शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

घरांच्या पडझडींचा सर्व्हेच नाही!

By admin | Updated: August 15, 2016 02:25 IST

जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या पडझडीचे सर्वेक्षणच नाही; जिल्हा परिषद अध्यक्षाचे पत्र.

वाशिम, दि. १४: जुलै व ऑगस्ट या महिन्यातील अतवृष्टीने जिल्ह्यातील किती घरांची व सिंचन विहिरींची पडझड झाली, याचा सर्व्हे करण्यात आला नाही. या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. जुलैचा संपूर्ण महिना तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. यामुळे बळीराजा सुखावला. मात्र, पावसाचा जोर अधिक असलेल्या भागात काही घरांची पडझड झाली तसेच सिंचन विहिरी खचल्या. या नुकसानाचा सर्व्हे केल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर होणे अपेक्षित आहे. गावपातळीवर सर्वेक्षण झाले नसल्याने नुकसानग्रस्त लाभार्थी शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ जुलै रोजी वाशिम शहरातील पंचशीलनगरमध्ये वाल्मीकी-आंबेडकर आवास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुलाचे छत कोसळले होते. ग्रामीण भागातही अनेक घरांची पडझड झाली. तसेच सिंचन विहिरी खचल्या आहेत. या नुकसानग्रस्तांना शासनाचे अर्थसहाय्य मिळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण ग्रामीण भागाचा सर्व्हे करून अहवाल तयार करावा आणि शासनाकडे तातडीने पाठवावा, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केली. यावर शासनाकडे अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.