शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

गौण खनिजाचे अवैध उत्खनन; ५० कोटींचा दंड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:43 IST

मानोरा : मानोरा तालुक्यातील हातना, आमगव्हाण या दोन गावातील ई- वर्ग जागेवर शेततलाव खोदून परवान्यापेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन ...

मानोरा : मानोरा तालुक्यातील हातना, आमगव्हाण या दोन गावातील ई- वर्ग जागेवर शेततलाव खोदून परवान्यापेक्षा अधिक गौण खनिज उत्खनन केल्याचे चौकशीअंती सिद्ध झाल्याने मानोरा तहसिलदार एस.बी. जाधव यांनी ३ मे रोजी खोदकाम करणाºया संबंधित कंपनीला ५० कोटींचा दंड ठोठावला. याप्रकरणी ‘लोकमत’ने वेळोवळी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले होते, हे विशेष.

मानोरा तालुक्यातील हातना, आमगव्हाण या दोन गावातील ई- वर्ग जागेवर शेततलाव खोदून त्यामधील गौण खनिज महामार्गाकरीता वापरण्यात यावे असा करार झालेला आहे. या करारानुसार हातना येथून ७९५० ब्रास तर आमगव्हान येथून ८२६८ ब्रास गौण खनिज उत्खनन आणि वाहतुक करण्याचा परवाना कंत्राटदार कंपनीला आहे. परंतु संबंधित कंपनीने सिमांकन केलेल्या जागेबाहेरील डोंगरफोड करुन ६३,३०१ ब्रास मुरुमाचे अवैधरित्या उत्खनन आणि वाहतुक केल्यासंदर्भात अ‍ॅड. श्रीकृष्ण राठोड यांनी जिल्हा पर्यावरण समिती, तहसिलदार, उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे तक्रार केली होती. परंतू, तत्कालिन जिल्हाधिकाºयांनी याप्रकरणी विशेष कार्यवाही केली नव्हती. यासंदर्भात ‘लोकमत’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित करून संबंधित यंत्रणेचे लक्ष वेधले होते.

अ‍ॅड. राठोड यांनी पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर पालकमंत्र्यांनी चौकशीचे आदेश जिल्हाधिकाºयांना दिले. त्यानुसार जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी याकडे व्यक्तिश: लक्ष देत चौकशी सुरु केली. जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, रोहयो शाखेचे उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी वाशिम अशा विविध स्तरावर याप्रकरणी चौकशी व सुनावणी झाली. अप्पर जिल्हाधिकारी यांनी तहसीलदार मानोरा यांना १९ मार्च २०२१ रोजीच्या पत्राद्वारे नियमानुसार कारवाई करण्याचे आदेशित केले होते. त्याअनुषंगाने तहसीलदार मानोरा यांनी संबंधित कंपनीकडून खुलासा मागविला. समाधानकारक खुलासा सादर न केल्याने तहसिलदार जाधव यांनी ३ मे रोजी संबंधित कंपनीला ५० कोटी ७७ हजार ९०० रुपयाचा दंड ठोठावला. सदरची रक्कम ही आदेशाची प्रत मिळाल्यापासून ७ दिवसात सरकारजमा करण्याचेही आदेशात नमूद केले आहे. विहित केलेल्या मुदतीत म्हणजेच ७ दिवसात दंडाची रक्कम कंत्राटदार कंपनीने भरली नाही तर तलाठी व मंडळ अधिकारी यांनी तरतुदीनुसार वसुलीची विनाविलंब कार्यवाही सुरु करावी, असेही तलाठी व मंडळ अधिकारी यांना निर्देश दिलेले आहे. आता तलाठी व मंडळ अधिकारी आपले कर्तव्य कशाप्रकारे पार पाडतात याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.