शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

शेतीच्या बांधावरच सेंद्रीय खतनिर्मितीबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:49 IST

जिल्ह्यात तूर , हरभरा पिकाची काढणी जवळपास झालेली आहे आणि गहू पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आहे. शेतकरी आता पुढील ...

जिल्ह्यात तूर , हरभरा पिकाची काढणी जवळपास झालेली आहे आणि गहू पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आहे. शेतकरी आता पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यासाठी तुरीची, हरभऱ्याची खुंटे, अवशेष शेतात जमा करून ते पेटवत शेत मोकळे करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे शेतीचे नुकसान होते. काडीकचरा जाळल्यामुळे परिसरात धूर पसरून पर्यावरणावर परिणाम होतो. शिवाय यामुळे जंगलात वणवा पेटण्याची भिती असते आणि शेतजमिनीमधील उपयुक्त जीवाणूचा नाशही होतो. ही बाब लक्षात घेत धूरमुक्त अभियानांतर्गत याच काडीकचऱ्यापासून उपयुक्त आणि विनाखर्च सेंद्रीय खत निर्मितीबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतामधील तूर, हरभरा, गहू पिकाची खुंटे, भुईमुगाचे काड , अवशेष न जाळता त्यापासून सेंद्रीय खत कसे तयार करता येईल याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

---------

काडीकचऱ्यापासून खत तयार करण्याची पद्धती

शेतामधील तूर, हरभरा, गहू पिकाची खुंट, इतर पिकांचा काडीकचरा जमा करून तो शेताच्या बांधावर ३ फूट उंचीपर्यंत बांधाच्या रुंदीप्रमाणे पसरवावा, बांधावर जेवढ्या लांबीत शक्य होईल, तेवढ्या प्रमाणात हा कचरा पसरवून त्यावर शेतामधील माती टाकावी. पावसाळ्यात त्यावर पाणी पडल्यानंतर तो कचरा चांगला कुजतो आणि रब्बी हंगामापर्यंत त्यापासून उत्तम प्रकारचे सेंद्रीय खत तयार होते. या खताच्या वापरामुळे जमिनीचा कस आणि पोत सुधारून जमिनीची उत्पादन क्षमता, पाणी धारण क्षमताही वाढते. शिवाय जीवांणूची संख्या वाढून पिकांची रोग, कीड प्रतिकार क्षमताही वाढते. या खताचा रब्बी पिकांसाठी वापर केल्यास शेतकऱ्यांचा कीड व बुरशीनाशकचा वापरही कमी होऊ शकतो.

------

कोट: रब्बी पिकांचे शेतामधील अवशेष शेतकऱ्यांनी न जाळता त्यापासून शेताच्या बांधावरच ढीग करून त्यावर माती टाकत सेेंद्रीय खत तयार करावे किंवा रोटाव्हेटरने हे अवशेष शेतजमिनीत मिसळल्यास शेतजमिनीचा पोत आणि कस सुधारण्यास मदत होऊन पीक उत्पादन वाढू शकते.

-शंकर तोटावार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम