शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशाचे प्रमाण वाढले; महिनाभरात सहा घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:24 IST

पावसाळा सुरू झाल्यानंतर सापांच्या अधिवासात पाणी शिरते. त्यामुळे त्यांचा जमिनीवर संचार वाढतो. या प्रकारातून अनावधानाने सर्पदंशाच्या घटना घडतात. जिल्ह्यात ...

पावसाळा सुरू झाल्यानंतर सापांच्या अधिवासात पाणी शिरते. त्यामुळे त्यांचा जमिनीवर संचार वाढतो. या प्रकारातून अनावधानाने सर्पदंशाच्या घटना घडतात. जिल्ह्यात अवघ्या महिनाभरात सहा जणांना विषारी सापाने चावा घेतल्याच्या घटना घडल्या. यात घोणस, मण्यार आणि नाग या विषारी सापांच्या चाव्यांचाच समावेश आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चिंचाळा येथे एक, तर येडशी येथे दोन, शिवाय मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात सर्पदंशाच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यापैकी चिंचाळा येथे नागाने चावा घेतलेल्या २२ वर्षीय युवकाला, तर येडशी येथे मण्यार सापाने चावा घेतलेल्या ३ मुलीचा मृत्यू झाला. शिरपूर परिसरातील शेलगाव खवणे येथील एका ४० वर्षीय इसमासह परिसरातील आणखी एका गावातील महिलेचाही विषारी सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याशिवाय कारंजा तालुक्यातील काठेवाडी येथील एका व्यक्तीला मण्यार सापाने चावा घेतल्याची घटना घडली.

-----------

३ वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू

पावसाळ्याच्या दिवसांत सर्पदंशाच्या घटनांत मोठी वाढ होत असताना दक्षता बाळगणे अत्यावश्यक आहे. मंगरुळपीर तालुक्यातील येडशी येथील राजश्री शंकर गव्हाने या तीन वर्षीय चिमुकलीस १७ जुलै रोजी रात्री २ वाजता अतिविषारी मण्यार सापाने दंश केला; पण उपचारास विलंब झाल्यामुळे या चिमुकलीचा अखेर मृत्यू झाला. त्यानंतर दोनच दिवसांनी येथे एका युवकाला विषारी सापाने चावा घेतला. निसर्ग स्पर्श फाउंडेशनचे सर्पमित्र आदित्य इंगोले यांनी युवकाच्या घरी जाऊन मार्गदर्शन केल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचा जीव वाचला.

-------------

वैद्यकीय उपचारच आवश्यक

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तातडीने नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. याबाबत सर्पमित्र, वन्यजीवप्रेमी ग्रामीण, शहरी भागांत व्यापक जनजागृती करीत असतानाही बहुतांश घटनांत अद्यापही मंत्रोपचार किंवा बुवाबाजीच्या आधारे सर्पदंशावर उपचाराचे प्रयत्न होतात. यातूनच बाधित व्यक्तीचा मृत्यू होतो. सर्पदंशावर केवळ वैद्यकीय उपचार हाच पर्याय असल्याचे जिल्ह्यातील सर्पमित्र आणि आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.

------

कोट: जिल्ह्यात प्रामुख्याने नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हे चारच अतिविषारी साप आढळतात. या सापाने दंश केल्यानंतर सर्पदंश झालेल्यास तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. शासकीय रुग्णालयात योग्य उपचारामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. दुर्दैवाने आजही अनेक लोक सर्पदंशानंतर बुवाबाजी किंवा मंत्रोपचाराचा आधार घेतात.

- गौरवकुमार इंगळे,

सर्पमित्र, तथा मानद वन्यजीवरक्षक

जिल्हा वाशिम