शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कारंजा तालुक्यात ८ ठिकाणी पार पडल्या उपग्रहाद्वारे ग्रामसभा

By admin | Updated: April 6, 2017 20:28 IST

कारंजा तालुक्यातील निवडक ८ गावामध्ये उपग्रहाद्वारे विशेप ग्रामसभा पार पडल्या.सिनेअभिनेता अमीर खान सह ईतर कलाकारांनी गावकऱ्यांशी संवाद साधला.

सिनेअभिनेता अमीर खान सह ईतर कलाकारांनी साधला गावकऱ्यांशी संवाद कारंजा लाड : पाणी फांउडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या "सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा" करीता कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत कारंजा तालुक्यातील १३६ ही गावांनी सहभाग नोंदविला यापैकी १०६ गावानी पाणी फाउंडेशनचा प्रशिक्षण कार्यक्रम पुर्ण केला. कारंजा तालुक्यातील निवडक ८ गावामध्ये उपग्रहाद्वारे विशेप ग्रामसभा पार पडल्या. या ग्रामसभांमध्ये पाणी फांउडेशनचे संस्थापक तथा सिनेअभिनेता अमीर खान व पाणी फांउडेशनचे राज्य समन्वयक डॉ अविनाश पोळ व अन्य सिनेकलाकार यांनी उपग्रहाद्वारे गावकऱ्यांशी संवाद साधला. डॉ अविनाश पोळ, अभिनेते भारत गणेशपुरे, सुनिल बर्वे, किरण राव, जितेंद्र जोशी, अमीर खान, आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांनी गावकऱ्यांची संवाद साधून त्यांना पाण्याचे महत्व पटवून दिले. 

गावकऱ्यांशी संवादगाव पाणीदार करण्यासाठी गावकऱ्यांनी या वॉटर कप स्पर्धेत उत्फुर्तेपणे सहभाग घ्यावा. स्पर्धेदरम्यान गावकऱ्यांना येणाऱ्या अडीअडचणी संदर्भात सिनेअभिनेता अमीर खान यांनी कारंजा तालुक्यातील लोणी अरब येथील गावकऱ्यांशी ५ एप्रिल रोजी संध्याकाळच्यावेळी संवाद साधला व गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. अमीरजी बोलतांना म्हणाले की, गाव जर स्पर्धेदरम्यान एकत्र आलं तर गावात नक्कीच पाणी थांबेल व गाव पाणीदार होईल असा विश्वास अमीर खान यांनी गावकऱ्यांना दिला.