शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

किती ही लूट? मुख्य भाजीबाजारात कांदा ३०, तर घराजवळ २० रुपये किलो !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:40 IST

भाजी बाजारात एकाच ठिकाणी अनेक भाजी विक्रेते बसलेले असल्याने बहुतांश ठिकाणी समसमान भाव दिसून येतात. एखादी भाजी ताजी व ...

भाजी बाजारात एकाच ठिकाणी अनेक भाजी विक्रेते बसलेले असल्याने बहुतांश ठिकाणी समसमान भाव दिसून येतात. एखादी भाजी ताजी व फ्रेश असल्यासच अपवाद. परंतु घरासमाेर असलेल्या भाजी विक्रेत्यांकडून बाजारात मिळणाऱ्या भाजीपाल्याचे भाव निम्या दरात आढळून आले आहेत. केवळ बाजारात फ्रेश व ताजी भाजी मिळते म्हणून अनेक नागरिक बाजारात जातात परंतु त्यांचे माेठ्या प्रमाणात नुकसान हाेत असल्याचे आढळून आले आहे. भाजी बाजारात काेणतीही भाजी २० रुपये पाव आहे, तीच भाजी घराजवळ १० ते १५ रुपयाने मिळतेय.

...........

पाटणी चौकात काेबी ८० रुपये, इतर ठिकाणी ४० रुपये किलो

वाशिम शहरातील पाटणी चाैक परिसरात अनेक वर्षापासून भाजी बाजार भरविण्यात येताे. तसेच बाजूला महात्मा फुले भाजी मार्केट आहे. येथे मिळणाऱ्या भाज्यांचे भाव २० रुपये पाव, ८० रुपये किलाे आहेत. हेच भाव घराजवळील भाजी विक्रेत्यांकडे कमी दिसून येतात.

..........

पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात !

रात्रंदिवस शेतात राबून शेतकरी भाजीपाला उत्पादन घेतात. हर्रासीमध्ये नेल्यावर त्यांना माती माेल भाव मिळताे, मात्र ताेच भाजीपाला लघु व्यावसायिक उच्च दरात विकून माेठ्या प्रमाणात नफा कमावितात.

अनेक शेतकऱ्यांनी हर्रासीमध्ये माल न विकता आता स्वताहून विकणे सुरु केले आहे. याचा फायदा अनेक शेतकऱ्यांना हाेत आहे. काही शेतकरी अद्यापही हर्रासीमध्ये माल विकत असल्याने त्यांच्या हाती तुटपुंजे पैसे येत आहेत.

पिकवतात शेतकरी, जास्तीचा पैसा तिसऱ्याच्याच हातात!

...............

अर्धा-पाव किलोसाठी होलसेल बाजारात जाणे परवडत नाही!

अर्धा एक किलाे भाजी हर्रासीमध्ये घेण्यास गेल्यास व्यापारी शक्यताेवर भाजीपाला देण्यास नकार देतात. पर्यायी भाजी बाजारातून महाग भाजीपाला घ्यावा लागताे

- अर्चना काळे, वाशिम

घराजवळ येत असलेल्या भाजीवाल्याकडून भाजीपाला दरराेज लागेल तेवढाच घेण्यात येताे. बाजारात गेल्यास आठवडाभराचा भाजीपाला महाग पडताे.

- पिंकी सुखदेव, वाशिम

..........

एवढा फरक कसा?

हर्रासीमधून भाजीपाल्याची बाेली लावल्यानंतर हर्रासी देण्यापासून तर दुकानापर्यंत भाजीपाला आणण्यासाठी खर्च येताे. या खर्चासह भाजीपाल्याचे भाव ठरविण्यात येतात.

गणेश माेहळे, व्यापारी

हर्रासीमधील भावात व चिल्लर विक्रीच्या भावात तफावत असण्यामागील कारण भाजीपाला व्यापाऱ्याने खरेदी केल्यानंतर त्याला वाहतूक खर्च लागताे. तसेच लवकर भाजीपाला विकल्या न गेल्यास ताे खराब हाेण्याची शक्यता असते.

रुपेश खानझाेडे, व्यापारी

..........