शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
पवार कुटुंबात यंदा दोन विवाहसोहळे! युगेंद्र पवारांचेही ठरले, सुप्रिया सुळेंनी होणाऱ्या सुनेचे नाव सांगितले...
3
साप्ताहिक राशीभविष्य: काहींना नवीन संधी मिळेल, 'या' राशींना अचानक धनलाभ होईल
4
२ लग्न करणाऱ्या 'कांटा लगा गर्ल'ची कोट्यवधींची संपत्ती कोणाला मिळणार? कोण आहे कायदेशीर वारसदार?
5
हरियाणाच्या महिला आयपीएस अधिकारी स्मिती चौधरी यांचे नाशिकमध्ये निधन; पती महाराष्ट्र पोलिसमध्ये अधिकारी
6
Manisha Kayande: एकनाथ शिंदे केवळ भाषणच...; कार्यकर्त्यांसमोर मनीषा कायंदेंनी मनातलं बोलून दाखवलं!
7
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
8
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
9
बँक FD आणि शेअर बाजाराला पर्याय! पोस्ट ऑफिसच्या 'या' ४ योजनांतून मिळवा बंपर रिटर्न
10
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
11
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
12
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
13
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
14
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
15
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
16
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
17
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
18
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
19
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
20
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी उपाययोजनांची अंमलबजावणी करा - तिवारी

By admin | Updated: September 10, 2015 02:16 IST

आढावा बैठकीत स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्या सुचना.

वाशिम : राज्यात होत असलेल्या शेतकरी आत्महत्या हा चिंतेचा विषय असून, या आत्महत्या रोखण्यासाठी राज्य शासनाने हाती घेतलेल्या उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी सर्व संबंधित शासकीय विभागांनी करावी, अशा सूचना करीत उपाययोजनांचा आढावा कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात ९ सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीत घेतला. आमदार राजेंद्र पाटणी, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, जिल्हा परिषदेचे मुख्य कायर्कारी अधिकारी गणेश पाटील, प्रभारी अपर जिल्हाधिकारी बी. के. इंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख यांच्यासह सर्व शासकीय विभागांचे विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. तिवारी पुढे म्हणाले की, विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्यांची आकडेवारी लक्षात घेऊन राज्य शासनाने त्यावर तातडीने उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये सर्व शेतकर्‍्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेच्या दरात धान्य देणे व राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा लाभ उपलब्ध करून देणे, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांच्या मुलांना मोफत शिक्षण देणे आदी योजनांचा समावेश आहे. शेतीच्या विकासासाठी राज्य शासन अनेक योजना राबवीत आहे. या सर्व योजनांची तातडीने अंमलबजावणी करून या योजनांचा लाभ शेतकर्‍यांना देणे, ही सर्व संबधित शासकीय विभागांची जबाबदारी आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची कुचराई होता कामा नये, असे तिवारी यांनी सांगितले. शेतकर्‍यांचे नैराश्य दूर करण्यासाठी सर्व विभागांच्या अधिकार्‍यांनी प्रयत्न करावेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्येचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. शेतकरी कर्ज पुनर्गठन, कृषीविषयक योजना, धडक सिंचन योजनेतील विहिरी, रोजगार हमी योजना तसेच जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येची कारणे, आत्महत्या रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी याविषीय बैठकीत चर्चा झाली.