शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करा - तिवारी

By admin | Updated: September 10, 2015 02:16 IST

आढावा बैठकीत स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या सुचना.

वाशिम : राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय असून, या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी सर्व संबंधित शासकीय विभागांनी करावी, अशा सूचना करीत उपाययोजनांचा आढावा कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ९ सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीत घेतला. आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी गणेश पाटील, प्रभारी अपर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. तिवारी पुढे म्हणाले की, विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची आकडेवारी लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यावर तातडीने उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये सर्व शेतकर्‍्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या दरात धान्य देणे व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध करून देणे, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांच्या मुलांना मोफत शिक्षण देणे आदी योजनांचा समावेश आहे. शेतीच्या विकासासाठी राज्य शासन अनेक योजना राबवीत आहे. या सर्व योजनांची तातडीने अंमलबजावणी करून या योजनांचा लाभ शेतकर्‍यांना देणे, ही सर्व संबधित शासकीय विभागांची जबाबदारी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होता कामा नये, असे तिवारी यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे नैराश्य दूर करण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. शेतकरी कर्ज पुनर्गठन, कृषीविषयक योजना, धडक सिंचन योजनेतील विहिरी, रोजगार हमी योजना तसेच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची कारणे, आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी याविषीय बैठकीत चर्चा झाली.