शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

शेतकरी हवालदिल !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2017 01:28 IST

शेतातील सोयाबीनचे बियाणे न उगविल्यासंदर्भात त्रिस्तरीय समितीने दोन महिन्यांपूर्वी पाठविलेल्या अहवालावर महाबीजने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. दुसरीकडे आता सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याने कृषी विभागाने पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर करावा, या मागणीसाठी शेकडो शेतकर्‍यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत.

ठळक मुद्देबियाण्यासंदर्भात महाबीजचा अहवाल अप्राप्त नापिकीबाबत तक्रारींचा ओघ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शेतातील सोयाबीनचे बियाणे न उगविल्यासंदर्भात त्रिस्तरीय समितीने दोन महिन्यांपूर्वी पाठविलेल्या अहवालावर महाबीजने अद्याप कोणतेही उत्तर दिले नाही. दुसरीकडे आता सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याने कृषी विभागाने पाहणी करून शासनाकडे अहवाल सादर करावा, या मागणीसाठी शेकडो शेतकर्‍यांच्या तक्रारी कृषी विभागाकडे येत आहेत.यावर्षी पेरणीच्या हंगामात मानोरा तालुक्यातील जवळपास ४00 एकरांवरील महाबीजचे सोयाबीन बियाणे उगविले नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी तालुका व जिल्हा कृषी विभागाकडे केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने २८ जून रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी आवाज उठविला होता. त्रिसदस्यीय समितीद्वारे घटनास्थळाला भेट पाहणी अहवाल तयार करण्याची मागणी लावून धरली होती. याची दखल घेत जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश कृषी विकास अधिकारी नरेंद्र बारापत्रे यांना दिले होते. तातडीने त्रिसदस्यीय समिती नेमून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. महाबीजच्या सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता खूपच कमी असल्याचे या पाहणीत स्पष्ट झाले. यासंदर्भातील अहवाल कृषी विभागाच्यावतीने महाबीजच्या विभागीय व्यवस्थापकांकडे जुलै महिन्यात पाठविण्यात आला. जुलै व ऑगस्ट असा दोन महिन्यांचा कालावधी लोटला; मात्र अद्याप महाबीजने हा अहवालावर उत्तर दिले नाही किंवा जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी पत्रव्यवहारदेखील केला नाही, असे कृषी विकास अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. या अहवालावर शेतकर्‍यांना मिळणारी नुकसान भरपाई अवलंबून आहे. बियाणे उगवले नसल्याने जवळपास १00 शेतकर्‍यांना जबर फटका बसला आहे. मंगरूळपीर, रिसोड, मालेगाव तालुक्यातील बियाणे उगविले नसल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी होत्या. याचा अहवालदेखील अप्राप्त आहे. आता नापिकी असल्याने प्रशासनाने सर्व्हे करून शासनाकडे अहवाल सादर करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. 

भेसळयुक्त बियाण्यांवरही कार्यवाही नाही मंगरुळपीर तालुक्यातील चांभई येथील गोविंदा मोतीराम भगत यांच्या शेतात महाबीजचे बियाणे भेसळयुक्त असल्याचा प्रकार जुलै महिन्यात उघडकीस आला होता. याप्रकरणी ‘लोकमत’ने २५ जुलैच्या अंकात ‘पेरले एक, उगवले दुसरेच’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून कृषी विभागाचे लक्ष वेधले होते. याची दखल कृषी विभागाने १ ऑगस्ट रोजी संबंधित शेतकर्‍यांच्या शेताला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी शेतात अन्य प्रकारचे ७0 टक्के बियाणे असल्याचे कृषी विभागाच्या चमूला आढळून आले होते. नुकसान भरपाई मिळण्याची मागणी गोविंदा भगत यांनी केलेली आहे. अद्याप यावर कुठलीच कार्यवाही नाही.

पंचनामे करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमकपावसात सातत्य नसल्याने व गत काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने आता हलक्या जमिनीवरील सोयाबीन पीक हातचे गेले आहे, तर दज्रेदार जमिनीवरील सोयाबीन धोक्याच्या पातळीवर आहे. कारंजा, मानोरा, रिसोड, मंगरूळपीर तालुक्यातील शेकडो एकरावरील सोयाबीनला शेंगाच धरल्या नसल्याच्या तक्रारी शेतकर्‍यांनी कृषी विभागाकडे केल्या आहेत. या तक्रारीच्या अनुषंगाने कृषी विभागातर्फे पाहणी केली जाणार आहे. जिल्हा प्रशासनाने पाहणी करून अहवाल शासनाकडे सादर करावा, अशी मागणी माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती हेमेंद्र ठाकरे यांच्यासह शेतकर्‍यांनी बुधवारी केली.-