शहरं
Join us  
Trending Stories
1
कतरने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
2
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
3
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
4
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
5
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
6
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
7
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
8
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
9
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
10
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
11
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
12
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
13
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
14
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
15
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?
16
चांदी स्थिरावणार, सोने भाव खाणार; चांदीचा प्रीमियम उतरला २५ हजारांवरून शून्यावर
17
पॅरिसच्या लूव्र म्युझियममध्ये ४ मिनिटांत नेपोलियन तिसरा याच्या ९ मौल्यवान वस्तू लांबवल्या
18
पाकिस्तान-अफगाण शस्त्रसंधीसाठी राजी; संघर्ष थांबणार, दोहा येथे वाटाघाटी
19
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
20
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर

सर्पदंशाचे प्रमाण वाढले; महिनाभरात सहा घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:24 IST

पावसाळा सुरू झाल्यानंतर सापांच्या अधिवासात पाणी शिरते. त्यामुळे त्यांचा जमिनीवर संचार वाढतो. या प्रकारातून अनावधानाने सर्पदंशाच्या घटना घडतात. जिल्ह्यात ...

पावसाळा सुरू झाल्यानंतर सापांच्या अधिवासात पाणी शिरते. त्यामुळे त्यांचा जमिनीवर संचार वाढतो. या प्रकारातून अनावधानाने सर्पदंशाच्या घटना घडतात. जिल्ह्यात अवघ्या महिनाभरात सहा जणांना विषारी सापाने चावा घेतल्याच्या घटना घडल्या. यात घोणस, मण्यार आणि नाग या विषारी सापांच्या चाव्यांचाच समावेश आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चिंचाळा येथे एक, तर येडशी येथे दोन, शिवाय मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात सर्पदंशाच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यापैकी चिंचाळा येथे नागाने चावा घेतलेल्या २२ वर्षीय युवकाला, तर येडशी येथे मण्यार सापाने चावा घेतलेल्या ३ मुलीचा मृत्यू झाला. शिरपूर परिसरातील शेलगाव खवणे येथील एका ४० वर्षीय इसमासह परिसरातील आणखी एका गावातील महिलेचाही विषारी सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याशिवाय कारंजा तालुक्यातील काठेवाडी येथील एका व्यक्तीला मण्यार सापाने चावा घेतल्याची घटना घडली.

-----------

३ वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू

पावसाळ्याच्या दिवसांत सर्पदंशाच्या घटनांत मोठी वाढ होत असताना दक्षता बाळगणे अत्यावश्यक आहे. मंगरुळपीर तालुक्यातील येडशी येथील राजश्री शंकर गव्हाने या तीन वर्षीय चिमुकलीस १७ जुलै रोजी रात्री २ वाजता अतिविषारी मण्यार सापाने दंश केला; पण उपचारास विलंब झाल्यामुळे या चिमुकलीचा अखेर मृत्यू झाला. त्यानंतर दोनच दिवसांनी येथे एका युवकाला विषारी सापाने चावा घेतला. निसर्ग स्पर्श फाउंडेशनचे सर्पमित्र आदित्य इंगोले यांनी युवकाच्या घरी जाऊन मार्गदर्शन केल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचा जीव वाचला.

-------------

वैद्यकीय उपचारच आवश्यक

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तातडीने नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. याबाबत सर्पमित्र, वन्यजीवप्रेमी ग्रामीण, शहरी भागांत व्यापक जनजागृती करीत असतानाही बहुतांश घटनांत अद्यापही मंत्रोपचार किंवा बुवाबाजीच्या आधारे सर्पदंशावर उपचाराचे प्रयत्न होतात. यातूनच बाधित व्यक्तीचा मृत्यू होतो. सर्पदंशावर केवळ वैद्यकीय उपचार हाच पर्याय असल्याचे जिल्ह्यातील सर्पमित्र आणि आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.

------

कोट: जिल्ह्यात प्रामुख्याने नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हे चारच अतिविषारी साप आढळतात. या सापाने दंश केल्यानंतर सर्पदंश झालेल्यास तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. शासकीय रुग्णालयात योग्य उपचारामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. दुर्दैवाने आजही अनेक लोक सर्पदंशानंतर बुवाबाजी किंवा मंत्रोपचाराचा आधार घेतात.

- गौरवकुमार इंगळे,

सर्पमित्र, तथा मानद वन्यजीवरक्षक

जिल्हा वाशिम