शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

१८ हजार बेघरांना मिळणार घर!

By admin | Updated: September 2, 2016 01:23 IST

प्रधानमंत्री आवास योजनेचा कृषी सभापतींनी घेतला आढावा.

वाशिम, दि. १ : प्रधानमंत्री आवास योजनेतून जिल्ह्यात सन २0१६-१७ या वर्षात १७ हजार ५00 घरकुलांचे उद्दिष्ट मिळाले असून, ग्रामीण भागातील पात्र व बेघर कुटुंबीयांना या घरकुलांचा लाभ मिळावा म्हणून कृषी सभापतींनी ग्रामसेवकांशी चर्चा करून बुधवारी आढावा घेतला.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २0२२ पर्यंत ह्यसर्वांसाठी घरह्ण या संकल्पनेतून प्रधानमंत्री आवास योजना जाहीर केली आहे. त्या योजनेचा पहिला टप्पा २0१६-१७ ते २0१८-१९ पर्यंत आहे. नवीन घरकुल निर्माण करण्यासाठी ग्रामीण स्तरावर ग्रामसभेच्या माध्यमातून पात्र लाभार्थींंची यादी तयार करण्याचे काम सुरू असून, या यादीमध्ये गावातील गोरगरीब कुटुंबाला १00 टक्के लाभ मिळावा, म्हणून ग्रामपंचायत, पंचायत समिती स्तर व जिल्हास्तरीय ग्रामीण विकास यंत्रणेकडून योग्य मार्गदर्शन मिळावे, अशी अपेक्षा कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप यांनी व्यक्त केली. अनेक गावांमध्ये नवीन लाभार्थींचे नाव समाविष्ट करण्यात येत नसल्याचे निदर्शनात आले असून, ही गंभीर बाब असल्याचे सानप म्हणाले. शासन निर्णयातील अ, ब, क, ड अनुक्रमांकानुसार याद्या न बनविता जुन्याच याद्यांचे वाचन करून त्यातील पात्र लाभार्थीचा समावेश नवीन यादीमध्ये होत आहे. या योजनेबाबत इत्थंभूत माहिती नसल्याने पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. सदर योजनेतील पात्र लाभार्थींंना शासनामार्फत १ लाख २0 हजार रुपये रोख व ७0 हजार रुपयांपर्यंंत रक्कम कर्ज स्वरूपात मिळणार आहे. शासन निर्णयानुसार अनुक्रमांक ड प्रकारच्या यादीमध्ये नवीन पात्र लोकांचा समावेश होणे गरजेचे आहे. गावातील राजकीय मतभेद बाजूला सारून सरपंच व ग्रामसेवकांनी सर्व समाजातील आर्थिकदृष्टया दुर्बल असलेल्या व ज्यांना कच्चे घर आहे, अशा कुटुंबाना या योजनेत प्राधान्यक्रम देण्यात यावा, अशा सूचना सानप यांनी केल्या. या योजनेची माहिती व प्रसिद्धी करण्याकरिता विश्‍वनाथ सानप मित्रमंडळ हे गावोगावी फलक, पोस्टर व जनजागृती करून योग्य मार्गदर्शन करणार असल्याचे यावेळी सानप म्हणाले. यानंतरही या योजनेसंदर्भात काही अडचणी असल्यास रिसोड व मालेगाव तालुक्यातील संबंधित लाभार्थींंनी विश्‍वनाथ सानप यांचे जनसंपर्क कार्यालय व खासदार भावना गवळी यांचे जनसंपर्क कार्यालय रिसोड येथे संपर्क साधावा, असे आवाहन सभापती विश्‍वनाथ सानप यांनी केले.