शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

४,८२५ हेक्टर क्षेत्राला गारपिटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 14:47 IST

१७ आणि १८ मार्चच्या मध्यरात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह धोधो अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात मंगळवार १७ मार्च आणि बुधवार १८ मार्चच्या मध्यरात्री वादळी वाऱ्यासह झालेला पाऊस आणि गारपिट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे ५००८ शेतकऱ्यांच्या ४८२५.५ हेक्टर क्षेत्रातील रब्बी पिकांसह भाजीपाला व फळपिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला आहे.वाशिम जिल्ह्यात यंदा रब्बी पिके आणि भाजीपाला मिळून १ लाख १ हजार हेक्टर क्षेत्रावर शेतकºयांनी लागवड केली होती. त्याशिवाय फळपिकांचेही क्षेत्र लक्षणीय होते. रब्बी हंगामातील ७० टक्क्यांवर गहू आणि हरभरा ही पिके काढणीवर असताना गत आठवड्यापासून अवकाळी पावसाचा फटका या पिकांना बसत आहे. त्यातच १७ आणि १८ मार्चच्या मध्यरात्री जिल्ह्यात वादळी वाºयासह धोधो अवकाळी पाऊस आणि गारपिट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे तब्बल ५ हजार ८ शेतकºयांच्या ४ हजार ८२५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा प्रशासनाने वर्तविला. यात कारंजा तालुक्यात सर्वाधिक २ हजार ५६० शेतकºयांच्या २ हजार ४०८ हेक्टर, मंगरुळपीर तालुक्यातील १ हजार ४२४ शेतकºयांच्या १ हजार ६५ हेक्टर, वाशिम तालुक्यातील ७६६ शेतकºयांच्या १ हजार १६ हेक्टर, तर मालेगाव तालुक्यातील २५८ शेतकºयांच्या ३३६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचा समावेश आहे. नैसर्गिक आपत्तीचा फटका बसलेल्या पिकांत गहू, हरभरा, उन्हाळी भुईमुग, मका, कांदा, भाजीपाला, पपई, संत्रा, निंबू, सिताफळ आदि पिकांचा समावेश आहे. (विशेष पान २ वर)

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीHailstormगारपीट