शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

मालेगाव येथे वादळी वाऱ्याने घरांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:29 IST

मालेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण कायम आहे. अधून-मधून सोसाट्याचा वाराही सुटत आहे. अशात २९ मे रोजी सायंकाळच्या ...

मालेगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून ढगाळी वातावरण कायम आहे. अधून-मधून सोसाट्याचा वाराही सुटत आहे. अशात २९ मे रोजी सायंकाळच्या सुमारास आकाशात मेघ दाटून येत विजांचा कडकडाट सुरू झाला. वादळी वाऱ्यासह सुमारे अर्धा तास धुवाधार पाऊस झाला. वाऱ्याचा वेग प्रचंड प्रमाणात असल्याने अनेकांच्या घरांवरील टिनपत्रे उडून झाडांवर, विद्युत खांबांवर जाऊन अडकली. परिसरातील अनेक मोठी झाडे वादळी वाऱ्याने उन्मळून पडली. अचानक ओढावलेल्या या नैसर्गिक संकटामुळे अधिकांश गोरगरिबांच्या घरांवरील उडालेली टिनपत्रे त्यांना कुठेच सापडली नाहीत. त्यामुळे ऐन कोरोनाच्या संकटकाळात हाताला कुठलेही काम नसताना घरावर नवीन टिनपत्रे कसे टाकणार, असा प्रश्न त्यांच्यासमक्ष उभा ठाकला आहे.

....................

तारा तुटल्याने विद्युत पुरवठा खंडित

वादळी वाऱ्यामुळे अनेकांच्या घरांवरील टिनपत्रे उडून थेट विद्युत खांब व तारांवर जाऊन अडकले. यामुळे काही ठिकाणच्या विद्युत प्रवाहित तारा तुटून पडल्या यामुळे बराचवेळ विद्युत पुरवठा खंडित राहिला. ‘महावितरण’ची यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली असून ३० मे रोजी दुरूस्तीची कामे सुरू असल्याचे पाहावयास मिळाले.

...............

आधीच उत्पन्नात घट; त्यात भिजला भुईमूग

मालेगाव तालुक्यात सध्या भुईमूग काढून घेण्याच्या कामास वेग आला आहे. २९ मे रोजी काही शेतांमध्ये हे काम सुरू असतानाच वादळी वारा सुटून जोरदार पाऊस कोसळला. त्यामुळे अनेकांचा भुईमूग भिजून नुकसान झाले. भुईमुगास कडक उन्ह देण्याची गरज भासत आहे; मात्र ३० मे रोजीदेखील ढगाळी वातावरण कायम राहिल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.