१९ मार्च रोजी ओढवलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानाबाबत जिल्ह्यातील सहाही तहसीलदारांकडून प्राप्त माहितीवरून एकत्रित प्राथमिक अहवाल तयार करून तो विभागीय आयुक्त (पुनर्वसन विभाग) यांच्याकडे २० मार्च रोजी सादर करण्यात आला आहे. त्यानुसार, वाशिम तालुक्यातील वाशिम, कोंडाळा झामरे, नागठाणा, पार्डी आसरा, पार्डी टकमोर, अनसिंग या महसूल मंडळात १६९३ हेक्टरवरील कांदा, कडधान्य व भाजीपाला पिकांचे नुकसान झाले आहे. या मंडळांतर्गत येणाºया गावांमधील २१२३ शेतकरी यामुळे बाधीत झाले. मालेगाव तालुक्यातील किन्हीराजा, मुंगळा, करंजी, चांडस व शिरपूर महसूली मंडळात ११३२ हेक्टरवरील गहू, हरभरा, ज्वारी, भाजीपाला, टरबूज, शेवगा, पपई व सोयाबीन या पिकांना जबर फटका बसला. यामुळे १८०० शेतकºयांचे नुकसान झाले. रिसोड तालुक्यातील केनवड व गोवर्धन महसूली मंडळात १४७६ हेक्टरवरील कांदा, पपई, उन्हाळी मूग आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होऊन १८९३ शेतकरी बाधीत झाले. मंगरूळपीर तालुक्यात आसेगाव महसूली मंडळात ४६ हेक्टरवरील गहू, हरभरा, रबी ज्वारी, मूग, कांदा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होऊन ९६ शेतकºयांचे नुकसान झाले; तर मानोरा तालुक्यातील मानोरा, इंझोरी, कुपटा, शेंदुरजना, गिरोली व उमरी बु. महसूली मंडळात ५३१ हेक्टरवरील हरभरा, ज्वारी, गहू आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले असून ८६५ शेतकºयांना फटका बसल्याचे प्रशासनाने प्राथमिक अहवालामध्ये नमूद केले आहे.
............................................
अहवालात कारंजा तालुका निरंक
१९ मार्च रोजी जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये अवकाळी पाऊस, वादळीवारा आणि गारपीटीने ४८८० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे; मात्र कारंजा तालुक्यात नुकसानाचे प्रमाण निरंक असल्याचे दिसून येत आहे; तर उर्वरित पाच तालुक्यांपैकी सर्वाधिक नुकसान वाशिम तालुक्यात आणि सर्वात कमी नुकसान मंगरूळपीर तालुक्यात झाले आहे.
......................
तालुकानिहाय बाधित क्षेत्र व नुकसानग्रस्त शेतकरी संख्या
वाशिम - १६९३.२९ - २१२३
मालेगाव - ११३२.९० - १८००
रिसोड - १४७६.९० - १८१३
मंगरूळपीर - ४६.३० - ९६
मानोरा - ५३१ - ८६५
कारंजा - ०० - ००
१) बाधित क्षेत्र (हे.आर.), २) नुकसानग्रस्त शेतकरी