शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत कर्मचा-यांचे धरणे

By admin | Updated: August 2, 2016 01:45 IST

४९१ ग्रामपंचायतींच्या कर्मचा-यांचा समावेश : विविध मागण्यांसाठी आंदोलन.

वाशिम : प्रलंबित मागण्यांकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्ह्यातील ४९१ ग्राम पंचायतींच्या कर्मचार्‍यांनी सोमवारी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे दिले. ग्रामपंचायत कर्मचारी संघटना अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी लढा देत आहे. अद्याप अनेक मागण्या प्रलंबित असल्याने याकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यभरात सोमवारी धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सहभागी होत वाशिम जिल्ह्यातही ४९१ ग्राम पंचायतींच्या कर्मचार्‍यांनी धरणे दिले. सर्व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना ग्रॅच्युएटी नियम लागू करण्यात यावा, ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना सन १ जानेवारी २000 पासून किमान वेतन लागू केले असून, दर ५ वर्षांनी सुधारित किमान वेतनाचे दर लागू करावयास पाहिजे होते. ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचा वेतनासाठी सुधारित किमान वेतनाची अधिसूचना जाहीर करण्यात यावी, ग्राम पंचायतीच्या सेवाकाळात ग्राम पंचायत कर्मचारी मृत्यू पावल्यास त्यांच्या वारसाला ग्राम पंचायतीचे सेवेत नियुक्ती देण्यात यावी, ग्राम पंचायत कर्मचार्‍यांसाठी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाची ग्राम पंचायत स्तरावर काटेकोर अंमलबजावणी व्हावी, ग्राम पंचायत कर्मचार्‍यांना डॉ.दीपक म्हैसकर यांच्या पेन्शन समिती अहवालानुसार पेन्शन योजना लागू करावी, आदी मागण्या करण्यात आल्या, तसेच ग्राम पंचायत कर्मचार्‍यांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम कामगार भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालयात जमा करण्यात यावी, ग्राम पंचायत कर्मचार्‍यांची आकृतीबंध १९८१ च्या लोकसंख्येच्या आधारे २१ जानेवारी २000 च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आलेला आहे. ग्राम पंचायत कर्मचार्‍यांच्या आकृती बंधात सुधारणा करण्यात यावी, आदी प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारी धरणे देण्यात आले.