शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
2
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
3
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
4
"बँकर नाही, तुम्ही DJ बना," गोल्डमॅन सॅक्सच्या सीईओंवर डोनाल्ड ट्रम्प यांचा संताप; म्हणाले, "तुमचे अंदाज..."
5
म्युच्युअल फंड-स्टॉक नाही! 'या' ठिकाणी पैसे गुंतवण्यासाठी लोकांचा कल वाढला, पाहा तुमच्याकडे संधी आहे का?
6
६ शिफ्टमध्ये २८ मंत्र्यांची ड्युटी...यूपी विधानसभेत २४ तासांचं ऐतिहासिक कामकाज, कारण काय?
7
Ladki Bahin Yojana: ‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
8
ट्रम्पमुळे ज्यांचे रक्त खवळतेय त्या सामान्यांना काहीच नाही; तेल कंपन्यांना २५ टक्के नफा, सरकार घेतेय ४५ टक्के टॅक्स...
9
जगाच्या नकाशावरचा 'हा' देश बनलाय भूकंपाचं केंद्र; दर तासाला जाणवतात १८ भूकंपाचे झटके!
10
३ वर्षांपूर्वी बिझनेसला सुरुवात! आता थेट गुगलला क्रोम ब्राउझर खरेदी करण्याची ऑफर; कोण आहे अरविंद श्रीनिवास?
11
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
12
'आदित्य ठाकरे' नावामुळे घोळ! लायसन्स पाहून अभिनेत्याला पोलिसांनी अडवलं, आधार कार्ड पाहिलं अन्...
13
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
14
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
15
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
16
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
17
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
18
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
19
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
20
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

पीकविम्याची रक्कम कपात केल्यास गुन्हे दाखल करू

By admin | Updated: July 14, 2015 02:14 IST

वाश्मि जिल्हाधिका-यांचा बँकांना सज्जड दम; पीक व्यवस्थापनाबाबत केले मार्गदर्शन.

वाशिम : गतवर्षीच्या पीक नुकसानाची भरपाई म्हणून राष्ट्रीय पीक विमा योजनेतून शेतकर्‍यांना ५८ कोटी रुपये मिळाले आहेत. पीक विमा भरपाईची रक्कम थेट शेतकर्‍याच्या खात्यामध्ये जमा होणार असून, बँकांनी त्यामधून कर्ज वसुली केल्यास संबंधित बँक प्रशासनाविरुद्ध गुन्हे दाखल केले जातील, असा सज्जड दम जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी बँक प्रशासनाला दिला आहे. पीक-परिस्थितीबाबत जिल्हाधिकार्‍यांनी १३ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी विविध विषयांवर माहिती दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण, जिल्हा उपनिबंधक ज्ञानेश्‍वर खाडे, डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाचे प्रा. भरत गीते उपस्थित होते. जिल्ह्यात खरीप हंगामासाठी मोठ्या प्रमाणात पेरणी झाली असताना पावसात खंड पडल्याने उगवण झालेली पिके संकटात सापडली आहेत. येत्या पाच ते सहा दिवसात पाऊस झाल्यास या पिकांवरील संकट दूर होईल. तरीही जिल्ह्यात दुबार पेरणीची वेळ आल्यास जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये पुरेसा बी-बियाणे साठा उपलब्ध आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी दिली. वेळेत पाऊस न आल्यास दुबार पेरणीची वेळ आल्यास आपत्कालीन परिस्थितीमध्ये ३१ जुलै २0१५ पेरणी करता येईल. त्यासाठी जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांमध्ये २९ हजार ६३५ क्विंटल सोयाबीनचे बियाणे, ७२४ क्विंटल तूर बियाणे उपलब्ध आहे. तसेच सुधारित ज्वारीच्या वाणाचे २00 क्विंटल बियाणे महाबीजकडे उपलब्ध असून सुधारित बाजरीचे ८ क्विंटल व मका १२ क्विंटल बियाणे उपलब्ध आहे, याचा वापर आपत्कालीन स्थितीत शेतकर्‍यांना पेरणीसाठी करता येईल. तसेच ज्या शेतकर्‍यांकडे घरगुती बियाणे उपलब्ध आहे, त्यांनी बियाणांची उगवण क्षमता तपासून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले. सद्यपरिस्थितीमध्ये जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्यासाठी शेतकर्‍यांनी पिकांमध्ये आंतर मशागतीला प्राधान्य द्यावे. त्यासाठी रोपांची विरळणी, कोळपणी, डवरणी करून पिकास मातीची भर द्यावी. पाण्याची उपलब्धता असल्यास तुषार सिंचनाद्वारे पाणी देणे, नुसत्या पाण्याची किंवा ५ टक्के कंपोस्ट खताचा अर्क किंवा ५ टक्के गांडूळ खताचा अर्क किंवा १ टक्के युरिया मि२िँं१्रूँं१त पाण्याची फवारणी केल्यास पीक जास्त काळ तग धरू शकेल. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास शेतकर्‍यांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज असून, शेतकर्‍यांनी धीर धरावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले.