शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

गौण खनिजाचे अवैध उत्खनन; ५० कोटींचा दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:43 IST

मानोरा : मानोरा तालुक्यातील हातना, आमगव्हाण या दोन गावातील ई- वर्ग जागेवर शेततलाव खोदून परवान्यापेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन ...

मानोरा : मानोरा तालुक्यातील हातना, आमगव्हाण या दोन गावातील ई- वर्ग जागेवर शेततलाव खोदून परवान्यापेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन केल्याचे चौकशीअंती सिद्ध झाल्याने मानोरा तहसिलदार एस.बी. जाधव यांनी ३ मे रोजी खोदकाम करणाºया संबंधित कंपनीला ५० कोटींचा दंड ठोठावला. याप्रकरणी ‘लोकमत’ने वेळोवळी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले होते, हे विशेष.

मानोरा तालुक्यातील हातना, आमगव्हाण या दोन गावातील ई- वर्ग जागेवर शेततलाव खोदून त्यामधील गौण खनिज महामार्गाकरीता वापरण्यात यावे असा करार झालेला आहे. या करारानुसार हातना येथून ७९५० ब्रास तर आमगव्हान येथून ८२६८ ब्रास गौण खनिज उत्खनन आणि वाहतुक करण्याचा परवाना कंत्राटदार कंपनीला आहे. परंतु संबंधित कंपनीने सिमांकन केलेल्या जागेबाहेरील डोंगरफोड करुन ६३,३०१ ब्रास मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतुक केल्यासंदर्भात अ‍ॅड. श्रीकृष्ण राठोड यांनी जिल्हा पर्यावरण समिती, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. परंतू, तत्कालिन जिल्हाधिकाºयांनी याप्रकरणी विशेष कार्यवाही केली नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले होते.

अ‍ॅड. राठोड यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी याकडे व्यक्तिश: लक्ष देत चौकशी सुरु केली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, रोहयो शाखेचे उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी वाशिम अशा विविध स्तरावर याप्रकरणी चौकशी व सुनावणी झाली. अप्पर जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार मानोरा यांना १९ मार्च २०२१ रोजीच्या पत्राद्वारे नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशित केले होते. त्याअनुषंगाने तहसीलदार मानोरा यांनी संबंधित कंपनीकडून खुलासा मागविला. समाधानकारक खुलासा सादर न केल्याने तहसिलदार जाधव यांनी ३ मे रोजी संबंधित कंपनीला ५० कोटी ७७ हजार ९०० रुपयाचा दंड ठोठावला. सदरची रक्कम ही आदेशाची प्रत मिळाल्यापासून ७ दिवसात सरकारजमा करण्याचेही आदेशात नमूद केले आहे. विहित केलेल्या मुदतीत म्हणजेच ७ दिवसात दंडाची रक्कम कंत्राटदार कंपनीने भरली नाही तर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तरतुदीनुसार वसुलीची विनाविलंब कार्यवाही सुरु करावी, असेही तलाठी व मंडळ अधिकारी यांना निर्देश दिलेले आहे. आता तलाठी व मंडळ अधिकारी आपले कर्तव्य कशाप्रकारे पार पाडतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.