शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पुरेसे पाणी उपलब्ध असल्यासच रब्बीची पेरणी करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 01:33 IST

वाशिम : जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत  सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या  प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या  परवडण्यासारखी नाही त्याकरिता पुरेसे पाणी उपलब्ध  असल्यासच रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी गावसाने यांनी केले आहे.

ठळक मुद्देजिल्हा अधीक्षक कृषी अधिकार्‍यांचे आवाहन सरासरी पाऊस ७३ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच संरक्षीत  सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये मोठ्या  प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या  परवडण्यासारखी नाही त्याकरिता पुरेसे पाणी उपलब्ध  असल्यासच रब्बीची पेरणी करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक  कृषि अधिकारी गावसाने यांनी केले आहे.जिल्हयाचे सरासरी पर्जन्यमान ७९८ मी.मी. असून आजमितीस  ५८८ मी.मी. पाऊस झालेला असून तो सरासरी पावसाच्या ७३  टक्के आहे. जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे धरणामध्ये सुध्दा  फक्त २६ टक्के पाणीसाठा झालेला असून भूगभार्तील पाण्याच्या  पातळीत विशेष वाढ झालेली नाही. जिल्ह्यात नदीनाले व ओढे  यामध्येही विशेष पाणी साठलेले दिसून येत नाही. तसेच  विहीरी/बोअरवेलच्या पाण्यामध्ये म्हणावी अशी वाढ दिसून येत  नाही. अशा परिस्थितीमध्ये गव्हासारखी बागायती पिकाची पेरणी  घ्यावयाची झाल्यास ज्यांच्याकडे पुरेसे पाणी उपलब्ध आहे अशा  शेतकर्‍यांनीच गव्हासारख्या बागायती पिकाची पेरणी करावी.  हरबर्‍यांची पेरणी ही वेळेच्या आत म्हणजेच कोरडवाहू पेरणी  ३0 ऑक्टोंबर व बागायतची पेरणी १५ नोव्हेंबरपयर्ंतच पुर्ण  करावी. गहू हरभरा या पिकांपेक्षा कमी पाणी लागणारे रब्बी  हंगामातील करडई हें एक पिक आहे. अशा परिस्थितीमध्ये १५  ऑक्टोंबर पयर्ंत करडई या पिकाची पेरणी फायदेशीर ठरु शकते.  या वर्षीच्या अपुर्‍या पर्जन्यमानामुळे जमीनीत पुरेसा ओलावा उ पलब्ध नाही. तरी शेतकरी बांधवांना विशेष दक्षता घेण्यासाठी  तसेच हंगामामध्ये जमीनीत पुरेसा ओलावा नसताना तसेच  संरक्षीत सिंचनाची सुविधा नसतांना पेरणी केल्यास उत्पादनामध्ये  मोठ्या प्रमाणावर घट येऊ शकते, तसेच ही बाब आर्थिकदृष्ट्या  परवडण्यासारखी नाही हेही लक्षात घेणे आवश्यक आहे, असे  आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी गावसाने यांनी केले  आहे. -