शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
4
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
5
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
6
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
7
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
8
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
9
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
10
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
12
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
13
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
14
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
15
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
16
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
17
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
18
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?

मदतीपासुन मंगरूळपीर तालुक्यातील गारपीटग्रस्त वंचीत

By admin | Updated: June 21, 2014 00:33 IST

गारपीटीची मदत अद्यापही काही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

मंगरूळपीर : मार्च महिण्यात झालेल्या गारपीटीची मदत अद्यापही काही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला आहे. शासनकडे गारपीटीची मदत १ कोटी ९२ लाखाची मागणी महसुल विभागानी केली असुन १३८ गावातील १६ हजार ७२१ शेतकरी खातेदारांपैकी बर्‍याच शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली नसल्याने तहसिल कार्यालयात गर्दी वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.गतवर्षी १४ जून रोजी तालुक्यात पडलेल्या पहिल्याच पावसामुळे सर्वच लहान मोठी धरणे १00 टक्के भरली होती. त्यानंतर खरीप हंगाम ओल्या दुष्काळाच्या सावटात सापडले होते नदी नाले दुथडी भरून वाहत होती.अतवृष्टीमुळे जिल्हय़ात सर्वाधीक नुकसानीची झळ मंगरूळपीर तालुक्यातील शेतकर्‍यांना बसली होती. अतवृष्टीचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होत नाही तोच रब्बी हंगामात अवेळी पावसाचा प्रकोप व गारपीट झाली त्यात ही गहु,हरभरा,फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते.गारपीटीमुळे तालुक्यात ७ हजार ९७७.५१ क्षेत्रफळाचे नुकसान झाले होते. महसुल विभागाच्या वतीने सर्व्हेक्षण करून शासनाकडे नुकसानीचा आकडा देण्यात आला होता तेव्हा पहिला टप्पा १ कोटी ३९ लाख ३ हजार ७६८ रूपये प्राप्त झाले होते.त्यानंतर ९ कोटी ३१ लाख ५७ हजार २0६ रूपये बिडीएसव्दारे प्राप्त झाले असे एकुण १0 कोटी ७0 लाख ६0 हजार ९७४ रूपयांचे अनुदान मिळाले मात्र अद्यापही शासनाकडुन १ कोटी ९२ लाखांची अनुदान रक्कम अप्राप्त आहे. या रक्कमेची मागणी करण्यात आली आहे गारपीटीची रक्कम खात्यात जमा झाली नसल्याने शेतकर्‍यांची विचारणा करण्यासाठी तहसिल कार्यालयात गर्दी वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे गारपीटीची मदत ऐन पेरणीच्या तोंडावर मिळाली तर शेतकर्‍यांना त्याचा निश्‍चित फायदा होईल त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनानी प्रयत्न करणे गरजेचे असून तशी मागणी शेतकर्‍यांतून केल्या जात आहे.