शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

अवैध वृक्षतोडीकडे वनविभागाची डोळेझाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2017 17:56 IST

मानोरा: तालुक्यातील कोंडोली ग्रामपंचायतच्या हद्दीत हिरव्यागार वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून, या संदर्भात माहिती असतानाही वनविभाग आणि महसूल प्रशासनाकडून वृक्षतोड करणाºयांवर कसलीही कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे वृक्षांची कत्तल थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाचीही अद्याप प्रशासनाने दखल घेतली नाही. कोंडोली येथील ग्रामपंचायतच्या हद्दीत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील ...

ठळक मुद्देग्रामस्थांचे निवेदनही दुर्लक्षीत: मानोरा तालुक्यातील प्रकार 

मानोरा: तालुक्यातील कोंडोली ग्रामपंचायतच्या हद्दीत हिरव्यागार वृक्षांची सर्रास कत्तल सुरू असून, या संदर्भात माहिती असतानाही वनविभाग आणि महसूल प्रशासनाकडून वृक्षतोड करणाºयांवर कसलीही कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे वृक्षांची कत्तल थांबविण्यासाठी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनाचीही अद्याप प्रशासनाने दखल घेतली नाही. 

कोंडोली येथील ग्रामपंचायतच्या हद्दीत येत असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील महारुख, बाभूळ, तसेच नदीकाठी असलेल्या अंजनाचे वृक्ष गेल्या काही दिवसांपासून अवैध पद्धतीने कापण्यात आली असून, हा प्रकार सुरूच आहे. वृक्षांची कत्तल करण्यात येत असल्याचे दिसत असतानाही महसूल प्रशासन आणि वन विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांकडून अद्याप याची दखल घेऊन कारवाई करण्यात आली नाही. विशेष म्हणजे ही वृक्षतोड थांबविण्यासाठी गाव तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांच्यासह ग्रामस्थांनी मानोराच्या तहसीलदारांकडे निवेदनही सादर केले; परंतु त्याचीही दखल घेण्यात आली नाही. गेल्या काही दिवसांत कोंडोली परिसरात महारूखाची दोन, बाभळीची ११, कडूनिंबाची ३ आणि अंजनाची ३ मिळून तब्बल १९ हिरव्या वृक्षांची खुलेआम कत्तल करण्यात आली आहे. त्यामधील केवळ ३ वृक्ष तोडल्याचा पंचनामा करून तलाठ्यांनी या संदर्भातील अहवाल १५ दिवसांपूर्वी सादर केला असला तरी, कारवाई झाली नसल्याने वृक्षतोड सुरूच आहे. विशेष म्हणजे ही झाडे तोडण्यात येत असताना ग्रामस्थांनी संबंधितांना आवर घालून तलाठ्यांना प्रत्यक्ष परिस्थिती दाखविली; परंतु त्यावेळी तलाठी कारवाई न करताच निघून गेले. एकिकडे शासन दरवर्षी कोट्यवधी वृक्षांची लागवड करून ती जगविण्याची जबाबदारीही संबंधित प्रशासनाकडे सोपवित आहे, तर दुसरीकडे त्याच प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हिरव्यागार वृक्षांची कत्तल होत असताना कोणतीही कारवाई करीत नाहीत, हा प्रश्न अनाकलनीय आहे.