शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

गारपीटग्रस्तांच्या सर्वेक्षणात शेतकर्‍यांवर अन्याय

By admin | Updated: July 2, 2014 00:35 IST

मार्च महिन्यात झालेल्या गारपिट नुकसानीच्या सर्व्हेक्षणात शेतकर्‍यांवर अन्याय करण्यात आला

आसेगाव पो.स्टे. : नांदगाव येथे मार्च महिन्यात झालेल्या गारपिट नुकसानीच्या सर्व्हेक्षणात शेतकर्‍यांवर अन्याय करण्यात आला असून घरी बसल्या हे सव्है्रक्षण करण्यात आल्याचे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार यांना दिले आहे. न्याय न मिळाल्यास उपोषणाचा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.मार्च महिन्यात जिल्हयात गारपीट होऊन शेतकर्‍यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये आसेगाव परिसरातील शेतकर्‍यांचाही मोठया प्रमाणात सहभाग आहे. या भागाचे सर्व्हेक्षण यादीमध्ये अनेक जणांना वगळल्याने शेतकरी संतप्त झाले. या संदर्भात नांदगाव येथील शेतकर्‍यांनी तहसीलदार अरखराव यांना निवेदन देवून न्यायाची मागणी केली आहे. शेतकर्‍यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, नुकसान ग्रस्त भागाची पाहणी कोणत्याच अधिकार्‍यांनी न करता घरी बसल्या यादया तयार केल्याने यामध्ये पात्र लाभार्थ्यांना डावलण्यात आले तर ज्यांचे नुकसान झाले नाही त्यांना यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. नादंगाव येथील ४0 शेतकर्‍यांचे नुकसान झाल्यानंतरही त्यांना वंचित ठेवल्याबद्दल दोषिंवर कारवाई करावी व शेतकर्‍यांना न्याय मिळवून दयावा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी बबन ठाकरे, गजानन ठाकरे, रामदास ठाकरे, नामदेव सानप, कडुजी वर्‍हाडे, सिताराम सानप हजर होते.