शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
3
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
4
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
5
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
6
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
7
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
8
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
9
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
10
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
11
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
12
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
13
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
14
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
15
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
16
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
17
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
18
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
19
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
20
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

घरांच्या पडझडींचा सर्व्हेच नाही!

By admin | Updated: August 15, 2016 02:25 IST

जुलै, ऑगस्ट महिन्यात झालेल्या पडझडीचे सर्वेक्षणच नाही; जिल्हा परिषद अध्यक्षाचे पत्र.

वाशिम, दि. १४: जुलै व ऑगस्ट या महिन्यातील अतवृष्टीने जिल्ह्यातील किती घरांची व सिंचन विहिरींची पडझड झाली, याचा सर्व्हे करण्यात आला नाही. या पृष्ठभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्वेक्षण करून तातडीने शासनाकडे प्रस्ताव सादर करावा, अशा आशयाचे पत्र जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिले. जुलैचा संपूर्ण महिना तसेच ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. यामुळे बळीराजा सुखावला. मात्र, पावसाचा जोर अधिक असलेल्या भागात काही घरांची पडझड झाली तसेच सिंचन विहिरी खचल्या. या नुकसानाचा सर्व्हे केल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर होणे अपेक्षित आहे. गावपातळीवर सर्वेक्षण झाले नसल्याने नुकसानग्रस्त लाभार्थी शासनाच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. २८ जुलै रोजी वाशिम शहरातील पंचशीलनगरमध्ये वाल्मीकी-आंबेडकर आवास योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या घरकुलाचे छत कोसळले होते. ग्रामीण भागातही अनेक घरांची पडझड झाली. तसेच सिंचन विहिरी खचल्या आहेत. या नुकसानग्रस्तांना शासनाचे अर्थसहाय्य मिळणे गरजेचे आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण ग्रामीण भागाचा सर्व्हे करून अहवाल तयार करावा आणि शासनाकडे तातडीने पाठवावा, अशी मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केली. यावर शासनाकडे अहवाल सादर केला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे.