिवाय बायपास चौकातून अकोला, अमरावती, मंगरुळ पीर, वाशिम, मानोरा, दारव्हा, यवतमाळ व कारंजा शहराकडे रस्ते जातात. त्यामुळे बायपासवरील राणी झाँशी चौकात सकाळी सातपासून रात्री ११ पर्यंत वाहनांची वर्दळ पाहायला मिळते. बायपासवर दोन चौक असून, दोन्ही चौकाच्या मार्गावर गतिरोधक बसविण्यात आले नाही. परिणामी येथून वाहनांची प्रचंड वेगाने आवागमन होते. बायपासवरून ट्रक, एस.टी. बस, कार, ऑटोरिक्षा, मोटारसायकल अशा वाहनांची नेहमीच रेलचेल असते. बायपासवरून शेलूबाजार, पिंजर, दारव्हा, यवतमाळ या गावासह अनेक ग्रामीण भागात जाण्याकरिता बस व ऑटोरिक्षा मिळतात. वाहन मिळविण्याकरिता नागरिक या चौकात उभे राहतात तसेच वाहनचालक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करतात. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे.बायपासवरून मोठय़ा शहराकडे जाणार्‍या सर्व रस्त्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने डांबरीकरण करण्यात आले. परंतु, रस्त्यावर गतिरोधक बसविण्यात आले नाही. रस्ते चांगले झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत आहेत. बाय पासवरील चौकात वाहनधारकांना विरुद्ध दिशेने येणारे वाहन कोणत्या दिशेने पुढे जाणार आहे, याचा अंदाज घेणेही येथे कठीण जाते. त्यामुळे अनेक वाहनांची येथे समोरासमोर धडक झाली आहे.