शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

सरपंचांना क्षमता बांधणी प्रशिक्षण योग्यवेळी दिल्यास गाव झपाट्याने समृद्ध होईल.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:42 IST

मानोरा : गावहिताच्या दृष्टिकोनातून आदर्श गाव ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी गावच्या सरपंचांना क्षमता बांधणी प्रक्षिक्षण योग्यवेळी दिल्यास गाव ...

मानोरा : गावहिताच्या दृष्टिकोनातून आदर्श गाव ही संकल्पना अस्तित्वात आणण्यासाठी गावच्या सरपंचांना क्षमता बांधणी प्रक्षिक्षण योग्यवेळी दिल्यास गाव झपाट्याने समृद्ध होईल, असे प्रतिपादन जलदूत रवींद्र इंगोले यांनी तालुक्यातील कारखेडा ग्रामपंचायतीकडून आयोजित कार्यक्रमात बुधवारी (३१ मार्च) केले.

कारखेडाच्या नवनिर्वाचित सरपंच सोनाली बबन सोळंके यांनी महाराष्ट्रभर जलसाक्षरता आणि ‘पंचायत राज’चे नवनिर्वाचित सरपंचांचे प्रवीण प्रशिक्षण रवींद्र इंगोले (यशदा, पुणे) यांच्या ग्रामपंचायत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या प्रशिक्षणामध्ये नेतृत्व आणि विकासाची दृष्टी, सरपंचपदाचे कार्य, अधिकार व जबाबदारी याविषयी माहिती देण्यात आली. यावेळी जलदूत रवींद्र इंगोले यांनी गाव विकासासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी पंचायत राज पुस्तक, पाण्याचा ताळेबंद आणि वृक्ष भेट देत सरपंच सोनाली सोळंके यांचा सत्कार केला.

या कार्यक्रमाला उपसरपंच अनिल सीताराम काजळे, ग्रामपंचायत सदस्य चैताली विवेक परांडे, जलदूत माधुरी कांबळे, पुष्पा चव्हाण, नंदा काजळे, अरूणा जाधव, कमला राठोड, किशोर देशमुख, राजू राऊत, शैलेश देशमुख उपस्थित होते. या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल कारखेड़ा ग्रामपंचायतीचे कौतुक केले जात आहे.