शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

हमीदराने तूर खरेदीस व्यापाºयांची ‘ना’!

By admin | Updated: June 21, 2017 13:45 IST

व्यापाºयांनी तूर खरेदीस नकार दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली.

शासनानेही झटकले हात : जिल्ह्यात ४.८३ लाख क्विंटल तूर पडून

वाशिम : हमीदराने यापुढे शासन तूर खरेदी करणार नाही, असे केंद्राने जाहीर केल्यामुळे शेतकऱ्यांची लाखो क्विंटल तूर व्यापाऱ्यांना खरेदी करून घ्यावी लागणार आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेतील तूरीचे घसरलेले दर पाहता ५०५० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक दराने तूर विकत घेवून ती कुठे विकणार, असा प्रश्न उपस्थित करित व्यापाऱ्यांनी तूर खरेदीस नकार दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. शासनाच्या दिशानिर्देशानुसार वाशिम जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी १५ ते ३१ मे या कालावधीत १७ हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना ह्यटोकनह्ण दिले. मात्र, १० जूनपासून ह्यनाफेडह्णने तूर खरेदी बंद केल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांची ४.८३ लाख क्विंटलपेक्षा अधिक तूर खरेदीअभावी घरातच पडून आहे. यासंदर्भात राज्यशासनाने केंद्रशासनाकडे प्रस्ताव पाठवून किमान ह्यटोकनह्ण दिलेल्या शेतकऱ्यांची तूर तरी खरेदी करून घेण्यास मंजूरात देण्याची विनंती केली; परंतू केंद्राने हा प्रस्ताव फेटाळला असून व्यापाऱ्यांकरवी हमीदराने तूर खरेदी करावी, असे निर्देश देवून आपले हात झटकले आहेत. त्यामुळे आता शेतकऱ्यांची पडून असलेल्या तूर खरेदीची जबाबदारी बाजार समित्यांना पेलावी लागणार आहे. असे असले तरी जागतिक बाजारपेठेतच तूरीला अपेक्षित दर मिळणे कठीण झाल्याने व्यापारी तरी हमीदरापेक्षा अधिक दराने तूर कशी खरेदी करतील, असा सवाल उपस्थित केला जात आहे.  दुसरीकडे हमीदरापेक्षा कमी दराने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्याचा फतवा जाहीर झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. एकूणच या सर्व गदारोळात आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची चिंता वाढली असून लाखो क्विंटल तूर कशापद्धतीने खरेदी केली जाईल, त्यास नेमका दर किती मिळेल, शासनाचे याप्रती धोरण काय असेल, आदी प्रश्नांनी त्यांना घेरले आहे.