शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

चवदाव्या वित्त आयोगामुळे आले सरपंचपदाला महत्व

By admin | Updated: August 12, 2015 00:36 IST

निधीसाठी लोकसंख्येचा निकष महत्त्वाचा; पद मिळविण्यासाठी अनेकांची धडपड सुरू.

वाशिम : १४ व्या वित्त आयोगाचा १00 टक्के निधी आता थेट जिल्हा परिषदांकडून ग्राम पंचायतींना मिळणार असल्याने नुकत्याच झालेल्या १६३ ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांचे महत्व वधारले आहे. त्यातल्या त्यात अल्पावधीतच सरपंच पदाची निवडणुक होत असल्याने केंद्र व राज्याकडून मिळणार्‍या या निधीच्या लाभासाठी सरपंच पदावर दावे प्रती दावे सुरु झाल्याने ही निवडणुक जिल्हयात रंगतदार होण्याचे सकेत मिळाले आहेत. जिल्हयात ऑगस्ट सप्टेंबर मध्ये मुदत संपणार्‍या ४ ऑगस्ट रोजी निवडणुक झाली होती. आता सरपंच पदाच्या निवडीचे वेध १६३ ग्राम पंचायतीमध्ये लागले आहेत. जिल्हयातील बहुतांश ग्राम पंचायत समितीची मुदत ही २५ ऑगस्ट आणि सप्टेंबर च्या पहिल्या आठवडयात संपत आहे. त्या अनुषंगाने मुदत संपण्याच्या पुर्व संध्येलाच सरपंच पदाची निवडणुक घेण्याचा जिल्हा निवडणुक विभागाचा मनोदय आहे. दुसरीकडे चवदाव्या वित्त आयोगाअंतर्गत जिल्हयातील ४९३ ग्राम पंचायतींना १३ कोटी रुपयांचा निधी यापूर्वीच उपलब्ध झाला आहे. मात्र अद्याप तो सरपंच आणि ग्रामसेवकाच्या संयुक्त खात्यात वर्ग करण्यात आलेला नाही. १६३ ग्राम पंचायतीच्या सरपंच निवडी नंतर हा निधी जिल्हयातील ग्राम पंचायतीला मिळणे अभिप्रेत आहे. निवडणुक झालेल्या ग्राम पंचायतीपैकी निम्या ग्रामपंचायतीवर महिला राज येणार आहे. त्यामुळे आपल्या मर्जीतील सरपंच ग्राम पंचायतीवर विराजमान व्हावा या साठी राजकारण्यांकडून सद्या फिल्डीग लावल्या जात आहे. सोबतच त्या अनुषंगाने राजकीय हालचालींना वेग प्राप्त झाला आहे. चवदाव्या वित्त आयोगाची मार्गदर्शक तत्वे अद्याप प्राप्त झाली नसली तरी पंचायत राज व्यवस्थेतील ग्रामपंचायतीला निधी खर्चा बाबत आता अर्मयाद अधिकार मिळणार असल्यामुळे पंचायत राज व्यवस्थेतील कनिष्ठ स्तरावरील महत्वाचे सरपंच पद आता चांगलेच प्रकाश झोतात आले आहे. त्यामुळेच या पदावर आपल्या जवळील व्यक्ती बसावी यासाठी जिल्हयातील दिग्गज राजकारणी प्रयत्नात आहेत.