शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
5
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
6
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
7
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
8
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
9
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
10
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
11
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
12
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
13
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
14
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
15
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
16
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
17
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
18
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
19
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
20
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान

जिल्ह्यात ६३८६ घरकुलांची कामे अपूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:25 IST

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जवळपास ६,३८६ घरकुलांची कामे अपूर्ण असून, अनुदानही रखडले आहे. याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेत अनुदान ...

वाशिम : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जवळपास ६,३८६ घरकुलांची कामे अपूर्ण असून, अनुदानही रखडले आहे. याप्रकरणी आक्रमक पवित्रा घेत अनुदान तातडीने देण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी गुरुवारी केली.

बेघर लाभार्थ्यांना हक्काचे घर देण्यासाठी शासनाकडून रमाई आवास, पंतप्रधान आवास, शबरी आवास आदी योजना राबविण्यात येतात. परंतु अद्यापही जिल्ह्यातील पात्र व गरजू लाभार्थी घरकुल योजनेपासून वंचित आहेत. त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्याकडे तक्रारी कराव्यात व तक्रारीच्या झेराॅक्सची प्रत आमच्याकडे सादर करावी, वंचितांना हक्काचे घरकुल देण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करू वेळप्रसंगी लढा उभारू, असेही चंद्रकांत ठाकरे म्हणाले. जिल्ह्यात पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ८ हजार ९४६ घरकुले मंजूर आहेत. त्यापैकी ५ हजार ८०१ घरकुल पूर्ण झालेली आहेत. रमाई आवास योजनेंतर्गत ७ हजार १६६ घरकुले मंजूर असून त्यापैकी ४ हजार ११२ घरकुले पूर्ण झालेली आहेत. तर शबरी आवास योजनेंतर्गत ४८३ घरकुले मंजूर असून २९६ घरकुलेच पूर्ण आहेत. पंतप्रधान आवास योजनेतील २ हजार २३४ लाभा र्थींना अद्यापही २ रा व ३ रा हप्ता मिळालेला नाही. रमाई योजनेतील २ हजार लाभार्थींनादेखील २ रा व ३ रा हप्ता मिळालेला नाही. तसेच शबरी योजनेंतर्गत १०६ लाभार्थींना २ रा व ३ रा हप्ता मिळाला नसल्यामुळे एैन पावसाळ्याच्या दिवसात त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणीही ठाकरे यांनी केली.

००००

अतिक्रमण नियमाकुलचा प्रश्न रखडला

गेल्या अनेक वर्षांपासून जे लोक अतिक्रमित जागेवर राहतात, त्यांच्या अतिक्रमण नियमाकुलचा प्रश्न रखडला आहे. अशा नागरिकांसाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे आजही मोठ्या प्रमाणावर बेघरांना पक्के घरे नाहीत. २०११ मध्ये जो सर्व्हे करण्यात आला त्या सर्व्हेमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आहेत. ज्यांना खरोखर राहावयास घरे नाहीत असे लोक वंचित आहेत. त्यामुळे झालेल्या चुका शोधून त्या सुधारून पात्र लाभार्थींना हक्काचे घरे देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहे. वेळ पडल्यास जिल्हाभर जनआंदोलन उभारणार असल्याचेदेखील जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी सांगितले.