शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
3
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
4
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
5
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
6
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
7
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
8
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
9
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
10
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
11
मृणाल ठाकूरच नाही धनुषचं 'या' अभिनेत्रींसोबतही जोडलं होतं नाव, एक तर सुपरस्टारची लेक
12
Asia Cup 2025 : 'विराट' स्वप्न साकार करणाऱ्या या भिडूवर गंभीर भरवसा दाखवणार?
13
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
14
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
15
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
16
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
17
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
18
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
19
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
20
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले

शेतकरी हवालदिल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:28 IST

शेतातील सोयाबीनचे बियाणे न उगविल्यासंदर्भात त्रिस्तरीय समितीने दोन महिन्यांपूर्वी पाठविलेल्या अहवालावर महाबीजने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. दुसरीकडे आता सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याने कृषी विभागाने पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर करावा, या मागणीसाठी शेकडो शेतकर्‍यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत.

ठळक मुद्देबियाण्यासंदर्भात महाबीजचा अहवाल अप्राप्त नापिकीबाबत तक्रारींचा ओघ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतातील सोयाबीनचे बियाणे न उगविल्यासंदर्भात त्रिस्तरीय समितीने दोन महिन्यांपूर्वी पाठविलेल्या अहवालावर महाबीजने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. दुसरीकडे आता सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याने कृषी विभागाने पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर करावा, या मागणीसाठी शेकडो शेतकर्‍यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत.यावर्षी पेरणीच्या हंगामात मानोरा तालुक्यातील जवळपास ४00 एकरांवरील महाबीजचे सोयाबीन बियाणे उगविले नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी तालुका व जिल्हा कृषी विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने २८ जून रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी आवाज उठविला होता. त्रिसदस्यीय समितीद्वारे घटनास्थळाला भेट पाहणी अहवाल तयार करण्याची मागणी लावून धरली होती. याची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापत्रे यांना दिले होते. तातडीने त्रिसदस्यीय समिती नेमून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता खूपच कमी असल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले. यासंदर्भातील अहवाल कृषी विभागाच्यावतीने महाबीजच्या विभागीय व्यवस्थापकांकडे जुलै महिन्यात पाठविण्यात आला. जुलै व ऑगस्ट असा दोन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र अद्याप महाबीजने हा अहवालावर उत्तर दिले नाही किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी पत्रव्यवहारदेखील केला नाही, असे कृषी विकास अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. या अहवालावर शेतकर्‍यांना मिळणारी नुकसान भरपाई अवलंबून आहे. बियाणे उगवले नसल्याने जवळपास १00 शेतकर्‍यांना जबर फटका बसला आहे. मंगरूळपीर, रिसोड, मालेगाव तालुक्यातील बियाणे उगविले नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी होत्या. याचा अहवालदेखील अप्राप्त आहे. आता नापिकी असल्याने प्रशासनाने सर्व्हे करून शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. 

भेसळयुक्त बियाण्यांवरही कार्यवाही नाही मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील गोविंदा मोतीराम भगत यांच्या शेतात महाबीजचे बियाणे भेसळयुक्त असल्याचा प्रकार जुलै महिन्यात उघडकीस आला होता. याप्रकरणी ‘लोकमत’ने २५ जुलैच्या अंकात ‘पेरले एक, उगवले दुसरेच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून कृषी विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल कृषी विभागाने १ ऑगस्ट रोजी संबंधित शेतकर्‍यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतात अन्य प्रकारचे ७0 टक्के बियाणे असल्याचे कृषी विभागाच्या चमूला आढळून आले होते. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी गोविंदा भगत यांनी केलेली आहे. अद्याप यावर कुठलीच कार्यवाही नाही.

पंचनामे करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमकपावसात सातत्य नसल्याने व गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आता हलक्या जमिनीवरील सोयाबीन पीक हातचे गेले आहे, तर दज्रेदार जमिनीवरील सोयाबीन धोक्याच्या पातळीवर आहे. कारंजा, मानोरा, रिसोड, मंगरूळपीर तालुक्यातील शेकडो एकरावरील सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागातर्फे पाहणी केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने पाहणी करून अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणी माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमेंद्र ठाकरे यांच्यासह शेतकर्‍यांनी बुधवारी केली.-