शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

फळबाग योजनेला तिलांजली

By admin | Updated: November 4, 2015 03:03 IST

मानोरा तालुक्यात शेकडो हेक्टरचे प्रस्ताव धूळ खात!

जगदीश राठोड / मानोरा (जि. वाशिम) : शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध व्हावा यासाठी शासनातर्फे कृषी विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत; परंतु प्रत्यक्षात शेतकर्‍यांना त्याचा लाभ मिळत नाही. अधिकार्‍यांना योजना राबविण्यासाठी स्वारस्य नसल्याने मूळ उद्देशाला मूठमाती मिळत आहे. मानोरा तालुक्यात फळबाग योजनेची हीच परिस्थिती आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेकडो हेक्टरचे प्रस्ताव धूळ खात संबंधितांकडे पडून आहे. कृषी विभागाकडून अल्पभूधारक शेतकर्‍यांसाठी फळबाग योजना राबविली जात आहे. महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत ही योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेच्या लाभासाठी अनेक अर्ज दाखल झालेले आहेत. सुरुवातीला कृषी विभाग, त्यानंतर तसहील प्रशासनाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविले जातात; परंतु तत्काळ, तर दूर कित्येक वर्षापर्यंंत प्रस्तावावरची धूळ झटकली जात नाही आणि चुकून प्रस्तावांच्या फाइलला हात लागला तरी विविध प्रकारच्या त्रुट्या काढून संबंधिताना वारंवार चकरा मारण्यास भाग पाडले जाते. प्रत्यक्षात कृषी विभागानेच त्रुटीची पूर्तत: करून फाइल तहसील कार्यालयाकडे पाठविण्याचे अपेक्षा आहे; परंतु त्यांनाही या विषयात स्वारस्य नाही. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणार्‍या अनेक लोकाच्या फायली मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यानच्या काळात काही लोकांना कृषी विभागाने पुळझाडे लावण्यासाठी शेतजमिनीवर खड्डे खोदून ठेवण्याचा सल्ला दिला आशेपोटी शेतकर्‍यांनीही प्रक्रिया पूर्ण केली; परंतु फळझाडासाठीच्या प्रस्तावाला मंजुरीच दिली नाही. यात शेतकर्‍यांचा पैसा व्यर्थ गेला. तहसील आणि कृषी विभागामध्ये समन्वय नसल्याने शेतकर्‍यांची गळचेपी सुरू आहे. सदर योजनाच फसवी असल्याच्या प्रतिक्रिया शेतकर्‍यांमधून व्यक्त होत आहे. कोरडवाहू शेती बेभरवशी झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचा ओलीत करून विविध प्रकारचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. तरीही तहसील विभाग केवळ प्रस्ताव मंजूर करण्यातही चालढकल करत आहे.