शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
2
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
3
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
6
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
7
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
8
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
9
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
10
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
11
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
12
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
13
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
14
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
15
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
16
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
17
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
18
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
19
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
20
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा

ग्रामपंचायतीच्या लाखो रुपये कर थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 19:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  :  ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांना आपल्या जबाबदारीचा विसर पडला असून मुख्यालयी न राहता शहरातूनच आपला कारभार करतात. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीचा लाखो रुपयाचा कर थकीत आहे तसेच अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामसेवकांचे फोन बदं राहत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शासनाच्यावतीने विकास कामासाठी ग्रामपंचायतीला मोठे अधिकार दिले ...

ठळक मुद्देग्रामसेवकांना पडला जबाबदारीचा विसर ‘नॉट रिचेबल’ राहणा-या ग्रामसेवकांमुळे नागरिक त्रस्तसरपंच व सदस्य यांच्या समन्वयातून विकास व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  :  ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांना आपल्या जबाबदारीचा विसर पडला असून मुख्यालयी न राहता शहरातूनच आपला कारभार करतात. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीचा लाखो रुपयाचा कर थकीत आहे तसेच अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामसेवकांचे फोन बदं राहत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शासनाच्यावतीने विकास कामासाठी ग्रामपंचायतीला मोठे अधिकार दिले आहेत. गावातील मुलभूत विकासासाठी लाखो रुपये निधी येतो. १३ व्या, १४ व्या, वित्त आयोगाची कामे सुध्दा केली जातात. त्याचबरोबर विविध प्रकारची करवसुली सुध्दा ग्रामेवकांना करावी लागते, घरकुल, शौचालय, विहीरीची कामे त्या कामावरील रक्कम मिळण्यासाठी ग्रामसेकांना शोधावे लागते. ग्रामसेवकांनी गावात भेटी देण्यासाठी दिवस ठरविले आहेत. मात्र बहूतांश ग्रामसेवक आपल्या कार्यक्षेत्रात येणाºया गावात जातच नाही.त्यामुळे नागरिकांना त्यांना भेटण्यासाठी पंचायत समिती यावे लागते. येथे आल्यावर त्यांची भेट घेत नाही. फोनवर संपर्क केला असता त्यांचा फोन बंद असतो.त्यामुळे एखादे काम पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागतो. गाव हागणदारी मुक्त करणे, यासाठी ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची असते, मात्र अनेक गावात आजही  उघड्यावर शौचास बसणारांची संखया कमी नाही. बहूतांश गावातील करवसुली थकलेली आहे. शासनाने एक दिवस वसुलीचा असा कार्यक्रम राबवून गटविकास अधिकारी व ग्रामसेवक लोकांच्या घरापर्यंत गेले होते. याला प्रतिसाद मिळत लाखो रुपयाची वसुली झाली होती. मात्र हा कार्यक्रम सध्या थंड पडला आहे. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची आहे सरपंच व सदस्य यांच्या समन्वयातून विकास व्हावा अशी अपेक्षा नागरिकात व्यक्त होत आहे. शासनाच्यावतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम युध्द पातळीवर सुरु आहे. गतवर्षी लावलेली झाडे यावर्षीपर्यंत जगलीच नाही, पुन्हा यंदा वृक्षारोपण करण्यात आले. पुढच्या वर्षीही करण्यात येईल् मात्र झाडांची संखया वाढतांना दिसत नाही. याबाबत ग्रामसेवकांनी गंभीर असावे, काही ग्रामपंचायती लोकसंख्या  तेवढी झाडे,  हा उपक्रम राबवित आहेत तर काही ग्रामपंचायती मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यास इच्छुक आहे.  मात्र त्यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेणे गरजचे आहे. यासंदर्भात नव्यानेच येथे रुजु झालेले गटविकास अधिकाराी ज्ञानेश्वर ताकरस यांनी लक्ष द्यावे अशी जनतेची अपेक्षा आहे.