शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतीच्या लाखो रुपये कर थकीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 19:59 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  :  ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांना आपल्या जबाबदारीचा विसर पडला असून मुख्यालयी न राहता शहरातूनच आपला कारभार करतात. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीचा लाखो रुपयाचा कर थकीत आहे तसेच अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामसेवकांचे फोन बदं राहत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शासनाच्यावतीने विकास कामासाठी ग्रामपंचायतीला मोठे अधिकार दिले ...

ठळक मुद्देग्रामसेवकांना पडला जबाबदारीचा विसर ‘नॉट रिचेबल’ राहणा-या ग्रामसेवकांमुळे नागरिक त्रस्तसरपंच व सदस्य यांच्या समन्वयातून विकास व्हावा अशी नागरिकांची अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  :  ग्रामीण विकासाचा कणा असलेल्या ग्रामसेवकांना आपल्या जबाबदारीचा विसर पडला असून मुख्यालयी न राहता शहरातूनच आपला कारभार करतात. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतीचा लाखो रुपयाचा कर थकीत आहे तसेच अर्ध्यापेक्षा जास्त ग्रामसेवकांचे फोन बदं राहत असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.शासनाच्यावतीने विकास कामासाठी ग्रामपंचायतीला मोठे अधिकार दिले आहेत. गावातील मुलभूत विकासासाठी लाखो रुपये निधी येतो. १३ व्या, १४ व्या, वित्त आयोगाची कामे सुध्दा केली जातात. त्याचबरोबर विविध प्रकारची करवसुली सुध्दा ग्रामेवकांना करावी लागते, घरकुल, शौचालय, विहीरीची कामे त्या कामावरील रक्कम मिळण्यासाठी ग्रामसेकांना शोधावे लागते. ग्रामसेवकांनी गावात भेटी देण्यासाठी दिवस ठरविले आहेत. मात्र बहूतांश ग्रामसेवक आपल्या कार्यक्षेत्रात येणाºया गावात जातच नाही.त्यामुळे नागरिकांना त्यांना भेटण्यासाठी पंचायत समिती यावे लागते. येथे आल्यावर त्यांची भेट घेत नाही. फोनवर संपर्क केला असता त्यांचा फोन बंद असतो.त्यामुळे एखादे काम पूर्ण होण्यासाठी बराच कालावधी लागतो. गाव हागणदारी मुक्त करणे, यासाठी ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची असते, मात्र अनेक गावात आजही  उघड्यावर शौचास बसणारांची संखया कमी नाही. बहूतांश गावातील करवसुली थकलेली आहे. शासनाने एक दिवस वसुलीचा असा कार्यक्रम राबवून गटविकास अधिकारी व ग्रामसेवक लोकांच्या घरापर्यंत गेले होते. याला प्रतिसाद मिळत लाखो रुपयाची वसुली झाली होती. मात्र हा कार्यक्रम सध्या थंड पडला आहे. ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर ग्रामसेवकांची भूमिका महत्वाची आहे सरपंच व सदस्य यांच्या समन्वयातून विकास व्हावा अशी अपेक्षा नागरिकात व्यक्त होत आहे. शासनाच्यावतीने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम युध्द पातळीवर सुरु आहे. गतवर्षी लावलेली झाडे यावर्षीपर्यंत जगलीच नाही, पुन्हा यंदा वृक्षारोपण करण्यात आले. पुढच्या वर्षीही करण्यात येईल् मात्र झाडांची संखया वाढतांना दिसत नाही. याबाबत ग्रामसेवकांनी गंभीर असावे, काही ग्रामपंचायती लोकसंख्या  तेवढी झाडे,  हा उपक्रम राबवित आहेत तर काही ग्रामपंचायती मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करण्यास इच्छुक आहे.  मात्र त्यासाठी ग्रामसेवकांनी पुढाकार घेणे गरजचे आहे. यासंदर्भात नव्यानेच येथे रुजु झालेले गटविकास अधिकाराी ज्ञानेश्वर ताकरस यांनी लक्ष द्यावे अशी जनतेची अपेक्षा आहे.