शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करा - तिवारी

By admin | Updated: September 10, 2015 02:16 IST

आढावा बैठकीत स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या सुचना.

वाशिम : राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय असून, या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी सर्व संबंधित शासकीय विभागांनी करावी, अशा सूचना करीत उपाययोजनांचा आढावा कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ९ सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीत घेतला. आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी गणेश पाटील, प्रभारी अपर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. तिवारी पुढे म्हणाले की, विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची आकडेवारी लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यावर तातडीने उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये सर्व शेतकर्‍्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या दरात धान्य देणे व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध करून देणे, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांच्या मुलांना मोफत शिक्षण देणे आदी योजनांचा समावेश आहे. शेतीच्या विकासासाठी राज्य शासन अनेक योजना राबवीत आहे. या सर्व योजनांची तातडीने अंमलबजावणी करून या योजनांचा लाभ शेतकर्‍यांना देणे, ही सर्व संबधित शासकीय विभागांची जबाबदारी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होता कामा नये, असे तिवारी यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे नैराश्य दूर करण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. शेतकरी कर्ज पुनर्गठन, कृषीविषयक योजना, धडक सिंचन योजनेतील विहिरी, रोजगार हमी योजना तसेच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची कारणे, आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी याविषीय बैठकीत चर्चा झाली.