शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

बालमजुरांच्या संख्येत वाढ

By admin | Updated: June 17, 2014 23:49 IST

बालमजूर अधिक प्रमाणात दिसून येत आहेत.

मानोरा : तालुक्यात असणार्‍या शहरातील टपरी, हॉटेल, बिअरबार, किराणा दुकान, कापड, दुकान व इतर ठिकाणी बालमजूर अधिक प्रमाणात दिसून येत आहेत. बालकामगाराकडून कामे करून घेणे कायद्याने गुन्हा असूनसुद्धा त्यांना कमी पैशात कामावर ठेवण्याचे चित्र दिसून येत आहे. मात्र, संबंधित अधिकारी याकडे कानाडोळा करून दुर्लक्षित धोरण अवलंबित असल्याने बालमजुरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, अनेक बालक शिक्षणापासून वंचित राहत आहेत. शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये. प्रत्येकाला शिक्षण मिळावे यासाठी शासन विविध योजना राबवित आहे. तसेच बालकामगार कायदा लागू करून १८ वर्षापेक्षा कमी वयाच्या मुला-मुलींना कामावर ठेवणे किंवा त्यांच्याकडून वेठबिगारीची कामे करून घेणे कायद्याने गुन्हा आहे. शहरात तालुका प्रशासनाच्या आंधळ्या भूमिकेने बालकामगारांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.वरील ठिकाणी कमी रकमेत दिवसभर काम करून घेऊन कामगारांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचे प्रकार सुरूच आहेत. यामध्ये व्यावसायिकांचा फायदा होत असून कोणत्याच प्रकारची कारवाई होत नसल्याने बालकामगारांच्या पाल्यांना कोंडित पकडून त्यांच्याकडून काम करून घेण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. यामुळे त्यांच्या किशोरवयातील शिक्षण मिळत नसल्याने शिक्षणापासून वंचित राहण्याची पाळी येत आहे. शासनाने केलेल्या कडक कायद्याची अंमलबजावणी प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे.