शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
6
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
7
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
8
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
9
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
10
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
11
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
12
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
13
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
14
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
15
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
16
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
17
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
18
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
19
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

भुईमुगाची आवक वाढली; भाव घसरले!

By admin | Updated: May 29, 2017 01:18 IST

जिल्ह्यातील चित्र : खरिपाच्या तोंडावर शेतकरी सुलतानी संकटात

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: उन्हाळी भुईमुगाची काढणी अंतिम टप्प्यात असून, यंदा या पिकाचे उत्पादन बऱ्यापैकी झाल्याने बाजार समित्यांमध्ये आवक वाढल्याचे दिसत आहे. तथापि, गतवर्षीच्या तुलनेत यंदा या वाणालाही खूप कमी भाव मिळत असल्याने शेतकरी निराश झाले आहेत. यंदा जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत उन्हाळी भुईमुगाचा पेरा दुप्पट झाला होता. गतवर्षी ३ हजार ३७४ हेक्टरवर भुईमुगाची पेरणी झाली होती. ते प्रमाण यंदा ६ हजार हेक्टरच्यावर गेले होते. त्यातच पोषक वातावरण आणि पाण्याची उपलब्धता असल्याने शेतकऱ्यांना या पिकाचे एकराला सरासरी पाच क्विंटल उत्पादन झाले. त्यामुळे तूर आणि सोयाबीनमध्ये फटका खाणारे शेतकरी उत्साही होते; परंतु त्या उत्साहावरही बाजार व्यवस्थेने विरजण घातले आहे. मागील वर्षी प्रति क्विंटल ५ हजार ८०० रुपयांपर्यंत विकला जाणारा भुईमूग यंदा कमाल ४ हजार ६०० रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी ३ हजार ९०० रुपये क्विंटलने घेतला जात आहे. त्यामुळे शेतकरी पूर्णपणे निराश झाले आहेत. दरम्यान, खरिपाचा हंगाम तोंडावर आला असल्याने या हंगामासाठी हाती पैसा असावा म्हणून शेतकऱ्यांनी भाव वाढीच्या अपेक्षेने घरात साठवलेले धान्य विकण्याची तयारी केली असून, नुकत्याच काढलेल्या भुईमुगाची विक्रीही करण्याची घाई त्यांना झाली आहे. त्यामुळे बाजारात भुईमुगाची आवक वाढली आहे. एकट्या कारंजा येथील बाजार समितीमध्ये २६ मे रोजी तब्बल पाच हजार क्विंटल भुईमुगाची आवक झाली होती. वाशिम, मंगरुळपीर, रिसोड आणि मालेगावातही भुईमुगाची विक्रमी आवक होत आहे.