शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

वृक्षलागवड मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींचा होणार सन्मान!

By admin | Updated: May 16, 2017 20:09 IST

वाशिम : पन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पन्नास कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत १ ते ७ जुलै २०१७ या कालावधीत राज्यात ४ कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभाग नोंदवून गावाच्या लोकसंख्येइतकी वृक्ष लागवड करणाऱ्या जिल्ह्यातील ग्रामपंचायतीचा स्वातंत्र्यदिनी १५ आॅगस्टला सन्मान केला जाईल, अशी घोषणा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी मंगळवारी केली. वृक्षलागवड उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. वाशिम जिल्ह्याला ५ लक्ष ८ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. यानुषंगाने ५ लक्ष २२ हजार वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. आतापर्यंत २ लक्ष ८३ हजार ५६५ खड्डे खोदण्यात आले आहेत. या सर्व खड्ड्यांचे जीपीएस मॅपिंग करण्यात येणार आहे. उर्वरित खड्डे ३१ मे २०१७ पर्यंत खोदून पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणाप्रमुखांना देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. ग्रामपंचायतींनी वृक्षलागवड मोहिमेत विशेष उत्साह दाखवून ही मोहिम यशस्वी करावी. उत्कृष्ट कार्य करणाऱ्या ग्रामपंचायतींना सन्मानित केले जाईल, असे जिल्हाधिकारी म्हणाले.