शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

पतीची साथ अर्ध्यावर सुटली; पण हिंमत नाही तुटली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:38 IST

भर जहागिर : संसाराच्या वेलीवर फुललेल्या दोन फुलांसोबत संसाराचा गाडा सुरळीत चाललेला असतानाच पतीची साथ अर्ध्यावर सुटली; पण अशाही ...

भर जहागिर : संसाराच्या वेलीवर फुललेल्या दोन फुलांसोबत संसाराचा गाडा सुरळीत चाललेला असतानाच पतीची साथ अर्ध्यावर सुटली; पण अशाही स्थितीत स्वत:ला सावरत कुंताताईंनी हिंमत नाही तुटू दिली. पती अचानक जग सोडून गेल्यानंतर त्यांनी बाळगलेले स्वप्न कुंताताईंनी प्रत्यक्षात उतरवत दोन्ही मुलांना एमबीबीएसचे शिक्षण मिळवून दिले. कुंताताईंचा हा जीवनप्रवास समाजातील अन्य महिलांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरावा असाच आहे.

भर जहागिर येथील परशराम गरकळ यांचा विवाह कुंताताई यांच्याशी १९९३ मध्ये झाला. १९९५ मध्ये हे कुटुंब व्यवसायानिमित्त नजिकच्या बोरखेडी येथे स्थायिक झाले. कालांतराने त्यांना एक मुलगा व एक मुलगी झाली. दोन्ही मुले अभ्यासात हुशार असल्याने त्यांची जवाहर नवोदय विद्यालय, वाशिम येथे २००७ व २०१२ मध्ये निवड झाली. अशात डॉ. गरकळ यांचे निधन झाले. त्यामुळे कुंताताईंवर आभाळ कोसळण्यासोबतच मुलांना डॉक्टर बनविण्याचे पतीने बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारीही ओढवली. मुलांनीही आई-वडिलांच्या अपेक्षांना सार्थ ठरविले. मुलगा आकाश याची २०१५ मध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी वर्णी लागली. आकाश हे शिक्षण घेत असतानाच मुलगी पल्लवीनेही २०२० मध्ये परीक्षा उत्तीर्ण करत एमबीबीएसच्या शिक्षणासाठी प्रवेश मिळविला. यामुळे डॉ. परशराम गरकळ यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकार झाले आहे. वडिलांची साथ लहानपणीच सुटली; पण आमची आईच दोन्ही भूमिकांमधून प्रेरणा देत राहिल्यानेच यश गाठणे शक्य झाल्याचे आकाश व पल्लवी गरकळ या बहीण-भावांनी सांगितले.