शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

शेतीच्या बांधावरच सेंद्रीय खतनिर्मितीबाबत मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:49 IST

जिल्ह्यात तूर , हरभरा पिकाची काढणी जवळपास झालेली आहे आणि गहू पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आहे. शेतकरी आता पुढील ...

जिल्ह्यात तूर , हरभरा पिकाची काढणी जवळपास झालेली आहे आणि गहू पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आहे. शेतकरी आता पुढील खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. यासाठी तुरीची, हरभऱ्याची खुंटे, अवशेष शेतात जमा करून ते पेटवत शेत मोकळे करण्याचा प्रकार अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. या प्रकारामुळे शेतीचे नुकसान होते. काडीकचरा जाळल्यामुळे परिसरात धूर पसरून पर्यावरणावर परिणाम होतो. शिवाय यामुळे जंगलात वणवा पेटण्याची भिती असते आणि शेतजमिनीमधील उपयुक्त जीवाणूचा नाशही होतो. ही बाब लक्षात घेत धूरमुक्त अभियानांतर्गत याच काडीकचऱ्यापासून उपयुक्त आणि विनाखर्च सेंद्रीय खत निर्मितीबाबत कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे. विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतामधील तूर, हरभरा, गहू पिकाची खुंटे, भुईमुगाचे काड , अवशेष न जाळता त्यापासून सेंद्रीय खत कसे तयार करता येईल याबाबत मार्गदर्शन केले जात आहे.

---------

काडीकचऱ्यापासून खत तयार करण्याची पद्धती

शेतामधील तूर, हरभरा, गहू पिकाची खुंट, इतर पिकांचा काडीकचरा जमा करून तो शेताच्या बांधावर ३ फूट उंचीपर्यंत बांधाच्या रुंदीप्रमाणे पसरवावा, बांधावर जेवढ्या लांबीत शक्य होईल, तेवढ्या प्रमाणात हा कचरा पसरवून त्यावर शेतामधील माती टाकावी. पावसाळ्यात त्यावर पाणी पडल्यानंतर तो कचरा चांगला कुजतो आणि रब्बी हंगामापर्यंत त्यापासून उत्तम प्रकारचे सेंद्रीय खत तयार होते. या खताच्या वापरामुळे जमिनीचा कस आणि पोत सुधारून जमिनीची उत्पादन क्षमता, पाणी धारण क्षमताही वाढते. शिवाय जीवांणूची संख्या वाढून पिकांची रोग, कीड प्रतिकार क्षमताही वाढते. या खताचा रब्बी पिकांसाठी वापर केल्यास शेतकऱ्यांचा कीड व बुरशीनाशकचा वापरही कमी होऊ शकतो.

------

कोट: रब्बी पिकांचे शेतामधील अवशेष शेतकऱ्यांनी न जाळता त्यापासून शेताच्या बांधावरच ढीग करून त्यावर माती टाकत सेेंद्रीय खत तयार करावे किंवा रोटाव्हेटरने हे अवशेष शेतजमिनीत मिसळल्यास शेतजमिनीचा पोत आणि कस सुधारण्यास मदत होऊन पीक उत्पादन वाढू शकते.

-शंकर तोटावार

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम