शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

मतदारांपर्यंत पोहोचायचे कसे?

By admin | Updated: September 21, 2014 22:43 IST

वाशिम जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छूकांना पडला प्रश्न.

वाशिम : कॉग्रेस व राष्ट्रवादी कॉग्रेसच्या आघाडीमध्ये जागावाटपावरून आलेली बिघाडी,शिवसेना- भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमधील खेचाखेची त्यातच सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार अद्याप निश्‍चित होत नसल्याने इच्छूकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली आहे. नामांकन भरण्याच्याच्या प्रक्रियेनंतर प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार असल्याने प्रत्ये उमेदवारांडे पोहोचायचे कसे असा प्रश्नही इच्छूकांना भेडसावत आहेत.ज्यांना उमेदवारीची खात्री आहे किंवा पक्षाकडून ह्यकाम सुरू कराह्ण असा संदेश आला आहे, अश्या इच्छूकांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे. काही विद्यमान आमदारही सद्या रेडझोन मध्ये आहेत. त्यामुळे प्रचाराला सुरूवात करावी तरी कशी, प्रचाराला सुरूवात केली आणि वेळेवर उमेदवारीने हुलकावणी दिलीच तर मेहनत व पैसा दोन्हीही पाण्यात जाण्याची भीती आहे. जिल्ह्यातील काही विद्यमान आमदार आणि इतर पक्षांतील दोन-चार इच्छुक उमेदवारी मिळण्याच्या शक्यतेवर प्रत्यक्ष प्रचाराला लागले आहेत. मात्र, आघाडी व महायुती झाली नाही तर काय होईल, या चिंतेने त्यांनाही ग्रासले असून, परिचय पत्रके, बॅनर तसेच इतर प्रचार साहित्य तयार करण्यात अडचणी येत असल्याचे एका इच्छूकाने सांगितले. ऐन निवडणूकीच्या तोंडावर आघाडीत बिघाडी झाली तर घटक पक्षांतील नेत्यांची छापलेली छायाचित्रे अडचणीची ठरतील. त्यामुळे हे काम सध्या स्थगितच ठेवले असल्याचेही दिसून येत आहे. ** प्रचार साहित्याची जुळवाजुळव करताना उमेदवारांची होणार दमछाकभारतीय जनता पक्ष- शिवसेना- रिपाइं- शिवसंग्राम- स्वाभिमानी शेतकरी संघटना- राष्ट्रीय समाज पक्ष यांच्यातील महायुती तुटण्याच्या उंबरठय़ावर आली आहे. महायुती तुटल्यास सर्वच पक्षाची पंचाईत होणार आहे. महायुतीच्या काही घटक पक्षांनी प्रचारासाठी पोस्टर, बॅनर्स बनविले आहे. त्यावर महायुतीतीलसर्वच घटक पक्षांच्या नेत्यांचे छायाचित्र आहे, सदर पक्षांचे निशान अथवा लोगो आहे. महायुती तुटल्यास हे सर्व साहित्य कचर्‍यात फेकावे लागेल. विधानसभेचे मतदान अगदी तोंडावर येऊन ठेपले असताना या कमी कालावधीत या साहित्याची जुळवाजुळव करताना राजकीय पक्षाच्या नाकीनऊ येणार असल्याचेच दिसून येत आहे. सर्वात किचकट बाब म्हणजे महायुतीच्या प्रचारासाठी एक गीत तयार करण्यात आले आहे. या गीतामध्ये महायुतीचा भगवा फडकविण्याचे आवाहन मतदारांना करण्यात आले आहे. आता महायुती तुटल्यास हे गीत बदलावे लागणार आहे.