शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
2
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
3
अमेरिका ७, चीन ४, भारत १.., ही कोणती यादी, जिथे फक्त दोनच दिग्गजांचं आहे वर्चस्व; यातून काय मिळताहेत संकेत?
4
लहान गुंतवणुकीतून कोट्यधीश होण्यासाठी SIP का आहे बेस्ट? 'हे' ८ मुद्दे ठरतात गेमचेंजर
5
गर्लफ्रेंडशी शरीरसंबंध प्रस्थापित करताना पुरूषाचा मृत्यू, कोर्टाने प्रेमिकेला ठोठवला दंड
6
वराह म्हणजे डुक्कर नाही, तर ते यज्ञरूप आहे; वराह जयंतीनिमित्त जाणून घ्या विष्णूंचे अवतारकार्य
7
गुडन्यूज! परिणीती चोप्रा होणार आई, लग्नाच्या दोन वर्षांनंतर कुणीतरी येणार येणार गं...
8
सरकारच्या एक निर्णयाने अडचणीत आली ₹6,98,44,77,87,200 ची कंपनी; कोण आहेत ड्रीम-11 चे मालक हर्ष जैन? अंबानी कुटुंबाशी खास नातं!
9
एक मुलगा छातीवर बसला, दुसऱ्याने हात-पाय बांधले; रिटायर्ड DSP ना मारहाण; हिसकावलं ATM
10
चौथ्या स्टेजच्या कर्करोगाशी झुंजतेय अभिनेत्री तनिष्ठा चॅटर्जी, तिला सतावतेय ९ वर्षांच्या मुलीची चिंता
11
Prithvi Shaw : संघ बदलला अन् फार्मात आला! पृथ्वी शॉच्या भात्यातून आली आणखी एक कडक खेळी
12
Nikki Murder Case : हुंड्यासाठी निक्कीला जाळून मारलं; पती, सासूनंतर आता दीर आणि सासऱ्यालाही अटक
13
हरितालिका व्रत २०२५: ‘हे’ नियम अवश्य पाळावेत; व्रत पूजनानंतर म्हणावी हरितालिका आरती
14
Latur Crime: लातूर हादरले! नदीत सापडलेल्या सुटकेसमध्ये महिलेचा मृतदेह; घटना समोर कशी आली?
15
१० वेळा बॉयफ्रेंडसोबत पळाली, आता विवाहित महिलेने ठेवला १५-१५ चा अजब फॉर्म्युला; ऐकून सगळेच हैराण
16
TCS ते इन्फोसिस-विप्रोपर्यंत IT कंपन्यांचे शेअर्स रॉकेट; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; का आली अचानक तेजी?
17
"रीलस्टार म्हणजे अभिनेते नाहीत", हास्यजत्रेत प्रसाद ओकचं वक्तव्य; धनंजय पोवार म्हणाला...
18
भाजपा राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी 'बडा' मंत्री शर्यतीत, दोन वर्षांनी घेतली मोहन भागवतांची भेट
19
जगद्गुरू रामभद्राचार्यांनी प्रेमानंद महाराजांना दिले खुले आव्हान; 'संस्कृताचा एक श्लोक तरी...'
20
Bigg Boss 19 : "वाटलं नव्हतं बिग बॉसची ऑफर येईल...", मराठमोळ्या प्रणित मोरेला अजूनही बसत नाहीये विश्वास

सर्पदंशाचे प्रमाण वाढले; महिनाभरात सहा घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:24 IST

पावसाळा सुरू झाल्यानंतर सापांच्या अधिवासात पाणी शिरते. त्यामुळे त्यांचा जमिनीवर संचार वाढतो. या प्रकारातून अनावधानाने सर्पदंशाच्या घटना घडतात. जिल्ह्यात ...

पावसाळा सुरू झाल्यानंतर सापांच्या अधिवासात पाणी शिरते. त्यामुळे त्यांचा जमिनीवर संचार वाढतो. या प्रकारातून अनावधानाने सर्पदंशाच्या घटना घडतात. जिल्ह्यात अवघ्या महिनाभरात सहा जणांना विषारी सापाने चावा घेतल्याच्या घटना घडल्या. यात घोणस, मण्यार आणि नाग या विषारी सापांच्या चाव्यांचाच समावेश आहे. मंगरुळपीर तालुक्यातील चिंचाळा येथे एक, तर येडशी येथे दोन, शिवाय मालेगाव तालुक्यातील शिरपूर परिसरात सर्पदंशाच्या दोन घटना घडल्या आहेत. त्यापैकी चिंचाळा येथे नागाने चावा घेतलेल्या २२ वर्षीय युवकाला, तर येडशी येथे मण्यार सापाने चावा घेतलेल्या ३ मुलीचा मृत्यू झाला. शिरपूर परिसरातील शेलगाव खवणे येथील एका ४० वर्षीय इसमासह परिसरातील आणखी एका गावातील महिलेचाही विषारी सापाने चावा घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. त्याशिवाय कारंजा तालुक्यातील काठेवाडी येथील एका व्यक्तीला मण्यार सापाने चावा घेतल्याची घटना घडली.

-----------

३ वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू

पावसाळ्याच्या दिवसांत सर्पदंशाच्या घटनांत मोठी वाढ होत असताना दक्षता बाळगणे अत्यावश्यक आहे. मंगरुळपीर तालुक्यातील येडशी येथील राजश्री शंकर गव्हाने या तीन वर्षीय चिमुकलीस १७ जुलै रोजी रात्री २ वाजता अतिविषारी मण्यार सापाने दंश केला; पण उपचारास विलंब झाल्यामुळे या चिमुकलीचा अखेर मृत्यू झाला. त्यानंतर दोनच दिवसांनी येथे एका युवकाला विषारी सापाने चावा घेतला. निसर्ग स्पर्श फाउंडेशनचे सर्पमित्र आदित्य इंगोले यांनी युवकाच्या घरी जाऊन मार्गदर्शन केल्याने त्याला रुग्णालयात दाखल केल्यामुळे त्याचा जीव वाचला.

-------------

वैद्यकीय उपचारच आवश्यक

सर्पदंश झालेल्या व्यक्तीला तातडीने नजीकच्या ग्रामीण रुग्णालयात किंवा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. याबाबत सर्पमित्र, वन्यजीवप्रेमी ग्रामीण, शहरी भागांत व्यापक जनजागृती करीत असतानाही बहुतांश घटनांत अद्यापही मंत्रोपचार किंवा बुवाबाजीच्या आधारे सर्पदंशावर उपचाराचे प्रयत्न होतात. यातूनच बाधित व्यक्तीचा मृत्यू होतो. सर्पदंशावर केवळ वैद्यकीय उपचार हाच पर्याय असल्याचे जिल्ह्यातील सर्पमित्र आणि आरोग्य विभागाकडून सांगितले जात आहे.

------

कोट: जिल्ह्यात प्रामुख्याने नाग, घोणस, मण्यार आणि फुरसे हे चारच अतिविषारी साप आढळतात. या सापाने दंश केल्यानंतर सर्पदंश झालेल्यास तातडीने नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असते. शासकीय रुग्णालयात योग्य उपचारामुळे सर्पदंश झालेल्या व्यक्तीचे प्राण वाचू शकतात. दुर्दैवाने आजही अनेक लोक सर्पदंशानंतर बुवाबाजी किंवा मंत्रोपचाराचा आधार घेतात.

- गौरवकुमार इंगळे,

सर्पमित्र, तथा मानद वन्यजीवरक्षक

जिल्हा वाशिम