शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे धरणे

By admin | Updated: August 2, 2016 01:45 IST

४९१ ग्रामपंचायतींच्या कर्मचा-यांचा समावेश : विविध मागण्यांसाठी आंदोलन.

वाशिम : प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतींच्या कर्मचार्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे दिले. ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी लढा देत आहे. अद्याप अनेक मागण्या प्रलंबित असल्याने याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होत वाशिम जिल्ह्यातही ४९१ ग्राम पंचायतींच्या कर्मचार्‍यांनी धरणे दिले. सर्व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना ग्रॅच्युएटी नियम लागू करण्यात यावा, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सन १ जानेवारी २000 पासून किमान वेतन लागू केले असून, दर ५ वर्षांनी सुधारित किमान वेतनाचे दर लागू करावयास पाहिजे होते. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा वेतनासाठी सुधारित किमान वेतनाची अधिसूचना जाहीर करण्यात यावी, ग्राम पंचायतीच्या सेवाकाळात ग्राम पंचायत कर्मचारी मृत्यू पावल्यास त्यांच्या वारसाला ग्राम पंचायतीचे सेवेत नियुक्ती देण्यात यावी, ग्राम पंचायत कर्मचार्‍यांसाठी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची ग्राम पंचायत स्तरावर काटेकोर अंमलबजावणी व्हावी, ग्राम पंचायत कर्मचार्‍यांना डॉ.दीपक म्हैसकर यांच्या पेन्शन समिती अहवालानुसार पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या, तसेच ग्राम पंचायत कर्मचार्‍यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात जमा करण्यात यावी, ग्राम पंचायत कर्मचार्‍यांची आकृतीबंध १९८१ च्या लोकसंख्येच्या आधारे २१ जानेवारी २000 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे. ग्राम पंचायत कर्मचार्‍यांच्या आकृती बंधात सुधारणा करण्यात यावी, आदी प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी धरणे देण्यात आले.