शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात भीषण पाणी टंचाई

By admin | Updated: May 16, 2017 18:28 IST

मानोरा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शेंदुरजना अढाव, पांचयत समिती गणातील गावामध्ये भिषण पाणी टंचाई

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा : मानोरा पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शेंदुरजना अढाव, पांचयत समिती गणातील रणजीत नगर, पाळोदी, ढेोणी, शेंदुरजना अढाव, उज्वलनगर, आदि गावामध्ये भिषण पाणी टंचाईचा सामना ग्रामस्थांंना करावा लागत आहे. शेंदुरजना पाणी टंचाई सदृश्य स्थिती असतांना याकडे शासनव प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. शेंदुरजना अढाव पं.स.गणातील ही पाच ते सहा गावे डोंगराळ भागात वसलेली आहेत. त्यामुळे भुजल पातळी अतिशय खोलवर गेलेली आहे. या परिसरात बोअरवेलसारखी यंत्रणा कुचकामी ठरत आहे. गेल्या १४ ते १५ वर्षापुर्वी उज्वलनगर भागातील टेकडी शिवारात तलावाचे कामाला सुरुवात झाली,मात्र अद्यापही त्या तलावाचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे फेबु्रवारीपासूनच या डोंगराळ भागामध्ये तीव्र पाणी टंचाईचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. एका महिन्यापूर्वी उज्वलनगर येथील नागरिकाना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. तेव्हा तहसीलदार शेख गावामध्ये पाणी टंचाई पाहणीला गेले असता त्यांना ग्रामस्थांनी घेराव घालुन पाणी समस्या निकाली काढण्याबाबत मागणी केली होती. तेव्हा प्रशासनाच्यावतीने टँकरची व्यवस्था करुन देण्यात आल्याचे सांगण्यात आल्याचे समजते. या गावात प्रत्येक वर्षी भिषण पाणी टंचाई भासते . तरी सुध्दा शासन व प्रशासन कायमस्वरुपी पाणी टंचाई समस्या निवारण करण्याकरिता दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांवर पिण्याच्या पाणयासाठी रानोमाळ वणवण भटकंती करण्याची वेळ आलेली आहे.   गेल्या १५ ते २० वर्षापासून उन्हाळ्यात पाणी टंचाई भासते. प्रशासन अखेरच्या महिन्यात तात्पुरती पाण्याची उपाय योजना करुन देण्यात धन्यता मानते. फेबु्रवारीपासून दरवर्षी भिषण पाणी टंचाई उदभवते. पाणी टंचाई समस्येमुळे ग्रामस्थांचा वणवण भटकंती करीत पाणी आणण्यात दिवस जातो. त्यामुळे मजुरी बुडते. परिणामी, पाणी टंचाईने अनेक ग्रामस्थ कुटूंबासह पुणे, मुंबई, सुरत आदि ठिकाणी कामाला जावुन उदरनिर्वाह करतात.त्यामुळे शासनाने कायम स्वरुपी पाणी टंचाई दुर करण्याकरिता उपाय योजना करावी.-रेखाताई नथ्थु पडवालपं.स.सदस्या