शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

मदतीपासुन मंगरूळपीर तालुक्यातील गारपीटग्रस्त वंचीत

By admin | Updated: June 21, 2014 00:33 IST

गारपीटीची मदत अद्यापही काही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

मंगरूळपीर : मार्च महिण्यात झालेल्या गारपीटीची मदत अद्यापही काही शेतकर्‍यांच्या खात्यात जमा झाली नसल्याने खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी संकटात सापडला आहे. शासनकडे गारपीटीची मदत १ कोटी ९२ लाखाची मागणी महसुल विभागानी केली असुन १३८ गावातील १६ हजार ७२१ शेतकरी खातेदारांपैकी बर्‍याच शेतकर्‍यांच्या खात्यात मदतीची रक्कम जमा झाली नसल्याने तहसिल कार्यालयात गर्दी वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.गतवर्षी १४ जून रोजी तालुक्यात पडलेल्या पहिल्याच पावसामुळे सर्वच लहान मोठी धरणे १00 टक्के भरली होती. त्यानंतर खरीप हंगाम ओल्या दुष्काळाच्या सावटात सापडले होते नदी नाले दुथडी भरून वाहत होती.अतवृष्टीमुळे जिल्हय़ात सर्वाधीक नुकसानीची झळ मंगरूळपीर तालुक्यातील शेतकर्‍यांना बसली होती. अतवृष्टीचे अनुदान शेतकर्‍यांच्या खात्यात जमा होत नाही तोच रब्बी हंगामात अवेळी पावसाचा प्रकोप व गारपीट झाली त्यात ही गहु,हरभरा,फळबागांचे प्रचंड नुकसान झाले होते.गारपीटीमुळे तालुक्यात ७ हजार ९७७.५१ क्षेत्रफळाचे नुकसान झाले होते. महसुल विभागाच्या वतीने सर्व्हेक्षण करून शासनाकडे नुकसानीचा आकडा देण्यात आला होता तेव्हा पहिला टप्पा १ कोटी ३९ लाख ३ हजार ७६८ रूपये प्राप्त झाले होते.त्यानंतर ९ कोटी ३१ लाख ५७ हजार २0६ रूपये बिडीएसव्दारे प्राप्त झाले असे एकुण १0 कोटी ७0 लाख ६0 हजार ९७४ रूपयांचे अनुदान मिळाले मात्र अद्यापही शासनाकडुन १ कोटी ९२ लाखांची अनुदान रक्कम अप्राप्त आहे. या रक्कमेची मागणी करण्यात आली आहे गारपीटीची रक्कम खात्यात जमा झाली नसल्याने शेतकर्‍यांची विचारणा करण्यासाठी तहसिल कार्यालयात गर्दी वाढली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे गारपीटीची मदत ऐन पेरणीच्या तोंडावर मिळाली तर शेतकर्‍यांना त्याचा निश्‍चित फायदा होईल त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनानी प्रयत्न करणे गरजेचे असून तशी मागणी शेतकर्‍यांतून केल्या जात आहे.