शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई

By admin | Updated: May 16, 2017 18:28 IST

मानोरा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शेंदुरजना अढाव, पांचयत समिती गणातील गावामध्ये भिषण पाणी टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शेंदुरजना अढाव, पांचयत समिती गणातील रणजीत नगर, पाळोदी, ढेोणी, शेंदुरजना अढाव, उज्वलनगर, आदि गावामध्ये भिषण पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांंना करावा लागत आहे. शेंदुरजना पाणी टंचाई सदृश्य स्थिती असतांना याकडे शासनव प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. शेंदुरजना अढाव पं.स.गणातील ही पाच ते सहा गावे डोंगराळ भागात वसलेली आहेत. त्यामुळे भुजल पातळी अतिशय खोलवर गेलेली आहे. या परिसरात बोअरवेलसारखी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. गेल्या १४ ते १५ वर्षापुर्वी उज्वलनगर भागातील टेकडी शिवारात तलावाचे कामाला सुरुवात झाली,मात्र अद्यापही त्या तलावाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे फेबु्रवारीपासूनच या डोंगराळ भागामध्ये तीव्र पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. एका महिन्यापूर्वी उज्वलनगर येथील नागरिकाना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. तेव्हा तहसीलदार शेख गावामध्ये पाणी टंचाई पाहणीला गेले असता त्यांना ग्रामस्थांनी घेराव घालुन पाणी समस्या निकाली काढण्याबाबत मागणी केली होती. तेव्हा प्रशासनाच्यावतीने टँकरची व्यवस्था करुन देण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे समजते. या गावात प्रत्येक वर्षी भिषण पाणी टंचाई भासते . तरी सुध्दा शासन व प्रशासन कायमस्वरुपी पाणी टंचाई समस्या निवारण करण्याकरिता दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर पिण्याच्या पाणयासाठी रानोमाळ वणवण भटकंती करण्याची वेळ आलेली आहे.   गेल्या १५ ते २० वर्षापासून उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते. प्रशासन अखेरच्या महिन्यात तात्पुरती पाण्याची उपाय योजना करुन देण्यात धन्यता मानते. फेबु्रवारीपासून दरवर्षी भिषण पाणी टंचाई उदभवते. पाणी टंचाई समस्येमुळे ग्रामस्थांचा वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. त्यामुळे मजुरी बुडते. परिणामी, पाणी टंचाईने अनेक ग्रामस्थ कुटूंबासह पुणे, मुंबई, सुरत आदि ठिकाणी कामाला जावुन उदरनिर्वाह करतात.त्यामुळे शासनाने कायम स्वरुपी पाणी टंचाई दुर करण्याकरिता उपाय योजना करावी.-रेखाताई नथ्थु पडवालपं.स.सदस्या