शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
2
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
3
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
6
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
7
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
8
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
9
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
10
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
11
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
12
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
13
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
14
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
15
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
16
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
17
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
18
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
19
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
20
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
Daily Top 2Weekly Top 5

गट शेतीच्या प्रोत्साहनासाठी अनुदानित योजना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 20:15 IST

वाशिम : ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना’ ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत भरघोष अनुदान दिले जाणार असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी गटांनी ६ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.

ठळक मुद्देकृषी विभाग ६ आॅक्टोंबरपर्यंत प्रकल्प सादर करण्याची मुदत

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ‘गट शेतीस प्रोत्साहन व सबलीकरणासाठी शेतकºयांच्या गट शेतीस चालना’ ही राज्य पुरस्कृत योजना सन २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षाच्या कालावधीत पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत भरघोष अनुदान दिले जाणार असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकरी गटांनी ६ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत प्रकल्प अहवाल सादर करणे आवश्यक आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.किमान १०० एकर क्षेत्रावर शेतकरी गटामार्फत विविध कृषी व कृषिपुरक उपक्रम प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. या योजनेतंर्गत सहभागी होणाºया शेतकºयांची आत्मा संस्था, महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १८९० अथवा कंपनी अधिनियम १९५८ च्या तरतुदी अंतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गट म्हणुन नोंदणी करणे आवश्यक राहिल. या योजनेंतर्गंत सामुहिक सिंचन सुविधा, सामुहिक पध्दतीने यांत्रिकीकरणाद्वारे मशागत करणे शक्य असल्याने समूह शेतीस प्राधान्य देण्यात येणार आहे. गट शेती या योजनेतंर्गंत प्रकल्प स्वरुपात उपक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच शेतकºयांना प्रशिक्षण व मार्गदर्शन देण्यात येणार आहे. सामुहिक गोठा, दुग्धप्रक्रिया, अवजारे, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन, रेशिम उद्योग, कुक्कुटपालन तसेच मागेल त्याला शेततळे, जलसंपदा विभागाकडील कामे इ. कार्यक्रम कृषि सलग्न संबंधित विभागाकडून त्या विभागाच्या प्रचलित निकषाप्रमाणे समूह गटास प्राधान्याने उपलब्ध करुन देण्यात येतील. बँकेत प्रकल्प आराखडा सादर केलेल्या अथवा करणाºया गटास प्राधान्य देण्यात येईल. ज्या तालुक्यात महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषि विकास प्रकल्प (एमएसीपी) किंवा अन्य योजना अथवा प्रकल्पांतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन झालेल्या नाहीत, अशा तालुक्यात सदर योजनेत प्राधान्य देण्यात येईल. ज्या गटाचे प्रकल्प आराखडे सर्व अटी व शर्तीची पूर्तता करतील, अशा गटांना प्राधान्य दिले जाणार आहे.प्रकल्प आराखड्यामध्ये समुह शेती क्षेत्रात घ्यावयाची पिके, फळे, भाजीपाला, मसाला पिके, फुलशेती व इतर अवश्यक असलेले उत्पादन. त्याकरीता लागणाºया सुविधा शेतकºयांना प्रशिक्षण, सिंचन सुविधा, संरक्षित शेती, सुक्ष्मसिंचन, यांत्रिकीकरणासाठी आवश्यक अवजारे, काढणीपश्चात लागणारी उपकरणे यांचा आवश्यकतेनुसार समावेश करण्यात यावा. प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध आहे. संबंधित शेतकरी गटांनी तालुका कृषी अधिकाºयांशी संपर्क साधावा व प्रकल्प आराखडा तयार करून ६ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत सादर करावा, असे आवाहन गावसाने यांनी केले.